शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

नागपुरात आधार लिंकिंगच्या कामात सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 22:20 IST

नवीन रेशनकार्ड बनविण्यावरून नागरी अन्न पुरवठा विभागात सध्या सावळागोंधळ सुरू आहे. लॉकडाऊनदरम्यान नवीन रेशन कार्डधारकांच्या ऑनलाईन आधार लिंकिंगच्या प्रक्रियेत विभागाचा मनमानी कारभार सुरू असून, त्याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नवीन रेशनकार्ड बनविण्यावरून नागरी अन्न पुरवठा विभागात सध्या सावळागोंधळ सुरू आहे. लॉकडाऊनदरम्यान नवीन रेशन कार्डधारकांच्या ऑनलाईन आधार लिंकिंगच्या प्रक्रियेत विभागाचा मनमानी कारभार सुरू असून, त्याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे. नवीन रेशन कार्डधारकांना अन्न पुरवठा विभागाच्या झोन कार्यालयात दररोज हेलपाटे घालावे लागत असून, तासन्तास रांगेत उभे राहूनही त्यांचे काम होत नाही. ज्येष्ठ नागरिकांनाही हे हाल सहन करावे लागत आहे. या अवस्थेमुळे राज्य शासनाच्या अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण पोर्टलवर संतापलेल्या नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला आहे.पोर्टलवर तक्रार नोंदविणारे एक रेशन कार्डधारक सचिन खोब्रागडे यांनी विभागाद्वारे बेजबाबदार कारभार सुरू असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले, रेशन कार्डच्या आधार लिंकिं गच्या प्रक्रियेसाठी मर्यादित कालावधी व दिवसाचे प्रावधान असल्याची कुठलीही अधिसूचना शासनाने काढली नाही. असे असताना नागपूरच्या अन्न पुरवठा विभागात आधार लिंक प्रक्रियेचे काम केवळ सोमवार ते गुरुवारपर्यंत करण्यात येत आहे. शिवाय सकाळी ११ ते दुपारी २ वाजतापर्यंत वेळेची मर्यादा ठेवण्यात आली आहे, जेव्हा की नियमानुसार ऑनलाईन प्रक्रिया सायंकाळपर्यंत करता येणे शक्य आहे.लोकांच्या रांगा लागलेल्या असताना केवळ एका खिडकीतून काम केले जात आहे. विभागाच्या या मनमानीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे खोब्रागडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, रेशन कार्ड बनविल्याच्या तीन महिन्यानंतर आधार लिंकिंगचे काम सुरू करण्यात आले असून, यावरूनही विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. शासनाच्या नियमाविरोधात विभाग काम करीत असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला. उत्तर विभागाच्या झोन कार्यालयात येणाऱ्या समस्यांचा उल्लेख करीत, सर्व झोन कार्यालयात अशीच अव्यवस्था असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्येष्ठ नागरिकांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. धक्कादायक म्हणजे आधार लिंक झाले नसल्याने नवीन रेशन कार्डधारकांना धान्य वितरण बंद करण्यात आले आहे. ऑनलाईन डेटा उपलब्ध झाल्यानंतरच त्यांना धान्य पुरवठा होणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.लोकमतने प्रकाशात आणली परिस्थितीविशेष म्हणजे लोकमतने नुकतीच शहरातील २३४८ नवीन रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित असल्याचे वृत्त प्रकाशित करून विभागाच्या कारभाराची पोलखोल केली होती. प्रशासनाच्या बेजबाबदार कारभागारामुळे आधार लिंकिंगची प्रक्रिया अपूर्ण राहिली असून, नवीन कार्डधारकांना धान्य मिळेनासे झाले आहे. यामुळे गरीब कुटुंबांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डnagpurनागपूर