शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

‘दिग्विजय’ दिवसाकडे अनेक महाविद्यालयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:57 IST

शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाला ११ सप्टेंबर रोजी सव्वाशे वर्षे पूर्ण झाली. या ‘दिग्विजय’ दिवसाकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे निर्देश असतानादेखील अनेक महाविद्यालयांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. स्वामी विवेकानंदांच्या त्या भाषणाचे वाचन करण्यासाठी वेळ काढण्याची तसदीदेखील महाविद्यालयांनी घेतली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : स्वामी विवेकानंदांच्या भाषणाचे वाचन करण्यासाठी पुढाकारच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाला ११ सप्टेंबर रोजी सव्वाशे वर्षे पूर्ण झाली. या ‘दिग्विजय’ दिवसाकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे निर्देश असतानादेखील अनेक महाविद्यालयांनी पाठ फिरविल्याचे चित्र होते. स्वामी विवेकानंदांच्या त्या भाषणाचे वाचन करण्यासाठी वेळ काढण्याची तसदीदेखील महाविद्यालयांनी घेतली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे भाषण केले होते व भारताची ख्याती जगभरात गेली होती. या भाषणाला सव्वाशे वर्षे होत असल्यामुळे देशभरातील अनेक ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद हे युवावर्गाचे आदर्श आहेत. त्यामुळे नागपूर विद्यापीठातदेखील हा दिवस साजरा व्हायला पाहिजे, असा प्रस्ताव डॉ. निरंजन देशकर यांनी व्यवस्थापन परिषदेसमोर मांडला. या प्रस्तावाला सदस्यांनी अनुमोदन दिले व व्यवस्थापन परिषदेने हा प्रस्ताव संमत केला.त्यानुसार विद्यापीठाने २ सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी केले व हा दिवस नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभाग, संचालित महाविद्यालये व संलग्नित महाविद्यालयांमध्ये साजरा करण्याचे निर्देश दिले. महाविद्यालयांना विद्यार्थी विकास संचालक डॉ. दिलीप कावडकर यांनी पत्रदेखील पाठविले. यादिवशी विवेकानंद यांच्या त्या भाषणाचे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वाचन करण्याचे निर्देश देण्यात आले.मंगळवारी काही महाविद्यालयांनी यासंदर्भात तयारी केली होती व वेळापत्रकानुसार विद्यार्थी, शिक्षकांच्या उपस्थितीत त्या ऐतिहासिक भाषणाचे वाचनदेखील झाले. मात्र अनेक महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या निर्देशाकडे चक्क पाठच फिरविली. कुठल्याही प्रकारे भाषणाचे वाचन झाले नाही व याबाबत शिक्षक, विद्यार्थ्यांना कल्पनादेखील देण्यात आली नव्हती. विद्यापीठाच्या काही विभागांमध्येदेखील अशीच स्थिती होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.वर्ग झाले, वाचन नाहीकाही महाविद्यालयांत स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचे नावापुरते वाचन झाले. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित असताना त्यांना वर्गातून बोलविण्याची तसदी न घेता केवळ काही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भाषणाची औपचारिकता आटोपण्यात आली.कारवाई काय करणार ?परिपत्रकानुसार विद्यापीठातील सर्व विभाग व महाविद्यालयात ‘दिग्विजय दिवस’ साजरा करण्यात यावा, असे स्पष्ट करण्यात आले होते. या आयोजनाचा अहवाल विभाग व महाविद्यालयांना छायाचित्रांसह विद्यार्थी विकास विभागाच्या संचालकांकडे पाठवायचा आहे, असे स्पष्ट केले होते. याबाबत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिलीप कावडकर यांच्याशी संपर्क केला असता काही महाविद्यालये व विभागांचेच अहवाल प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व महाविद्यालयांना १२ सप्टेंबरपर्यंत अहवाल पाठवायचे आहे. जी महाविद्यालये अहवाल पाठविणार नाहीत, त्यांना आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावू असे त्यांनी सांगितले. मात्र कुठली ठोस कारवाई होईल का याबाबत त्यांनी सध्या सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

 

टॅग्स :Swami Vivekanandaस्वामी विवेकानंदRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ