शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुले चालवितात ‘धूम स्टाईल’ बाईक

By admin | Updated: February 19, 2016 03:16 IST

वाहतूक नियम आणि मोटरवाहन कायद्याचे धडधडीत उल्लंघन करीत अल्पवयीन मुले अधिकृत परवान्याविना ‘धूम

नागपूर : वाहतूक नियम आणि मोटरवाहन कायद्याचे धडधडीत उल्लंघन करीत अल्पवयीन मुले अधिकृत परवान्याविना ‘धूम स्टाईल’ वाहने चालवित आहेत. नागपूरच्या रस्त्यांवर १२ लाख दुचाकी वाहने धावत आहेत. बहुतांश वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. २०१४ मध्ये ५ हजार ४६ दुचाकी वाहनस्वारांनी रस्त्यांवरील अपघातात आपले प्राण गमावलेले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने हा गंभीर विषय स्वत:हून जनहित याचिका म्हणून स्वीकारून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय, राज्य वाहतूक विभाग, वाहतूक आयुक्त, आरटीओ, नासुप्र, मनपा आणि शिक्षण सचिवांना तीन आठवड्यात उत्तर दाखल करणारी नोटीस जारी केली. आपले दुचाकी वाहन घेऊन शिकवणी वर्गाला जात असताना एका १५ वर्षीय मुलाने रस्त्याने जात असलेल्या एका महिलेला धडक दिली होती. तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. तिला एका खासगी इस्पितळात दाखल करताच तिचा मृत्यू झाला होता. या प्राणांतिक अपघातास कारणीभूत ठरलेला हा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध प्रथम खबरी अहवाल दाखल झाला नाही.त्याला बाल हक्क कायद्याचे संरक्षण मिळाले. त्याला बाल न्याय मंडळापुढे हजर करून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या बालकाविरुद्धचे आरोपपत्र रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी त्याच्या आई-वडिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने हे प्रकरण वेगळे ठेवले होते. शेकडो मुले मोटरसायकली आणि जास्त अश्व शक्तीच्या स्कूटर कोणत्याही अधिकाराविना चालवितात. या गंभीर प्रकारावर उच्च न्यायालयाने अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांना न्यायालय मित्र नेमून सर्वंकष याचिका दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी ही जनहित याचिका दाखल केली. आज शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्गाला जाणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या हातात पालक मोटरसायकल किंवा स्कूटरच्या चाव्या देतात. रस्त्याने जाताना ही मुले भरधाव आणि बेदरकारपणे वाहने चालवितात आणि अपघाताला निमंत्रण देतात. १६ वर्षाच्या मुलांना ५० सीसी इंजीन असलेले दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकतो. परंतु आज ही मुले १०० ते १५० सीसीचे इंजीन असलेली वाहने भररस्त्यांवर चालवितात. त्यामुळे गंभीर चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे मुलांकडून धूम स्टाईल वाहने चालविण्याचा प्रकार रोखणे आवश्यक आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. न्यायालयात न्यायालय मित्र म्हणून अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, राज्य सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील कल्याणी देशपांडे तर केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)