शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

‘डिजिटल डेटाबेस’ काळाची गरज; टी.श्रीनिवासु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 11:54 IST

‘डिजिटल डेटाबेस’ ही काळाची गरज असून याचा फायदा विद्यार्थी व विद्यापीठांनादेखील निश्चितच मिळेल, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.टी.श्रीनिवासु यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘नीरी’त जुवारकर स्मृती व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजच्या काळात तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. वनस्पतीशास्त्रात ‘डाटाबेस’ला असाधारण महत्त्व आहे. देशभरातील विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. त्यामुळे ‘डिजिटल डेटाबेस’ ही काळाची गरज असून याचा फायदा विद्यार्थी व विद्यापीठांनादेखील निश्चितच मिळेल, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.टी.श्रीनिवासु यांनी व्यक्त केले.  ‘नीरी’तर्फे (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) आयोजित करण्यात आलेल्या डॉ.अशोक जुवारकर स्मृती व्याख्यानाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.‘इलेक्ट्रॉनिक हर्बेरिअम अ‍ॅन्ड डिजिटल बायोडायव्हर्सिटी डाटाबेस आॅफ नागपूर’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.‘नीरी’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘नीरी’च्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.साधना रायलु, मुख्य वैज्ञानिक डॉ.ए.एन.वैद्य व वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे हेदेखील प्रामुख्याने उपस्थित होते. ‘डिजिटल हर्बेरिअम’चे अनेक फायदे आहे. यामुळे वैज्ञानिक संवाददेखील प्रस्थापित होण्यास मदत होते. जगभरात वनस्पतीशास्त्राचा ‘डेटाबेस’ विकसित करण्यासाठी ‘डेल्टा’हे ‘सॉफ्टवेअर’ वापरण्यात येत आहे, अशी माहिती डॉ.टी.श्रीनिवासु यांनी दिली.राज्यामध्ये मुंबईत सर्वात जास्त जैविक विविधता आहे व तेथे १६५ विविध प्रकारच्या वनस्पतींच्या शाखा आढळून येतात. नागपुरात हेच प्रमाण १२० इतके आहे. नागपूर व मुंबईत वैद्यकीय गुण असलेली ‘स्पिजेलिआ अ‍ॅन्थेल्मिआ’ ही वनस्पतीदेखील आढळली आहे. नागपूर, मुंबई व चंद्रपूर येथील वनस्पतींचा ‘डिजिटल डेटाबेस’ तयार करण्यात आला आहे, असेदेखील त्यांनी सांगितलेयावेळी डॉ.साधना रायलु यांनी डॉ.अशोक जुवारकर यांच्या मौलिक कार्यावर प्रकाश टाकला. डॉ.जुवारकर यांच्या संशोधनामुळे कृषी व पर्यावरण क्षेत्राला नवीन दिशा मिळाली असे त्या म्हणाल्या. आकांक्षा यांनी संचालन केले तर प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.