शहरं
Join us  
Trending Stories
1
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
2
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
3
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
4
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
5
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
6
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
7
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
8
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
9
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
10
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
11
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
12
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
13
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
14
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
15
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
16
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
17
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
18
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
19
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
20
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा

डिस्काऊंटवर घेतले ‘मरण’!

By admin | Updated: April 2, 2017 02:18 IST

मानवी स्वभाव किती स्वार्थी होतोय बघा... आपण नेहमी वाढत्या प्रदूषणाविरोधात बोलतो, सरकारला दोष देतो,

नागपूर : मानवी स्वभाव किती स्वार्थी होतोय बघा... आपण नेहमी वाढत्या प्रदूषणाविरोधात बोलतो, सरकारला दोष देतो, वेळ आली तर न्यायालयाच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. परंतु विषय जेव्हा स्वहिताचा असतो तेव्हा मात्र सामाजिक बांधिलकी विसरून केवळ आपल्या फायद्याचाच विचार करतो. याचा पुन्हा एक वाईट अनुभव बीएस-३ सारख्या नाकारलेल्या (बॅन) वाहनांच्या जम्बो खरेदीनंतर आला आहे. अशा स्थितीत खरंच आपल्याला प्रदूषणावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, या स्वार्थासाठी काहींनी डिस्काऊंटच्या नादात चक्क आपले आणि पर्यायाने समाजाचेही ‘मरण’ विकत घेतले आहे. या सर्व गाड्या पुढील दहा-वीस वर्षे अक्षरश: प्रदूषण ओकणार आहेत. मात्र हे सर्व माहीत असताना केवळ काही पैशाच्या लालसेपोटी त्या गाड्या खरेदीसाठी आपण उड्या मारल्या आणि दोनच दिवसात हजारो गाड्यांची खरेदी केली. हा स्वत:शी आणि निसर्गाशी खेळ आहे. यात आपण या गाड्या खरेदीची तारीख पाळली असली तरी त्यासोबतच आयुष्याचे टायमिंग मात्र चुकविले आहे, याचाही विचार करावा लागेल. या ज्वलंत प्रश्नावर ‘लोकमत’ ने समाजातील पर्यावरण तज्ज्ञ, डॉक्टर्स, शिक्षणतज्ज्ञ, कृषीतज्ज्ञ व वकिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, सर्वांनी समाजाच्या या स्वार्थीवृत्तीचा विरोध केला. भारत स्टेज-३ (बीएस-३) या गाड्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालताच मागील दोन दिवसांत विविध कंपन्यांनी आपल्या डीलर्सच्या माध्यमातून ग्राहकांना डिस्काऊंटचे प्रलोभन दाखवून या सर्व गाड्यांची विक्री केली. लोकांनी सुद्धा त्या प्रलोभनाला बळी पडत, गाड्यांच्या खरेदीसाठी रांगा लावल्या. दोनच दिवसांत उपराजधानीत तब्बल ३ हजार ५०० गाड्यांची विक्री झाली. यात लोकांना निश्चितच १० ते १५ हजार रुपयांचा फायदा झाला आहे. मात्र त्या छोट्याच्या लोभापोटी संपूर्ण शहराचे आरोग्य धोक्यात टाकले. त्यामुळे भविष्यात या तीन हजार गाड्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाला जबाबदार कोण राहणार,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अगोदरच नागपुरातील प्रदूषण धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. यात आता या हजारो गाड्या पुन्हा भर घालणार आहे. हाच समाज प्रदूषण आणि पर्यावरणाच्या मोठमोठ्या गोष्टी करतो. मात्र जेव्हा स्वत:चा स्वार्थ डोळ्यासमोर दिसतो, तेव्हा मात्र तो अशा रांगा लावतो. आज जगभरात पर्यावरण संरक्षणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. यात सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपला देश आणि समाजाचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय दिला आहे. मात्र असे असताना लोकांनी मागील दोन दिवसांत बॅन गाड्या खरेदी करून, सर्वोच्च न्यायालयाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. (प्रतिनिधी) प्रदूषणावर नियंत्रणासाठी वेळोवेळी ‘बीएस’ मानके ठरवण्यात येतात. ‘बीएस’ म्हणजे ‘भारत स्टँडर्ड स्टेज’, प्रदूषणाचं केंद्राने दिलेले मानक म्हणजे ‘बीएस’. हे मानक भारतातील सर्व वाहनांसाठी लागू आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने नुकताच दिलेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे. विशेष म्हणजे,‘बीएस-४’ या वायूप्रदूषण मानकाची पूर्तता केलेल्या वाहनांचे उत्पादन व विक्री २०१० पासून होणार होती. परंतु वाहन उत्पादक कंपन्यांनी वेळोवेळी मुदतवाढ मागितल्याने सात वर्षे उलटली. आता १ एप्रिल २०१७ पासून ‘बीएस-३’ वाहनांच्या खरेदी-विक्रीवर बंदी येऊन आता केवळ ‘बीएस-४’च्याच वाहनांची नोंदणी होणार आहे. यामुळे प्रदूषणात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. परंतु प्रत्येकाने माझे वाहन प्रदूषण पसरविणार नाही याची काळजी घेतल्यास हवेतील प्रदूषण निम्म्याहून कमी होईल. -शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी