शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाकिस्तानव्याप्त काश्मीर पाकिस्तानला दान दिले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 10:01 IST

पाकव्याप्त काश्मीरवरील दावा आपण सोडून ते पाकिस्तानला दान दिले का, याचा खुलासा सरकार, भाजप आणि आरएसएसने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्दे नियंत्रण रेषेबाबत खुलासा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जम्मू-काश्मीरच्या संविधानानुसार पाकिस्तानव्याप्त काश्मीरसाठी विधानसभेच्या जागा राखीव होत्या. यामुळे त्याचा आपल्याशी संबंध होता. त्या आधारावरच पाकव्याप्त काश्मीरवर आपण दावा करीत होतो. केंद्र्र सरकारने कलम ३७० रद्द करून पाकव्याप्त काश्मीरचे भारताशी असलेले संबंध तोडले आहेत. यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा संबंध संपला आहे. ज्या जागेसाठी लाखो सैनिक शहीद झाले, त्या पाकव्याप्त काश्मीरवरील दावा आपण सोडून ते पाकिस्तानला दान दिले का, असा सवाल करीत याचा खुलासा सरकार, भाजप आणि आरएसएसने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली. अमेरिकेच्या इशाऱ्यावर जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, हे कलम रद्द केल्याने आसाम, नागालँड, मिझोरम, मेघालयसह अनेक राज्यांना देण्यात आलेला विशेष दर्जाही आपोआप संपुष्टात येईल. मराठवाडा, विदर्भाला देण्यात आलेला विशेष दर्जाही जाईल. पत्रपरिषदेला आ. बळीराम शिरस्कर, वंचित बहुजन आघाडी विदर्भ प्रमुख राजेंद्र महाडोळे, माजी राज्यमंत्री रमेश गजभिये, माजी पोलीस आयुक्त धनराज वंजारी, संजय हेडाऊ , सागर डबरासे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, शहराध्यक्ष रवि शेंडे उपस्थित होते.पूरग्रस्तांना शासनाची अजूनही मदत नाहीसरकारकडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पैसा आहे. परंतु, पूरग्रस्तांसाठी नाही, अशी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे गेल्या पाच, सात दिवसांपासून पाण्याखाली असताना सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आली नाही. मंत्री, खासदार दौरे करीत आहेत. परंतु पूरग्रस्तांना मदत मात्र मिळालेली नाही. जी काही मदत होत आहे ती केवळ सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.धरणांसाठी नियोजन समिती असावीकर्नाटकमधील आलमट्टी धरणाचे दरवाजे बंद असल्याने नदीचे पाणी लोकांच्या घरात घुसले आहे. हे पूर्णपणे भरल्यास सांगली शहर वर्षभर पाण्याखाली राहील. कृष्णा, आलमट्टी व इतर धरणांच्या नियोजनांसदर्भात एक समिती गठित करण्याची मागणीसुद्धा अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी केली.२८८ जागा लढण्याची तयारीकाँग्रेसकडून अद्याप कोणत्याही प्रकारची बोलणी झाली नाही. चर्चा झाल्यास जागांबाबत ठरवू. आमची सर्व २८८ जागा लढण्याची तयारी आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर