शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

ठग समीर जोशीविरुद्धचा खटला येत्या ऑगस्टपर्यंत निकाली काढा -  उच्च न्यायालय 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: February 12, 2024 18:52 IST

२ मार्च २०२२ रोजी उच्च न्यायालयाने हा खटला एक वर्षात निकाली काढण्याचा आदेश दिला होता.

नागपूर: विविध आकर्षक योजनांच्या माध्यमातून पाच हजारांवर गुंतवणूकदारांना २०० कोटींवर रुपयांनी लुबाडल्याचा आरोप असलेला श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी यांच्याविरुद्ध अकोला येथील विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित असलेला खटला येत्या ऑगस्टपर्यंत निकाली काढण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने दिला. २ मार्च २०२२ रोजी उच्च न्यायालयाने हा खटला एक वर्षात निकाली काढण्याचा आदेश दिला होता. परंतु, विविध कारणांमुळे हा खटला आतापर्यंत निकाली निघू शकला नाही. परिणामी, सत्र न्यायालयाने २९ जानेवारी २०२४ रोजी उच्च न्यायालयाला अर्ज सादर करून मुदत वाढवून मागितली होती. त्या अर्जावर न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यांनी सहा महिने मुदत वाढवून दिली.

घोटाळ्याचा मास्टरमाईंड जोशी गुंतवणूकदारांना वार्षिक २५ ते ४० टक्के परताव्याचे आमिष दाखवित होता. भोळ्याभाबड्या गुंतवणूकदारांना या मायाजालात फसविण्यासाठी त्याने अनेक एजंट नियुक्त केले होते. तो वेळोवेळी गुंतवणूक कार्यक्रम आयोजित करून नागरिकांना भूलवत होता. काही काळानंतर जोशीच्या आश्वासनानुसार गुंतवणूकदारांना परतावा व ठेवी भेटणे बंद झाल्यामुळे या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. १४ सप्टेंबर २०१३ रोजी सोमलवाडा येथील अमित मोरे यांनी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात जोशी व इतर आरोपींविरुद्ध पहिली तक्रार नोंदवली होती. त्यानंतर आरोपींविरुद्ध अकोला व अमरावती येथील पोलीस ठाण्यांतही एफआयआर दाखल झाले.

टॅग्स :nagpurनागपूरCourtन्यायालय