शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
4
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
5
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
6
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
7
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
8
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
9
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
10
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
11
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
12
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
13
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
14
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
15
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
16
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
17
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
18
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
19
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
20
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल

अर्थसंकल्पामुळे हॉटेल, पर्यटन, प्रवास व्यावसायिकांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:57 IST

मेहा शर्मा नागपूर : गेल्यावर्षी कोरोना संक्रमणामुळे लागू झालेले लॉकडाऊन हॉटेल, प्रवास व पर्यटन व्यवसायासाठी नुकसानकारक ठरले. या व्यवसायाला ...

मेहा शर्मा

नागपूर : गेल्यावर्षी कोरोना संक्रमणामुळे लागू झालेले लॉकडाऊन हॉटेल, प्रवास व पर्यटन व्यवसायासाठी नुकसानकारक ठरले. या व्यवसायाला पूर्वपदावर आणण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली जाईल अशी अपेक्षा होती, परंतु, त्यांची निराशा झाली.

यासंदर्भात हॉटेल सेंटर पॉईंटचे मालक मिक्की अरोरा म्हणाले, केंद्र सरकारला आमचा पूर्णत: विसर पडला. आम्हाला बँकेकडून व मालमत्ता करामध्ये काहीच दिलासा मिळाला नाही. हॉटेल व्यवसायामध्ये मोठ्या संख्येत मनुष्यबळ वापरले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अनेकांना रोजगार मिळतो. कोरोनामुळे या व्यवसायाला वाईट दिवस पाहावे लागले. असे असताना आम्हाला अर्थसंकल्पात काहीच लाभ देण्यात आला नाही. सरकारने आदरातिथ्य व सेवा क्षेत्राबाबत उदासीनता दाखविली. सरकारने केवळ मुंबईसारख्या शहरांना अधिक महत्त्व देऊन मालमत्ता कर माफ केला आहे. या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, पण सरकारने निराशा केली.

तुली इम्पेरियल हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक कुक्कू तुली यांनीही समान मत व्यक्त केले. सरकारने हाॅटेल व्यवसायाला जोरदार धक्का दिला. वर्तमान काळात ३५ ते ४० टक्के व्यवसाय करणेही कठीण झाले आहे. या अर्थसंकल्पामध्ये जीएसटी व मालमत्ता करामध्ये सवलत मिळण्याची अपेक्षा होती. तसेच, प्रवास उद्योगाला उभारी देण्यासाठी ठोस तरतूद केली जाईल असे वाटत होते. परंतु, तसे काहीच झाले नाही असे तुली यांनी सांगितले.

ट्रॅव्हल एजन्टही या अर्थसंकल्पामुळे नाराज झाले आहेत. नोवा ट्रॅव्हल्सचे सीईओ व ट्रॅव्हल एजन्टस असोसिएशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय समिती सदस्य गुरमित विज म्हणाले, प्रवास उद्योग अतिशय महत्त्वपूर्ण असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळते. परंतु, यावर्षीचा अर्थसंकल्प या उद्योगाची निराशा करणारा आहे. एवढा मोठा उद्योग असताना त्याकरिता एक रुपयाचीही तरतूद करण्यात आली नाही. या अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा होत्या. पर्यटन जीएसटी व करामध्ये सवलत दिली जाईल, असे वाटत होते.

जॅक्सन ट्रॅव्हलचे मालक हरमनदीप आनंद यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली. कोरोनाचा फटका सर्वात आधी प्रवास उद्योगाला बसला. असे असताना या उद्योगाला सावरण्यासाठी काहीच करण्यात आले नाही. तसेच, इतर उद्योग वाढल्याशिवाय प्रवास उद्योग पूर्वपदावर येऊ शकत नाही. प्रवास करण्यासाठी नागरिकांना रोजगार व पैसे मिळणे आवश्यक आहे. खासगी कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. त्याचा हॉटेल व प्रवास उद्योगावर १०० टक्के प्रभाव पडला आहे. त्यामुळे या उद्योजकांना कर्मचारी कमी करावे लागले किंवा त्यांच्या वेतनात कपात करावी लागली. या उद्योगांना रुळावर येण्याकरिता आणखी एक-दोन वर्षे लागतील. हॉटेल व प्रवास उद्योगाने आत्मनिर्भर व्हावे, अशी सरकारची इच्छा आहे. सर्वांनी हेच केले पाहिजे. आपण कुणाच्याही मदतीशिवाय पुन्हा उभे राहायला हवे, अशी भूमिका आनंद यांनी मांडली.