शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

एकीकडे मोसंबी गळती दुसरीकडे सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 11:42 IST

काटोल नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारी मोसंबी व सोयाबीन दोन्ही नगदी पिके हातातून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून आता पुढे काय या विवंचनेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: काटोल नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारी मोसंबी व सोयाबीन दोन्ही नगदी पिके हातातून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून आता पुढे काय या विवंचनेत आहे. या नैसर्गिक आपत्तीत शासनाकडून हेक्टरी कमीत कमी एक लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे. काटोल नरखेड तालुक्यातील अंदाजे तीस हजार हेक्टर क्षेत्रावर निंबुवर्गीय संत्रा मोसंबीच्या फळबागा असुन नेहमी या पिकांना नगदी पीक म्हणून गणल्या जाते. परंतु सध्या काही विशिष्ट रोगांचे थैमान सुरू झाल्याने मोसंबी फळांची मोठ्या प्रमाणात गळती होताना दिसत आहे. यावर कुठल्याही प्रकारचे औषध काम करतनसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.येलो मोझॅक विषाणूंचा प्रादुर्भाव व बुरशीजन्य रोगाच्या प्रादुभार्वामुळे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकानेसुद्धा दगा दिला आहे. या संदर्भात पाहणी करण्यासाठी उद्यानविद्यावेत्ता, किटकशास्त्रज्ञ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, कृषी अधिक्षक डॉ मिलिंद शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे, तालुका कृषी अधिकारी कन्नाके, नरखेड तालुका कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे, काटोल पंचायत समिती सदस्य निलिमा ठाकरे, नरखेड पंचायत समिती सभापती निलिमा रेवतकर, वैभव दळवी, मनोज जवंजाळ, डॉ. अनिल ठाकरे, दिनेश मानकर, कृषी सहसंचालक डॉ. प्रज्ञा गोडघाटे आदींनी काटोल नरखेड तालुक्यातील शेतजमीनींची पाहणी केली.त्यावेळी मोसंबी फळे झाडावरच पिवळी पडून सडत आहे त्यामुळे जवळपास साठ ते सत्तर टक्के फळांची गळती झालेली दिसून येत आहे व आजपर्यंत अशी गळ कधीच पाहिलेली नसून इतिहासात प्रथमच या प्रकारची गळ पहाण्यात येत असल्याचे वयोवृद्ध शेतकऱ्यांनी सांगितले. बाहेरुन चांगली फळे दिसत आहे ती जरी बाहेरून चांगली दिसत असली तरी आतून सडलेली असल्याने ती बाजारात विकल्यानंतर एका दिवसात खराब होत असल्याने व्यापारी ती फळे परत पाठवत आहेत.

सदर बाब कृषी विद्यापीठाचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी व कृषी विभागाने संयुक्तपणे सर्वेक्षण करून हा हवेतून पसरणारा बुरशीजन्य विषाणू असून यावर मेटेलॅक्झील व मॅन्कोझेब किंवा फॉसीटील ए एल या औषधींची फवारणी करावी. त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर करुन तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. येत्या शनिवारी ५ सप्टेंबर रोजी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नुकसानग्रस्त फळबाग व शेतजमीनींना भेट देऊन पाहणी करणार आहेत. 

टॅग्स :agricultureशेती