शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा! मनपाचे गृहनिर्माण सोसायट्यांना पत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 20:44 IST

Garbage issue, nagpur newsवर्षभरापूर्वी कचरा वर्गीकरणाची सक्ती करूनही त्याची शहरात अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. याचा विचार करता मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १०० किलोहून अधिक कचरा निघणाऱ्या सोसायट्यांना कचऱ्याची तुम्हीच विल्हेवाट लावा, अशा आशयाचे पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देवर्षभरापूर्वीच केली होती सक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्षभरापूर्वी कचरा वर्गीकरणाची सक्ती करूनही त्याची शहरात अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. याचा विचार करता मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १०० किलोहून अधिक कचरा निघणाऱ्या सोसायट्यांना कचऱ्याची तुम्हीच विल्हेवाट लावा, अशा आशयाचे पत्र पाठविले आहे. यासाठी सुरुवातीला प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांची निवड करण्यात आली आहे. सोबतच शहरातील सर्वच मोठ्या सोसायट्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

शहरात दररोज ११०० मेट्रिक टन कचरा निघतो. परंतु ओला व सुका कचरा पूर्णपणे वेगवेगळा संकलित केला जात नाही. यातील फक्त २०० मेट्रिक टन कचरा वेगवेगळा संकलित केला जातो. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीचा करार संपुष्टात आल्यानंतर, महापालिकेने १६ नोव्हेंबर २०१९ पासून शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी ए. जी. एन्व्हायरो आणि बीव्हीजी या कंपन्यांना सोपविली आहे. त्यानुसार या दोन्ही कंपन्या दररोज शहरातून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे अपेक्षित होते. परंतु वर्षभरानंतरही यात अपेक्षित सुधारणा झालेली नाही.

प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांना पत्र

१०० किलोहून अधिक कचरा निघाणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याची विल्हेवाट स्वत: लावावयाची आहे. यासंदर्भात वर्षभरापूर्वीच मनपा प्रशासनाने निर्देश दिले होते. अशा सोसायट्यातील कचरा मनपा उचलणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु अजूनही बहुसंख्य सोसायट्यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा निर्माण केलेली नाही. त्यामुळे प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे.

कचऱ्यापासून खत निर्मिती करा

सोसाट्यांनी परिसरात ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित न केल्यास सुका कचरा उचलला जााणार नाही. अशी भूमिका मनपा प्रशासनाने घेतली होती. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केल्यास सोसायट्यांनाच यापासून आर्थिक लाभ होणार आहे. परंतु त्यानंतरही बहुसंख्य सोसायट्यात ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करत नाही.

दंडात्मक कारवाईचा दिला होता इशारा

ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित न केल्यास महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतु दंडात्मक कारवाई झाली नाही. राज्यातील काही महापालिकांकडून सोसाट्यांना कचरा वर्गीकरण न केल्यास पाच हजारांचा दंड आकारला जात आहे

.महापालिकेने प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांना पत्र पाठवून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले आहे. मनपाने स्वच्छता निरीक्षक नेमले आहेत. घरोघरी कचरा वर्गीकरणाचा संदेश पोहोचविणे व त्याची अंमलबजावणी कृतीमध्ये होणे अपेक्षित आहे. कचरा वर्गीकरणात दंडात्मक कारवाईपेक्षा नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त (घनकचरा) मनपा

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका