शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

समान प्रश्नासाठी वेगवेगळे धोरण अस्वीकार्य

By admin | Updated: February 6, 2015 01:01 IST

राज्य शासनाच्या विविध विभागांना समान प्रश्नावर वेगवेगळे धोरण लागू करण्याची कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या

हायकोर्टाचा खुलासा : राज्य शासन एकच असल्याचे मतराकेश घानोडे - नागपूरराज्य शासनाच्या विविध विभागांना समान प्रश्नावर वेगवेगळे धोरण लागू करण्याची कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर निर्णय देताना केला आहे. विभाग विविध असले तरी राज्य शासनाचे अस्तित्व मात्र एकच आहे, असे मत निर्णयात व्यक्त करण्यात आले आहे. विविध विभाग आपापल्यापरीने वेगवेगळे धोरण अंमलात आणण्यास स्वतंत्र आहेत, अशी भूमिका राज्य शासनाने मांडली होती. या भूमिकेत काहीच अर्थ नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. राज्य शासन एकच असून शासनाच्या विविध विभागांना वेगवेगळे धोरण निश्चित करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेगवेगळे धोरण लागू करण्याची मुभा दिल्यास एखाद्या विभागातील कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल किंवा त्यांना इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जास्तीचे फायदे मिळतील, असे मत न्यायालयाने नोंदविले आहे. प्रशिक्षित शिक्षकांच्या बाबतीत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व आदिवासी विकास विभागाच्या धोरणामध्ये फरक आहे. हे प्रकरण निकाली काढताना न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मृदुला भटकर यांनी वरीलप्रमाणे खुलासा केला आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी बी. एड. पदवीधारक उमेदवाराची नियुक्ती करण्यात आली असेल आणि त्यानंतर या उमेदवाराने निर्धारित कालावधीत डी.एड. पदवी प्राप्त केली असेल तर अशा शिक्षकांना प्रशिक्षित शिक्षक समजण्यात यावे व त्यांना प्रशिक्षित शिक्षक श्रेणीच्या वेतनासह इतर लाभ देण्यात यावेत, असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासंदर्भात ११ नोव्हेंबर २०११ रोजीचा ‘जीआर’ जारी करण्यात आला आहे. परंतु आदिवासी विकास विभागाद्वारे संचालित आश्रम शाळांतील शिक्षकांना या ‘जीआर’नुसार लाभ देण्यात येत नाही. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विविध आश्रम शाळांमध्ये कार्यरत सहा शिक्षकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.