शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भांडणात दोघांचेही नुकसान, तरीही वाद करतातच : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 20:20 IST

आपापसातील भांडणात दोघांचेही नुकसान होईल हे कळत असतानादेखील वाद करणे सोडत नाहीत. अहंकार सोडायला लोकांना भीती वाटते, असे प्रतिपादन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्याच दिल्या.

ठळक मुद्देभाजप-शिवसेनेच्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षणातून व्यक्तीला विविध गोष्टींची जाण येते, परंतु त्याची अंमलबजावणी अनेकदा होताना दिसत नाही. निसर्गाला नष्ट केले तर आपणदेखील नष्ट होऊ हे सर्वांनाच माहीत असते. स्वार्थ खराब आहे हे जाणतात, पण स्वार्थ सोडू शकत नाही. त्याचप्रमाणे आपापसातील भांडणात दोघांचेही नुकसान होईल हे कळत असतानादेखील वाद करणे सोडत नाहीत. अहंकार सोडायला लोकांना भीती वाटते, असे प्रतिपादन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्याच दिल्या. मंगळवारी सातव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शिक्षण परिषदेचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी मंचावर ‘सुपर-३०’चे संस्थापक आनंद कुमार, ‘साऊथ पॉईंट’ शाळेचे संचालक देवेन दस्तुरे प्रामुख्याने उपस्थित होते. शिक्षणप्रणालीतून विकास अपेक्षित आहे. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या कौशल्यातून मोठी होऊ शकते. मनुष्य आपल्या विचारांनी ईश्वर किंवा राक्षस बनू शकतो. त्याच्या विचारांना दिशा देण्याचे काम शिक्षणप्रणालीतून झाले पाहिजे. अहंकारामुळे स्वामित्वाची भावना जागते. या जगात प्रत्येक गोष्टीचे प्रयोजन आहे. त्यामुळे कुणालाच क्षुल्लक लेखता कामा नये, असे डॉ.भागवत म्हणाले. यावेळी आनंद कुमार यांना ‘सर्वोत्तम नचिकेता पुरस्कार’ तर नीरु कपाई व मुक्ता चॅटर्जी यांना नचिकेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिक्षण हा एक उदात्त व्यवसाय आहे, आणि शिक्षक प्रत्येकाच्या जीवनात एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. वंचित मुलांच्या उत्कर्षासाठी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार समर्पित आहे, असे आनंदकुमार यावेळी म्हणाले. डॉ.मृणालिनी दस्तुरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मंचावर ज्येष्ठ संपादक विजय फणशीकर, राजेश घई, रसिका दस्तुरे, प्रकाश सोमलवार, कांचन नायडू, डॉ.सतीश सुळे, गिरीश देवधर, डॉ.राजीव मोहता, एस. प्रभूरामन, रिता अग्रवाल, डॉ.रझिया हुसैन, आभा मेघे, माला चेम्बथ, कनिका आनंद, श्रद्धा केळापुरे, समता वासुदेवा प्रामुख्याने उपस्थित होते. रिना दर्गन यांनी संचालन केले.वर्गखोल्यांतीलच शिक्षण सर्वकाही नाहीयावेळी डॉ. भागवत यांनी शिक्षणप्रणालीवरदेखील भाष्य केले. शिक्षणामुळे व्यक्तीचा ‘मी’पणा दूर झाला पाहिजे. मर्यादा शिकविणारी शिक्षणप्रणाली आवश्यक आहे. अनुभवांवर आधारित शिक्षण आयुष्यभर टिकते. केवळ वर्गखोल्यांतीलच शिक्षण सर्वकाही नाही. शिक्षणातून निर्भय, प्रामाणिक व आयुष्यातील खरा आनंद मिळविणारा विद्यार्थी तयार झाला पाहिजे. ही जबाबदारी शिक्षणसंस्थांची आहे, असे डॉ.भागवत म्हणाले.सत्ताधारी चूप करतातयावेळी डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या खास शैलीत नचिकेतचे उदाहरण देत सत्ताधाऱ्यांनादेखील चिमटा काढला. वडील मुलाला व सत्ताधारी समोरच्यांना चूप करण्याचा प्रयत्न करतात, असे वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्याचा नेमका रोख कुणाकडे होता यासंदर्भात विविध कयास लावण्यात येत आहेत.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपाShiv Senaशिवसेना