शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

नागपुरात आधार लिंकिंगच्या कामात सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 22:20 IST

नवीन रेशनकार्ड बनविण्यावरून नागरी अन्न पुरवठा विभागात सध्या सावळागोंधळ सुरू आहे. लॉकडाऊनदरम्यान नवीन रेशन कार्डधारकांच्या ऑनलाईन आधार लिंकिंगच्या प्रक्रियेत विभागाचा मनमानी कारभार सुरू असून, त्याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नवीन रेशनकार्ड बनविण्यावरून नागरी अन्न पुरवठा विभागात सध्या सावळागोंधळ सुरू आहे. लॉकडाऊनदरम्यान नवीन रेशन कार्डधारकांच्या ऑनलाईन आधार लिंकिंगच्या प्रक्रियेत विभागाचा मनमानी कारभार सुरू असून, त्याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे. नवीन रेशन कार्डधारकांना अन्न पुरवठा विभागाच्या झोन कार्यालयात दररोज हेलपाटे घालावे लागत असून, तासन्तास रांगेत उभे राहूनही त्यांचे काम होत नाही. ज्येष्ठ नागरिकांनाही हे हाल सहन करावे लागत आहे. या अवस्थेमुळे राज्य शासनाच्या अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण पोर्टलवर संतापलेल्या नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला आहे.पोर्टलवर तक्रार नोंदविणारे एक रेशन कार्डधारक सचिन खोब्रागडे यांनी विभागाद्वारे बेजबाबदार कारभार सुरू असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले, रेशन कार्डच्या आधार लिंकिं गच्या प्रक्रियेसाठी मर्यादित कालावधी व दिवसाचे प्रावधान असल्याची कुठलीही अधिसूचना शासनाने काढली नाही. असे असताना नागपूरच्या अन्न पुरवठा विभागात आधार लिंक प्रक्रियेचे काम केवळ सोमवार ते गुरुवारपर्यंत करण्यात येत आहे. शिवाय सकाळी ११ ते दुपारी २ वाजतापर्यंत वेळेची मर्यादा ठेवण्यात आली आहे, जेव्हा की नियमानुसार ऑनलाईन प्रक्रिया सायंकाळपर्यंत करता येणे शक्य आहे.लोकांच्या रांगा लागलेल्या असताना केवळ एका खिडकीतून काम केले जात आहे. विभागाच्या या मनमानीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे खोब्रागडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, रेशन कार्ड बनविल्याच्या तीन महिन्यानंतर आधार लिंकिंगचे काम सुरू करण्यात आले असून, यावरूनही विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. शासनाच्या नियमाविरोधात विभाग काम करीत असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला. उत्तर विभागाच्या झोन कार्यालयात येणाऱ्या समस्यांचा उल्लेख करीत, सर्व झोन कार्यालयात अशीच अव्यवस्था असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्येष्ठ नागरिकांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. धक्कादायक म्हणजे आधार लिंक झाले नसल्याने नवीन रेशन कार्डधारकांना धान्य वितरण बंद करण्यात आले आहे. ऑनलाईन डेटा उपलब्ध झाल्यानंतरच त्यांना धान्य पुरवठा होणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.लोकमतने प्रकाशात आणली परिस्थितीविशेष म्हणजे लोकमतने नुकतीच शहरातील २३४८ नवीन रेशनकार्डधारक धान्यापासून वंचित असल्याचे वृत्त प्रकाशित करून विभागाच्या कारभाराची पोलखोल केली होती. प्रशासनाच्या बेजबाबदार कारभागारामुळे आधार लिंकिंगची प्रक्रिया अपूर्ण राहिली असून, नवीन कार्डधारकांना धान्य मिळेनासे झाले आहे. यामुळे गरीब कुटुंबांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डnagpurनागपूर