शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

डिझेल इंजिन होणार इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 11:02 IST

पूर्वीचे वाफेवरचे इंजिन कालबाह्य होऊन डिझेल इंजिन आले. आता ते सुद्धा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देविद्युतीकरणाचे ९० टक्के काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रेल्वेमध्ये नव्या तंत्रामुळे आधुनिकीकरणाला गती आली आहे. पूर्वीचे वाफेवरचे इंजिन कालबाह्य होऊन डिझेल इंजिन आले. आता ते सुद्धा कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. मध्य रेल्वे नागपूर मंडळात ९० टक्के विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून या मंडळात फक्त ११ डिझेल इंजिन उरले आहेत.डिझेल इंजिनमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊन पर्यावरणाचे नुकसान होत असे. पैसा आणि वेळही वाया जात असे. हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वे विभागाकडून विद्युतीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागपूर विभागातील बहुतेक मार्गावरील विद्युतीकरणाची कामे पूर्णत्वास आली आहेत. पिंपळखुटी, आदिलाबाद आणि वणी या मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. ते पूर्ण होताच या मार्गावर विजेवर चालणाऱ्या रेल्वे धावतील. परिणामत: टप्प्याटप्प्याने डिझेल इंजिनचा वापर बंद होत जाईल. विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यावरही डिझेल इंजिन नेहमीसाठी बंद केले जाणार नाही. वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून त्याचा वापर होणार आहे. पहाडी क्षेत्रात आजही रेल्वेसाठी डिझेल इंजिनचा उपयोग केला जात आहे.

मध्य रेल्वे नागपूर मंडळात विद्युतीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. वणी, पिंपळखुटी, आदिलाबादमध्येही ही काम वेगात सुरू आहे. यानंतर इंजिनचा उपयोग कमी होईल, परंतु वीज पुरवठा खंडित झाल्यावर त्याचा उपयोग होईलच.- एस.जी. राव, सहायक वाणिज्य प्रबंधक, मध्य रेल्वे, नागपूर मंडळ

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर