शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमी ही आवळेबाबूंच्या परिश्रमाचे फलित

By admin | Updated: June 19, 2016 02:53 IST

जगभरातील शोषित, वंचितांची ऊर्जाभूमी व प्रेरणाभूमी म्हणून दीक्षाभूमीची ओळख आहे.

डॉ. आंबेडकर अध्यासन : परिसंवादात वक्त्यांचा सूरनागपूर : जगभरातील शोषित, वंचितांची ऊर्जाभूमी व प्रेरणाभूमी म्हणून दीक्षाभूमीची ओळख आहे. आज दीक्षाभूमी उभी आहे ती केवळ अ‍ॅड. हरीदासबाबू आवळे यांच्यामुळेच. दीक्षाभूमी ही खऱ्या अर्थाने आवळेबाबूंच्या परिश्रमाचे फलित आहे, असा सूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे आयोजित विशेष परिसंवादातील वक्त्यांनी काढला. कर्मवीर अ‍ॅड. हरीदास बाबू आवळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे रामदासपेठ येथील डॉ. आंबेडकर विचारधारा विभागात शनिवारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत कर्मवीर अ‍ॅड. हरिदास बाबू आवळे यांचे योगदान’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम प्रमुख अतिथी होते, तर भालचंद्र लोखंडे, कर्मवीर आवळे बाबू विचार प्रबोधन मंचचे अध्यक्ष विनायक जामगडे आणि डॉ. चंद्रशेखर पाटील हे वक्ते होते. पूरणचंद्र मेश्राम म्हणाले,दीक्षाभूमीसाठी आवळेबाबू यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच आज दीक्षाभूमी उभी राहू शकली. आंबेडकरी चळवळीतील नायकांचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा नायकांवर संशोधन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विजय जामगडे म्हणाले, ज्यावेळी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा आवळेबाबू मध्यप्रांतातील अतिशय दुर्गम भागात चळवळीचे काम करीत होते. त्यांच्यापर्यंत उशिरा माहिती मिळाली. कुठलेही साधन नसल्याने त्यांना परिनिर्वाणाला उपस्थित राहता आले नाही, परंतु त्याचा बाऊ करण्यात आला. मात्र ते डगमगले नाही. शेवटपर्यंत चळवळीचेच कार्य करीत राहिले. डॉ. पाटील व भालचंद्र लोखंडे यांनीही आवळे बाबू यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. योगानंद बलरामजी टेंभुर्णे यांनी आवळेबाबू यांच्यावर कविता सादर केली. डॉ. रमेश शंभरकर यांनी प्रास्ताविक व संचालन केले. प्रा. शैलेंद्र धोंगडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)चळवळीतील शिलेदारांच्या कार्यातून तरुणांना मिळेल ऊर्जा आंबेडकरी चळवळ सध्या संक्रमणावस्थेत आहे. तिला ऊर्जा प्राप्त करून देण्याची गरज आहे. यासाठी साहित्य, सभा व विविध माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि चळवळीतील शिलेदारांच्या कार्याची माहिती पोहोचवण्याची गरज आहे. या शिलेदारांच्या कार्यातून तरुण पिढीला ऊर्जा मिळेल, आणि त्यातून चळवळ पुन्हा नव्या जोमाने गतिमान होईल, अशी अपेक्षा डॉ. प्रदीप आगलावे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली.