शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याची विल्हेवाट तुम्हीच लावा! मनपाचे गृहनिर्माण सोसायट्यांना पत्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 20:44 IST

Garbage issue, nagpur newsवर्षभरापूर्वी कचरा वर्गीकरणाची सक्ती करूनही त्याची शहरात अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. याचा विचार करता मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १०० किलोहून अधिक कचरा निघणाऱ्या सोसायट्यांना कचऱ्याची तुम्हीच विल्हेवाट लावा, अशा आशयाचे पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देवर्षभरापूर्वीच केली होती सक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्षभरापूर्वी कचरा वर्गीकरणाची सक्ती करूनही त्याची शहरात अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. याचा विचार करता मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १०० किलोहून अधिक कचरा निघणाऱ्या सोसायट्यांना कचऱ्याची तुम्हीच विल्हेवाट लावा, अशा आशयाचे पत्र पाठविले आहे. यासाठी सुरुवातीला प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांची निवड करण्यात आली आहे. सोबतच शहरातील सर्वच मोठ्या सोसायट्यांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

शहरात दररोज ११०० मेट्रिक टन कचरा निघतो. परंतु ओला व सुका कचरा पूर्णपणे वेगवेगळा संकलित केला जात नाही. यातील फक्त २०० मेट्रिक टन कचरा वेगवेगळा संकलित केला जातो. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीचा करार संपुष्टात आल्यानंतर, महापालिकेने १६ नोव्हेंबर २०१९ पासून शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी ए. जी. एन्व्हायरो आणि बीव्हीजी या कंपन्यांना सोपविली आहे. त्यानुसार या दोन्ही कंपन्या दररोज शहरातून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे अपेक्षित होते. परंतु वर्षभरानंतरही यात अपेक्षित सुधारणा झालेली नाही.

प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांना पत्र

१०० किलोहून अधिक कचरा निघाणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याची विल्हेवाट स्वत: लावावयाची आहे. यासंदर्भात वर्षभरापूर्वीच मनपा प्रशासनाने निर्देश दिले होते. अशा सोसायट्यातील कचरा मनपा उचलणार नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु अजूनही बहुसंख्य सोसायट्यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा निर्माण केलेली नाही. त्यामुळे प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे.

कचऱ्यापासून खत निर्मिती करा

सोसाट्यांनी परिसरात ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित न केल्यास सुका कचरा उचलला जााणार नाही. अशी भूमिका मनपा प्रशासनाने घेतली होती. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केल्यास सोसायट्यांनाच यापासून आर्थिक लाभ होणार आहे. परंतु त्यानंतरही बहुसंख्य सोसायट्यात ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करत नाही.

दंडात्मक कारवाईचा दिला होता इशारा

ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित न केल्यास महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. परंतु दंडात्मक कारवाई झाली नाही. राज्यातील काही महापालिकांकडून सोसाट्यांना कचरा वर्गीकरण न केल्यास पाच हजारांचा दंड आकारला जात आहे

.महापालिकेने प्रत्येक झोनमधील दोन सोसायट्यांना पत्र पाठवून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले आहे. मनपाने स्वच्छता निरीक्षक नेमले आहेत. घरोघरी कचरा वर्गीकरणाचा संदेश पोहोचविणे व त्याची अंमलबजावणी कृतीमध्ये होणे अपेक्षित आहे. कचरा वर्गीकरणात दंडात्मक कारवाईपेक्षा नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त (घनकचरा) मनपा

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका