शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

नागपुरात जिल्हा सरकारी वकीलपदाच्या प्रभारावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 22:49 IST

Dispute over charge of District Government Pleader जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हा सरकारी वकीलपदाच्या प्रभारावरून या कार्यालयातील वकिलांमध्ये वादावादी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देनवीन नियुक्ती नाही : नितीन तेलगोटे यांचा कार्यकाळ संपला

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हा सरकारी वकीलपदाच्या प्रभारावरून या कार्यालयातील वकिलांमध्ये वादावादी सुरू झाली आहे. जिल्हा सरकारी वकील ॲड. नितीन तेलगोटे यांचा कार्यकाळ ३० ऑक्टोबर रोजी संपला आहे. परंतु, राज्य सरकारने अद्याप नवीन नियुक्ती केली नाही. तसेच, ॲड. तेलगोटे यांना मुदतवाढही दिली नाही. जिल्हा सरकारी वकील कार्यालयाला वाऱ्यावर सोडल्याचे सध्याचे चित्र आहे. जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील वकिलांमध्ये वादाची ठिणगी पडण्याला ॲड. तेलगोटे यांचा एक निर्णय कारणीभूत ठरला. ३० ऑक्टोबरपर्यंत व त्यानंतरही सरकारकडून काहीच निर्देश आले नाही म्हणून, त्यांनी ४ नोव्हेंबर रोजी कार्यालयातील ॲड. प्रशांत साखरे यांच्याकडे स्वत:चा पदभार सोपविला. हा निर्णय कार्यालयातील इतर वकिलांनी अमान्य करून ॲड. साखरे यांच्याकडे जिल्हा सरकारी वकीलपदाचा पदभार सोपविण्याचा विरोध केला. ॲड. तेलगोटे यांचा कार्यकाळ ३० ऑक्टोबर रोजी संपल्यामुळे ते या तारखेनंतर असा निर्णय घेऊ शकत नाही, असे इतर सरकारी वकिलांचे म्हणणे आहे.

विधी अधिकारी नियमातील नियम ३१ अनुसार जिल्हा सरकारी वकिलाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी या कार्यालयातील सर्वात ज्येष्ठ सरकारी वकिलाकडे स्वत:चा पदभार सोपविणे आवश्यक आहे. ॲड. साखरे या नियमात बसत नाहीत, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. या वादग्रस्त परिस्थितीत कार्यालयातील ॲड. व्ही. के. नरसापूरकर यांनी जिल्हा सरकारी वकील कार्यालयाची जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे. ते सर्वात ज्येष्ठ सरकारी वकील असल्याचा दावा केला जात आहे. ॲड. नरसापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बुधवारी व गुरुवारी या कार्यालयाचे प्रभारी म्हणून कार्यभार सांभाळला.

हायकोर्टाने दखल घेण्याची मागणी

न्यायव्यवस्थेत जिल्हा सरकारी वकील कार्यालय अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. असे असताना राज्य सरकारने जिल्हा सरकारी वकील नियुक्तीमध्ये प्रचंड उदासीनता दाखविल्याचे घडलेल्या प्रकारावरून दिसून आले आहे. याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे.

टॅग्स :advocateवकिलDistrict Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयGovernmentसरकार