शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिलीपकुमार सानंदांकडून दहा लाख रुपये वसूल करा

By admin | Updated: December 22, 2015 04:42 IST

दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००६ मध्ये माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व त्यांच्या कुटुंबीयांना एका

नागपूर : दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००६ मध्ये माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व त्यांच्या कुटुंबीयांना एका फौजदारी प्रकरणात अवैधरीत्या संरक्षण प्रदान केले होते. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनावर १० लाख रुपये दावा खर्च बसवला होता. शासनाने हा खर्च सर्वोच्च न्यायालयात जमा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी सोमवारी हे १० लाख रुपये सानंदा यांच्याकडून वसूल करावे असे निर्देश शासनाला दिलेत.सर्वोच्च न्यायालयाने सानंदा कुटुंबीयांशी संबंधित ‘महाराष्ट्र शासन व इतर वि. सारंगधरसिंग चव्हाण व इतर’ प्रकरणात शासनावर खर्च बसवला होता. हे प्रकरण केवळ सानंदा कुटुंबामुळे निर्माण झाले होते, पण शेवटी पैसे मात्र शासनाला भरावे लागले. शासनाकडील पैसे करदात्यांचे आहेत. यामुळे सानंदा यांनी संबंधित रक्कम शासनाला परत करणे आवश्यक आहे अशी भूमिका उच्च न्यायालयाने घेऊन वरीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात सानंदा यांनी न्यायालयाच्या निर्देशावरून उत्तर सादर करून या रकमेची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला होता.(प्रतिनिधी)अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलादिलीपकुमार सानंदा यांनी खामगाव नगर परिषदेतील घोटाळा प्रकरणात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच, सानंदा यांना दोन दिवसांत पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. २००६-०७ मध्ये खामगाव नगर परिषदेने प्रशासकीय इमारतीसाठी आर्किटेक्टकडून नकाशे मागविले होते. नाशिक येथील काबरे अ‍ॅन्ड चौधरी कंपनीचे नकाशे स्वीकारण्यात आले. नामनिर्देशित सदस्य संदीप वर्मा यांनी या आर्किटेक्टचे दर तुलनेने जास्त असल्यामुळे नगर परिषदेचे ३९ लाख ४२ हजार १६९ रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करून हे प्रकरण लावून धरले. यामुळे पोलिसांनी सानंदा यांच्यासह एकूण सात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०८, ४०९, ४१७, ४६५, ४६६, ४६८ अन्वये एफआयआर नोंदविला. याप्रकरणात खामगाव सत्र न्यायालयाने १० नोव्हेंबर २०१४ रोजी सानंदा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाला ‘महाराष्ट्र शासन व इतर वि. सारंगधरसिंग चव्हाण व इतर’ प्रकरणात सानंदा यांच्या चुकीसाठी शासनाने १० लाख रुपये दावा खर्च भरण्याचा मुद्दा खटकला होता.अनिल नावंदरांनाही दणकाउच्च न्यायालयाने खामगाव नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य अनिल नावंदर यांनाही दणका दिला आहे. नावंदर यांचा सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्धचा अर्ज खारीज करण्यात आला आहे. तक्रारकर्ते वर्मा यांच्या अर्जावर जेएमएफसी न्यायालयाने साक्षीदार सादर करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाविरुद्ध नावंदर यांनी सत्र न्यायालयात पुनर्विचार अर्ज दाखल केला होता. परंतु, सत्र न्यायालयाने नावंदर यांना दिलासा न देता याप्रकरणात गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. परिणामी नावंदर यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने सानंदा व नावंदर यांच्या अर्जांवर एकत्र सुनावणी करून सोमवारी निर्णय दिला.अखेर सत्याचाच विजय होईलउच्च न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही सन्मान करतो; मात्र या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगनादेश मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. शेवटी न्यायपालिकेसमोर सत्याचाच विजय होवून, प्रत्येक आरोपामध्ये न्यायालयाने क्लिनचीट दिली आहे. याप्रकरणीसुध्दा सत्याचाच विजय होईल. - दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार