शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मिश्रांच्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:35 IST

राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्या ‘एलएलबी’च्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का, असा नागपूर विद्यापीठ प्रशासनाला संशय आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ प्रशासनाला संशय : कुलगुरूंनी मागितला परीक्षा विभागाकडून अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्या ‘एलएलबी’च्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का, असा नागपूर विद्यापीठ प्रशासनाला संशय आहे. यासंदर्भात कुलगुरूंनी अहवाल मागविला असून, परीक्षा विभागाला तीन ते चार दिवसांत हा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २००६ साली परीक्षा मंडळाने मिश्रा यांच्या गुणपत्रिका परत घेण्याच्या व रद्दबातल ठरवीत असल्याचा निर्णय घेतला होता. मात्र या गुणपत्रिकाच ‘बोगस’ असल्याचा विद्यापीठ प्रशासनाला संशय असून त्याची चाचपणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधाराप्रकरणी पाठविलेल्या पत्रातील संदर्भानंतर विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे.मिश्रा यांनी १९९५ मध्ये ‘एलएलबी’ प्रथम वर्षाची परीक्षा दिली होती. ‘लॉ आॅफ टार्ट’ या विषयाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी परीक्षा विभागात अर्ज केला होता. पुढे कोहचाडे प्रकरणात मिश्रा यांची चौकशी झाल्यानंतर त्यांनी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाची गुणपत्रिका विद्यापीठाला परत करत असल्याचा अर्ज तत्कालीन कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांना केला होता. १३ नोव्हेंबर २००६ च्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हे प्रकरण ठेवण्यात आले होते व परीक्षा मंडळाने या तिन्ही गुणपत्रिका परत घेण्याच्या व त्या रद्दबातल ठरवीत असल्याचा निर्णय घेतला होता.गांधी विचारधारा पदविकेत वाङ्मय चौर्यप्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी पदविका परत घेण्यासंदर्भात विद्यापीठाला पत्र लिहिले. यात त्यांनी याअगोदरदेखील गुणपत्रिका परत घेण्याचा निर्णय झाल्याचा संदर्भ दिला. नेमक्या कोणत्या गुणपत्रिका विद्यापीठाने परत घेण्याचा निर्णय घेतला होता, याची चौकशी सुरू असताना सुनील मिश्रा यांची गुणपत्रिका बोगस असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. त्यामुळे आम्ही त्यांच्या गुणपत्रिकांची चाचपणी करत आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. यासंदर्भात तीन दिवसांत अहवाल देण्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांना निर्देश देण्यात आले होते. परंतु परीक्षेचे काम सुरू असल्यामुळे हा अहवाल सादर व्हायला चार ते पाच दिवस लागतील, असे कुलगुरूंनी सांगितले.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर