शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

राज्यातील अवयवदान मोहिमेला आरटीओचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 09:51 IST

आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेता राज्य परिवहन विभागाने अवयवदानासंदर्भात राबविलेली मोहीम अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. त्यामुळे गडकरी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी परिवहन विभागाने कंबर कसणे तितकेच आवश्यक आहे.

ठळक मुद्देगडकरींचे स्वप्न कसे पूर्ण होणार ? अद्याप मोहीम बाल्यावस्थेतच,परवाना अर्जातील अवयवदानाच्या इच्छेकडे लक्ष वेधणे आवश्यक

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील रस्ते अपघातांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू होतो. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नरत आहेतच. परंतु सोबतच मृत्यू पडलेल्यांच्या अवयवांचे निर्धारित वेळेत दान व्हावे, यासाठी गडकरी यांनी एक चांगली संकल्पना मांडली आहे. एखाद्या व्यक्तीला अवयवदान करावयाचे असल्यास तशी नोंद वाहन परवान्यातच केली जाईल, अशाप्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी रतन टाटा यांच्याशीदेखील बोलणी केली असून, त्यांचा सकारात्मक पुढाकार ऐतिहासिक व स्वागतार्ह ठरणार आहे. परंतु आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेता राज्य परिवहन विभागाने अवयवदानासंदर्भात राबविलेली मोहीम अद्यापही बाल्यावस्थेतच आहे. त्यामुळे गडकरी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी परिवहन विभागाने कंबर कसणे तितकेच आवश्यक आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन विभागाने यापूर्वीच तत्परता दाखविली असती तर परवान्याच्या माध्यमातून मोठ्या संख्येत लोकांना अवयवदान करणे शक्य झाले असते. राज्य परिवहन विभागाने २०१३ पासून अवयवदानाची मोहीम हाती घेतली, मात्र ती जबाबदारीपूर्वक राबविण्यात आली नसल्याने आजही ती बाल्यावस्थेतच आहे. विशेष म्हणजे, वाहन परवानाच्या आॅनलाईन अर्जात ‘अपघाती मृत्यू झाल्यास मी माझे अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त करतो’ असे शपथपत्र दिले आहे. मात्र, बहुसंख्य अर्जदार याकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे वास्तव आहे.

राज्यात वर्षभरात दिले ३१ लाख ६५ हजार परवाने४परिवहन विभागांतर्गत येणाऱ्या ५० आरटीओ कार्यालयांमधून रोज साधारण सात ते आठ हजार शिकाऊ वाहन परवाने दिले जातात. एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत २० लाख ९५ हजार ८८९ शिकाऊ परवाने देण्यात आले, तर याच कालावधीत १० लाख ६९ हजार २१६ पक्के परवाने देण्यात आले. या दोन्ही परवान्यांची बेरीज ३१ लाख ६५ हजारावर जाते. परवान्याच्या अर्जात अवयवदान करण्यास इच्छुक आहात किंवा नाही, अशी अट टाकल्यास व परवान्यावर तशी नोंद घेतल्यास अवयवदानाच्या चळवळीला गती देणे सहज शक्य आहे.

पाच लाख रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत४भारतात हजारो लोक अवयवदानासाठी दात्यांच्या प्रतीक्षेत आयुष्याचे अखेरचे क्षण मोजत आहेत. सद्यस्थितीत देशभरात सुमारे पाच लाख रुग्ण मूत्रपिंड, ५० हजार रुग्ण यकृत आणि दोन हजाराहून अधिक रुग्ण विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे शासनाकडून अवयवदान चळवळीची व्यापक जनजागृती व चोख व्यवस्थापन होणे महत्त्वाचे झाले आहे.

२०१३ मध्ये सुरू झालेली योजना पडली बंदराज्य परिवहन विभागाने २०१३ मध्ये नवीन वाहन परवाना काढताना उमेदवाराला ‘आरटीओ’ कार्यालयात अवयवदानाची शपथ देण्याचे, अवयवदान करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून तसा अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते. याची सुरुवात मुंबईच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) होऊन सर्व कार्यालयांमध्ये सुरू झाली. परंतु अर्ज भरण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू होताच ही मोहिमच बंद पडली.

एक ब्रेनडेड व्यक्ती १० रुग्णाला जीवनदान देऊ शकतेमेंदूमृत दात्याला हृदय, हृदयाच्या झडपा, फफ्फुस, मूत्रपिंड, त्वचा, डोळे, यकृत, स्वादूपिंड, आतडी, कानाचे ड्रम आदी अवयवदान करता येतात. यामुळे एक मेंदूमृत व्यक्ती साधारण १० रुग्णांना जीवनदान देऊ शकतो. यामुळे मृत्यूनंतर चिमूटभर राख होऊन संपून जाण्यापेक्षा, एका जीवनज्योतीने दुसरी ज्योत तेवत राहण्यास मदत करणे, हे महान कार्य आहे. यात प्रत्येकाने समोर यायला हवे.-डॉ. मकरंद व्यवहारेविभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग

एक टक्काही मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान झाल्यास प्रतीक्षाच संपेललोकसंख्येत चीननंतर भारताचा क्रमांक लागतो. परंतु अवयवदानात स्पेन आणि कुएशियासारख्या लहान देशांच्या तुलनेत भारत कुठेही नाही. स्पेनमध्ये प्रत्येक १० लाख लोकसंख्येमागे एक मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान होत असून याचा टक्का ३५ टक्के आहे. भारतात मात्र ४० लाख लोकसंख्येमागे एकच अवयवदान होते. भारतात अपघाताच्या मृत्यूचा आकडा मोठा आहे. यातील एक टक्काही मेंदूमृत रुग्णाचे अवयवदान झाल्यास अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना अवयव मिळू शकतील.-डॉ. रवी वानखेडेसचिव, विभागीय प्रत्यारोपण समिती

वर्षाला ५०० हून अधिक ब्रेनडेड रुग्ण४इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) वर्षाला सुमारे १८०० शवविच्छेदन होतात. यातील साधारण ५०० वर रुग्ण ‘ब्रेनडेड’ असतात. यामुळे आधीच अवयवदानाची इच्छा व्यक्त झाल्यास व परवान्यासारख्या शासकीय कागदपत्रावर तशी नोंद राहिल्यास मोठ्या संख्येत अवयवदान होऊ शकेल, अशी माहिती न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी दिली.

आरटीओचे कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने होण्यासाठी आणि उमेदवारांच्या सोयीसाठी राज्यभरात शिकाऊ व पक्क्या वाहन परवान्यासाठी आनॅलाईन अर्ज भरून ‘अपॉर्इंटमेंट’ घेण्याची योजना २०१४ पासून सक्तीची केली. या अर्जातच अवयवदानाचे शपथपत्र दिले आहे. यात अर्जदाराची इच्छा असेल तर ‘टीक’ करावे, अशी सूचना आहे. परंतु तसे नाही केले तरी अर्जदाराला समोर जाता येते. यामुळे त्याकडे कुणीच पाहत नाही. महत्त्वाचे म्हणजे, यासंदर्भात परिवहन विभागाकडे किती जणांनी आपली इच्छा व्यक्त केली याचीही नोंद नाही. परिवहन विभागाने अवयवदानाच्या इच्छेला ‘हो’ किंवा ‘नाही’ या अटीवर ठेवल्यास व ‘क्लिक’ न करता समोर जाता येणार नाही अशी व्यवस्था केल्यास अवयवदानाची माहिती उमेदवारांपर्यंत पोहचेल.

टॅग्स :Organ donationअवयव दान