शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जगभरातील हुकुमशाहांनी लाेकशाहीला खेळणे बनविले-श्रीपाल सबनीस

By निशांत वानखेडे | Updated: March 31, 2024 19:05 IST

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या पुरस्कारांचे वितरण

नागपूर : रशिया किंवा दक्षिण काेरिया या देशात लाेकशाहीच्या नावाने हुकुमशाही सुरू आहे. आपला भारतही त्या टप्प्यावर पाेहचला आहे. देशातील राजकीय व्यवस्था कधी नव्हे इतकी क्रुर झाली आहे. देशात लाेकशाही उरलेलीच नाही. हुकुमशाहांनी लाेकशाहीला खेळणे बनविले आहे, असे परखड मत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी केली.

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे रविवारी वितरण करण्यात आले. हिंदी माेरभवन येथे झालेल्या कार्यक्रमात मिलिंद महाविद्यालय, छ. संभाजीनगरच्या प्राचार्या डाॅ. वैशाली प्रधान, महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे, नाटककार डॉ. सुनील रामटेके, कादंबरीकार डॉ. विद्याधर बनसोड, महामंडळाचे सचिव डॉ. रवींद्र तिरपुडे, उपाध्यक्ष डॉ. विलास तायडे, कायदेविषयक सल्लागार अॅड. भूपेश पाटील यांची उपस्थिती होती.

या पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. धनराज डहाट, अनिल मनाेहर आणि डाॅ. बी. रंगराव यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवनगाैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय डाॅ. जगन कराडे, काेल्हापूर व डाॅ. प्रकाश करमाडकर, पुणे यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय आदर्शन शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येईल. डाॅ. तृप्ती साेनवणे, ठाणे यांना सावित्रीबाई फुले आदर्श महिला पुरस्कार, डाॅ. सुनील रामटेके यांच्या महासूर्य नाटकाकरिता क्रांतिसूर्य जोतीराव फुले राष्ट्रीय पुरस्कार, डाॅ. अशाेक पळवेकर यांच्या असहमतीचे रंग या काव्यसंग्रहासाठी नामदेव ढसाळ राष्ट्रीय पुरस्कार, डाॅ. विद्याधर बन्साेड यांच्या ‘माेनास पत्र’ या पत्रसंग्रहास रमाबाई आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार, सुजाता लाेखंडे यांच्या ‘सागर तळाशी’ या ललित संग्रहास डाॅ. गंगाधर पानतावणे राज्यस्तरीय पुरस्कार, डाॅ. देवीदास तारू यांच्या ‘आता मव्ह काय’ या आत्मचरित्रास दया पवार राज्यस्तरीय पुरस्कार तर डाॅ. अशाेक काळे यांच्या ‘अपहरण’ कादंबरीस बाबूराव बागूल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच ४० लेखकांच्या उत्कृष्ट कलाकृतींना पुरस्कार व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ५० व्यक्तींना गाैरविण्यातआले.डाॅ. सबनीस म्हणाले, आता देशात पूर्वीचे हिंदूत्व राहिले नाही तर गाेडसेच्या वळणावर चालणारे हिंस्त्र हिंदूत्व आले आहे. सत्य आधारित संस्कृतीऐवजी आक्रमक झुंडी तयार हाेत आहेत. ईश्वर मानणे किंवा निरीश्वरवादी असणे, यापेक्षा मानवतावादी असणे अधिक महत्त्वाचे आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या धर्माचा टीळा लावून संविधान लिहिले नाही. भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे धार्मिक संस्कृती की संविधानिक संस्कृती पाहिजे याचा विचार करावा लागेल. त्यामुळे कडव्या हिंदूत्ववादाचे आव्हान थाेपविण्यासाठी नवा आंबेडकरवाद पेरण्याची गरज असून साहित्यिकांनी दु:खमुक्त मानवतेचे ध्येय ठेवून लेखन करावे, असे आवाहन डाॅ. सबनीस यांनी केले. डाॅ. खाेब्रागडे यांनी डाॅ. आंबेडकर यांच्या वैश्विक कार्याला अधिक व्यापक बनविण्यासाठी महामंडळ कार्य करीत असल्याचे सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर