शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिकांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 10:41 IST

Nagpur News दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा सोडविण्यासाठी आवश्यक असणारा लेखनिक मिळणे अवघड झाले आहे. शहरातील दिव्यांग शाळांनी लेखनिक उपलब्ध व्हावा म्हणून सामान्यांच्या शाळा व्यवस्थापनाकडे मागणी केली आहे.

ठळक मुद्देदिव्यांग शाळांची लेखनिकांसाठी शाळांकडे मागणीदहावीच्या गणिताच्या पेपरला सहाव्या वर्गाचा लेखनिक

 लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचे विद्यार्थी व पालकांना टेंशन आहे. सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा दिव्यांग विद्यार्थ्यांचे टेंशन त्यापेक्षा जास्त आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा सोडविण्यासाठी आवश्यक असणारा लेखनिक मिळणे अवघड झाले आहे. शहरातील दिव्यांग शाळांनी लेखनिक उपलब्ध व्हावा म्हणून सामान्यांच्या शाळा व्यवस्थापनाकडे मागणी केली आहे. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

दिव्यांगांच्या श्रेणीतील अंध, अस्थिव्यंग, मतिमंद या विद्यार्थ्यांना लेखनिकाची गरज भासते. दहावी आणि बारावीत अंध विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते. नागपूर जिल्ह्यात दोन शाळेतून दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला प्रवीष्ट होतात. या विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच परीक्षेची तयारी करून घेणे व त्यांना परीक्षेच्या काळात लेखनिक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळांची असते. दिव्यांग शाळांच्या परिसरातील शाळा अथवा ओळखीच्या शाळांना पत्र पाठवून लेखनिकांची मागणी केली जाते आणि शाळा त्या विद्यार्थ्यांना लेखनिकही उपलब्ध करून देतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे लेखनिकांची अडचण निर्माण झाली आहे. सामान्यांच्या शाळांनी लेखनिकासाठी दिव्यांग शाळांना प्रतिसादच दिलेला नाही.

दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचण अशी आहे की, गणित विषय सोडल्यास इतर सर्व विषयांसाठी नवव्या वर्गाचा विद्यार्थी लेखनिक म्हणून मदत करू शकतो. परंतु गणित विषयासाठी त्यांना सहाव्या वर्गाचा लेखनिक उपलब्ध करून द्यावा लागतो. सहाव्या वर्गाचा विद्यार्थी अतिशय लहान असल्याने त्याचे पालक त्याला परीक्षेला पाठवतील की नाही? हा प्रश्नच आहे. मुळात पालकांमध्ये सुद्धा कोरोनाची भीती आहे. शाळाही बंद आहेत. अशात लेखनिक शोधणे आणि त्याच्या पालकांकडून होकार मिळणे अडचणीचेच आहे.

- नागपूर जिल्ह्यातून प्रवीष्ट होणारे दिव्यांग विद्यार्थी

दहावी - २५

बारावी - ३६

- दहावीच्या सर्वच पेपरला नववीचा विद्यार्थी असावा लेखनिक

आमचे प्रयत्न सुरू आहेत. परीक्षेच्या वेळेपर्यंत लेखनिक मिळतीलही. पण गणिताच्या पेपरसाठी सहाव्या वर्गाच्या लेखनिकाची जी अट आहे, त्यासाठी लेखनिक शोधणे अवघड होणार आहे. बोर्डाने सहावीच्या विद्यार्थ्यांचा आग्रह न धरता नववीच्या विद्यार्थ्यांनाच गणिताचा पेपर सोडविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही बोर्डाला करणार आहोत.

- लक्ष्मण खापेकर, सचिव, ज्ञानज्योती अंध विद्यालय

टॅग्स :Studentविद्यार्थीDivyangदिव्यांग