शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

दीक्षाभूमी ही आवळेबाबूंच्या परिश्रमाचे फलित

By admin | Updated: June 19, 2016 02:53 IST

जगभरातील शोषित, वंचितांची ऊर्जाभूमी व प्रेरणाभूमी म्हणून दीक्षाभूमीची ओळख आहे.

डॉ. आंबेडकर अध्यासन : परिसंवादात वक्त्यांचा सूरनागपूर : जगभरातील शोषित, वंचितांची ऊर्जाभूमी व प्रेरणाभूमी म्हणून दीक्षाभूमीची ओळख आहे. आज दीक्षाभूमी उभी आहे ती केवळ अ‍ॅड. हरीदासबाबू आवळे यांच्यामुळेच. दीक्षाभूमी ही खऱ्या अर्थाने आवळेबाबूंच्या परिश्रमाचे फलित आहे, असा सूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे आयोजित विशेष परिसंवादातील वक्त्यांनी काढला. कर्मवीर अ‍ॅड. हरीदास बाबू आवळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे रामदासपेठ येथील डॉ. आंबेडकर विचारधारा विभागात शनिवारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत कर्मवीर अ‍ॅड. हरिदास बाबू आवळे यांचे योगदान’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम प्रमुख अतिथी होते, तर भालचंद्र लोखंडे, कर्मवीर आवळे बाबू विचार प्रबोधन मंचचे अध्यक्ष विनायक जामगडे आणि डॉ. चंद्रशेखर पाटील हे वक्ते होते. पूरणचंद्र मेश्राम म्हणाले,दीक्षाभूमीसाठी आवळेबाबू यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच आज दीक्षाभूमी उभी राहू शकली. आंबेडकरी चळवळीतील नायकांचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा नायकांवर संशोधन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विजय जामगडे म्हणाले, ज्यावेळी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा आवळेबाबू मध्यप्रांतातील अतिशय दुर्गम भागात चळवळीचे काम करीत होते. त्यांच्यापर्यंत उशिरा माहिती मिळाली. कुठलेही साधन नसल्याने त्यांना परिनिर्वाणाला उपस्थित राहता आले नाही, परंतु त्याचा बाऊ करण्यात आला. मात्र ते डगमगले नाही. शेवटपर्यंत चळवळीचेच कार्य करीत राहिले. डॉ. पाटील व भालचंद्र लोखंडे यांनीही आवळे बाबू यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. योगानंद बलरामजी टेंभुर्णे यांनी आवळेबाबू यांच्यावर कविता सादर केली. डॉ. रमेश शंभरकर यांनी प्रास्ताविक व संचालन केले. प्रा. शैलेंद्र धोंगडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)चळवळीतील शिलेदारांच्या कार्यातून तरुणांना मिळेल ऊर्जा आंबेडकरी चळवळ सध्या संक्रमणावस्थेत आहे. तिला ऊर्जा प्राप्त करून देण्याची गरज आहे. यासाठी साहित्य, सभा व विविध माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि चळवळीतील शिलेदारांच्या कार्याची माहिती पोहोचवण्याची गरज आहे. या शिलेदारांच्या कार्यातून तरुण पिढीला ऊर्जा मिळेल, आणि त्यातून चळवळ पुन्हा नव्या जोमाने गतिमान होईल, अशी अपेक्षा डॉ. प्रदीप आगलावे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली.