शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

एकीकडे मोसंबी गळती दुसरीकडे सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 11:42 IST

काटोल नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारी मोसंबी व सोयाबीन दोन्ही नगदी पिके हातातून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून आता पुढे काय या विवंचनेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: काटोल नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारी मोसंबी व सोयाबीन दोन्ही नगदी पिके हातातून गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून आता पुढे काय या विवंचनेत आहे. या नैसर्गिक आपत्तीत शासनाकडून हेक्टरी कमीत कमी एक लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे. काटोल नरखेड तालुक्यातील अंदाजे तीस हजार हेक्टर क्षेत्रावर निंबुवर्गीय संत्रा मोसंबीच्या फळबागा असुन नेहमी या पिकांना नगदी पीक म्हणून गणल्या जाते. परंतु सध्या काही विशिष्ट रोगांचे थैमान सुरू झाल्याने मोसंबी फळांची मोठ्या प्रमाणात गळती होताना दिसत आहे. यावर कुठल्याही प्रकारचे औषध काम करतनसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.येलो मोझॅक विषाणूंचा प्रादुर्भाव व बुरशीजन्य रोगाच्या प्रादुभार्वामुळे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकानेसुद्धा दगा दिला आहे. या संदर्भात पाहणी करण्यासाठी उद्यानविद्यावेत्ता, किटकशास्त्रज्ञ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, कृषी अधिक्षक डॉ मिलिंद शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे, तालुका कृषी अधिकारी कन्नाके, नरखेड तालुका कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे, काटोल पंचायत समिती सदस्य निलिमा ठाकरे, नरखेड पंचायत समिती सभापती निलिमा रेवतकर, वैभव दळवी, मनोज जवंजाळ, डॉ. अनिल ठाकरे, दिनेश मानकर, कृषी सहसंचालक डॉ. प्रज्ञा गोडघाटे आदींनी काटोल नरखेड तालुक्यातील शेतजमीनींची पाहणी केली.त्यावेळी मोसंबी फळे झाडावरच पिवळी पडून सडत आहे त्यामुळे जवळपास साठ ते सत्तर टक्के फळांची गळती झालेली दिसून येत आहे व आजपर्यंत अशी गळ कधीच पाहिलेली नसून इतिहासात प्रथमच या प्रकारची गळ पहाण्यात येत असल्याचे वयोवृद्ध शेतकऱ्यांनी सांगितले. बाहेरुन चांगली फळे दिसत आहे ती जरी बाहेरून चांगली दिसत असली तरी आतून सडलेली असल्याने ती बाजारात विकल्यानंतर एका दिवसात खराब होत असल्याने व्यापारी ती फळे परत पाठवत आहेत.

सदर बाब कृषी विद्यापीठाचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी व कृषी विभागाने संयुक्तपणे सर्वेक्षण करून हा हवेतून पसरणारा बुरशीजन्य विषाणू असून यावर मेटेलॅक्झील व मॅन्कोझेब किंवा फॉसीटील ए एल या औषधींची फवारणी करावी. त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर करुन तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. येत्या शनिवारी ५ सप्टेंबर रोजी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नुकसानग्रस्त फळबाग व शेतजमीनींना भेट देऊन पाहणी करणार आहेत. 

टॅग्स :agricultureशेती