शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

वेगळ्या विदर्भासाठी तिस-या आघाडीची गरज, प्रस्थापितांना धक्के द्यावे लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 04:12 IST

नागपूर : विदर्भ राज्याची मागणी पूर्ण करण्यासाठी उठावाची गरज आहे. तिस-या आघाडीचे उमेदवार निवडून आले नाही तरी प्रस्थापितांना पाडण्याची ताकद आपल्यात आहे.

नागपूर : विदर्भ राज्याची मागणी पूर्ण करण्यासाठी उठावाची गरज आहे. तिस-या आघाडीचे उमेदवार निवडून आले नाही तरी प्रस्थापितांना पाडण्याची ताकद आपल्यात आहे. मुळात स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, अशी राजकीय इच्छाशक्ती नसल्याची टीका भाजपाचे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी केली.आर.एस. रुईकर इन्स्टिट्यूटने नुक त्याच सादर केलेल्या ‘विदर्भाच्या विशेष संदर्भात महाराष्ट्रातील प्रादेशिक विकासाचे राजकीय अर्थशास्त्र’ या अहवालावर मोर हिंदी भवन येथे आयोजित चर्चेत त्यांनी उपरोक्त विचार मांडले. देशमुख म्हणाले, विदर्भात बेरोजगारी वाढत आहे. ३२ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार बदलले, पण विदर्भाला काहीही फायदा झालेला नाही. स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विकास शक्य नाही. वेळ पडल्यास विदर्भासाठी राजीनामा देण्याची तयारी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.सत्तेत येण्यापूर्वी विदर्भाच्या बाजूने असणारे सत्ता येताच बदलतात. संबंधित अहवालाच्या निमित्ताने विदर्भावर अन्याय झाल्याचे अधोरेखित झाले आहे. शासकीय आकडेवारीसह वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे. विदर्भाच्या चळवळीला या अहवालामुळे बळ मिळणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी सांगितले.रुईकर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही. राज्यातील औद्योगिक व कृषी विकासाचा विचार केला तर विदर्भ सर्वात खाली आहे. सिंचनातही विदर्भच मागे आहे. कुणाचेही सरकार आले तरी विदर्भाचा विकास शक्य नाही. स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही. विदर्भातील खनिज संपत्तीचा विचार करता एक सक्षम राज्य होईल, असा विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष विश्वास देवेंद्र पारेख यांनी व्यक्त केला.