शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानव्याप्त काश्मीर पाकिस्तानला दान दिले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 10:01 IST

पाकव्याप्त काश्मीरवरील दावा आपण सोडून ते पाकिस्तानला दान दिले का, याचा खुलासा सरकार, भाजप आणि आरएसएसने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्दे नियंत्रण रेषेबाबत खुलासा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जम्मू-काश्मीरच्या संविधानानुसार पाकिस्तानव्याप्त काश्मीरसाठी विधानसभेच्या जागा राखीव होत्या. यामुळे त्याचा आपल्याशी संबंध होता. त्या आधारावरच पाकव्याप्त काश्मीरवर आपण दावा करीत होतो. केंद्र्र सरकारने कलम ३७० रद्द करून पाकव्याप्त काश्मीरचे भारताशी असलेले संबंध तोडले आहेत. यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा संबंध संपला आहे. ज्या जागेसाठी लाखो सैनिक शहीद झाले, त्या पाकव्याप्त काश्मीरवरील दावा आपण सोडून ते पाकिस्तानला दान दिले का, असा सवाल करीत याचा खुलासा सरकार, भाजप आणि आरएसएसने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली. अमेरिकेच्या इशाऱ्यावर जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, हे कलम रद्द केल्याने आसाम, नागालँड, मिझोरम, मेघालयसह अनेक राज्यांना देण्यात आलेला विशेष दर्जाही आपोआप संपुष्टात येईल. मराठवाडा, विदर्भाला देण्यात आलेला विशेष दर्जाही जाईल. पत्रपरिषदेला आ. बळीराम शिरस्कर, वंचित बहुजन आघाडी विदर्भ प्रमुख राजेंद्र महाडोळे, माजी राज्यमंत्री रमेश गजभिये, माजी पोलीस आयुक्त धनराज वंजारी, संजय हेडाऊ , सागर डबरासे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, शहराध्यक्ष रवि शेंडे उपस्थित होते.पूरग्रस्तांना शासनाची अजूनही मदत नाहीसरकारकडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पैसा आहे. परंतु, पूरग्रस्तांसाठी नाही, अशी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे गेल्या पाच, सात दिवसांपासून पाण्याखाली असताना सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आली नाही. मंत्री, खासदार दौरे करीत आहेत. परंतु पूरग्रस्तांना मदत मात्र मिळालेली नाही. जी काही मदत होत आहे ती केवळ सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.धरणांसाठी नियोजन समिती असावीकर्नाटकमधील आलमट्टी धरणाचे दरवाजे बंद असल्याने नदीचे पाणी लोकांच्या घरात घुसले आहे. हे पूर्णपणे भरल्यास सांगली शहर वर्षभर पाण्याखाली राहील. कृष्णा, आलमट्टी व इतर धरणांच्या नियोजनांसदर्भात एक समिती गठित करण्याची मागणीसुद्धा अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी केली.२८८ जागा लढण्याची तयारीकाँग्रेसकडून अद्याप कोणत्याही प्रकारची बोलणी झाली नाही. चर्चा झाल्यास जागांबाबत ठरवू. आमची सर्व २८८ जागा लढण्याची तयारी आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर