शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

वेगळ्या विदर्भासाठी तिस-या आघाडीची गरज, प्रस्थापितांना धक्के द्यावे लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 04:12 IST

नागपूर : विदर्भ राज्याची मागणी पूर्ण करण्यासाठी उठावाची गरज आहे. तिस-या आघाडीचे उमेदवार निवडून आले नाही तरी प्रस्थापितांना पाडण्याची ताकद आपल्यात आहे.

नागपूर : विदर्भ राज्याची मागणी पूर्ण करण्यासाठी उठावाची गरज आहे. तिस-या आघाडीचे उमेदवार निवडून आले नाही तरी प्रस्थापितांना पाडण्याची ताकद आपल्यात आहे. मुळात स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे, अशी राजकीय इच्छाशक्ती नसल्याची टीका भाजपाचे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी केली.आर.एस. रुईकर इन्स्टिट्यूटने नुक त्याच सादर केलेल्या ‘विदर्भाच्या विशेष संदर्भात महाराष्ट्रातील प्रादेशिक विकासाचे राजकीय अर्थशास्त्र’ या अहवालावर मोर हिंदी भवन येथे आयोजित चर्चेत त्यांनी उपरोक्त विचार मांडले. देशमुख म्हणाले, विदर्भात बेरोजगारी वाढत आहे. ३२ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार बदलले, पण विदर्भाला काहीही फायदा झालेला नाही. स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विकास शक्य नाही. वेळ पडल्यास विदर्भासाठी राजीनामा देण्याची तयारी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.सत्तेत येण्यापूर्वी विदर्भाच्या बाजूने असणारे सत्ता येताच बदलतात. संबंधित अहवालाच्या निमित्ताने विदर्भावर अन्याय झाल्याचे अधोरेखित झाले आहे. शासकीय आकडेवारीसह वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे. विदर्भाच्या चळवळीला या अहवालामुळे बळ मिळणार असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप यांनी सांगितले.रुईकर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास शक्य नाही. राज्यातील औद्योगिक व कृषी विकासाचा विचार केला तर विदर्भ सर्वात खाली आहे. सिंचनातही विदर्भच मागे आहे. कुणाचेही सरकार आले तरी विदर्भाचा विकास शक्य नाही. स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही. विदर्भातील खनिज संपत्तीचा विचार करता एक सक्षम राज्य होईल, असा विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष विश्वास देवेंद्र पारेख यांनी व्यक्त केला.