शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

अल्पवयीन मुले चालवितात ‘धूम स्टाईल’ बाईक

By admin | Updated: February 19, 2016 03:16 IST

वाहतूक नियम आणि मोटरवाहन कायद्याचे धडधडीत उल्लंघन करीत अल्पवयीन मुले अधिकृत परवान्याविना ‘धूम

नागपूर : वाहतूक नियम आणि मोटरवाहन कायद्याचे धडधडीत उल्लंघन करीत अल्पवयीन मुले अधिकृत परवान्याविना ‘धूम स्टाईल’ वाहने चालवित आहेत. नागपूरच्या रस्त्यांवर १२ लाख दुचाकी वाहने धावत आहेत. बहुतांश वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. २०१४ मध्ये ५ हजार ४६ दुचाकी वाहनस्वारांनी रस्त्यांवरील अपघातात आपले प्राण गमावलेले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने हा गंभीर विषय स्वत:हून जनहित याचिका म्हणून स्वीकारून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय, राज्य वाहतूक विभाग, वाहतूक आयुक्त, आरटीओ, नासुप्र, मनपा आणि शिक्षण सचिवांना तीन आठवड्यात उत्तर दाखल करणारी नोटीस जारी केली. आपले दुचाकी वाहन घेऊन शिकवणी वर्गाला जात असताना एका १५ वर्षीय मुलाने रस्त्याने जात असलेल्या एका महिलेला धडक दिली होती. तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. तिला एका खासगी इस्पितळात दाखल करताच तिचा मृत्यू झाला होता. या प्राणांतिक अपघातास कारणीभूत ठरलेला हा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध प्रथम खबरी अहवाल दाखल झाला नाही.त्याला बाल हक्क कायद्याचे संरक्षण मिळाले. त्याला बाल न्याय मंडळापुढे हजर करून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या बालकाविरुद्धचे आरोपपत्र रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी त्याच्या आई-वडिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने हे प्रकरण वेगळे ठेवले होते. शेकडो मुले मोटरसायकली आणि जास्त अश्व शक्तीच्या स्कूटर कोणत्याही अधिकाराविना चालवितात. या गंभीर प्रकारावर उच्च न्यायालयाने अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांना न्यायालय मित्र नेमून सर्वंकष याचिका दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी ही जनहित याचिका दाखल केली. आज शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्गाला जाणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या हातात पालक मोटरसायकल किंवा स्कूटरच्या चाव्या देतात. रस्त्याने जाताना ही मुले भरधाव आणि बेदरकारपणे वाहने चालवितात आणि अपघाताला निमंत्रण देतात. १६ वर्षाच्या मुलांना ५० सीसी इंजीन असलेले दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकतो. परंतु आज ही मुले १०० ते १५० सीसीचे इंजीन असलेली वाहने भररस्त्यांवर चालवितात. त्यामुळे गंभीर चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे मुलांकडून धूम स्टाईल वाहने चालविण्याचा प्रकार रोखणे आवश्यक आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. न्यायालयात न्यायालय मित्र म्हणून अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, राज्य सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील कल्याणी देशपांडे तर केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)