शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

धर्मचक्र प्रवर्तन दिन; बौद्ध पद्धतीचा तो पहिला विवाह ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 10:13 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लाखो अनुयायी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. १५ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील लष्करीबागेत एक विवाह सोहळा ठरला.

ठळक मुद्देधम्मदीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी झाला सोहळामहास्थवीर चंद्रमणी यांनी लावले लग्न

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लाखो अनुयायी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. या परिवर्तनामुळेच अनुयायांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले गेले. याच जोरावर १५ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील लष्करीबागेत एक विवाह सोहळा ठरला. महास्थवीर चंद्रमणी यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी अगदी साध्या पद्धतीने पहिला बौद्ध विवाह लावला, आणि शतकानुशतके बुरसटलेल्या चालीरीती, प्रथांना तिलांजली दिली. कुही तालुक्यातील वामनराव मोटघरे व लष्करीबाग येथील दमयंती रामटेके या नवदाम्पत्याच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली.जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे?, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली होती. बाबासाहेबांनी धर्मांतरांच्या घोषणेनंतर एक नवी चेतना निर्माण झाली. जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसात भेद करतो, त्या धर्माच्या चालीरीतीने विवाह करायचा नाही असे ठरले. यासाठी आंबेडकरी चळवळीत अग्रेसर असलेले नामदेवराव नागदेवते, पुंडलिक गौरखेडे, श्रीराम रामटेके यांनी वामनराव मोटघरे व दमयंती रामटेके यांचा विवाह बौद्ध पद्धतीने करण्यासाठी पुढाकार घेतला. विवाहाची तारीखही जाणीवपूर्वक निवडण्यात आली. पहिल्यांदाच तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायचित्र असलेल्या पत्रिका वाटण्यात आल्या. बाबासाहेबांनी या विवाह सोहळ्याला उपस्थित रहावे यासाठी नागदेवते, गौरखेडे, रामटेके हे १३ आॅक्टोबर रोजी बर्डीच्या श्याम हॉटेलकडे निघाले. परंतु त्यांना बाहेरच थांबविण्यात आले. बºयाच प्रयत्नानंतर ते माईसाहेब आंबेडकरांना भेटू शकले. परंतु बाबासाहेबांची प्रकृती बरोबर नसल्याचा निरोप मिळाल्यावर ते माघारी फिरले. या विवाह सोहळ्यासाठी महास्थवीर चंद्रमणी यांनी होकार दिला होता. १४ आॅक्टोबरला या दोन्ही कुटुंबीयांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. विवाहाचा दिवस १५ आॅक्टोबर आला. वधू-वर पांढरे शुभ्र वस्त्र घालून उभे होते. महास्थवीर चंद्रमणी यांनी या उभय वर-वधूला समोरासमोर उभे केले. त्रिशरण-पंचशील घेतले. दोघांनी एकमेकांना हार घातले आणि लग्नविधी पार पडला. या मंगल परिणयाला ४० हजाराहून लोक उपस्थित होते. आज हे दाम्पत्य नाही. त्यांचा मुलगा राजरतन मोटघरे हा विवाह सोहळा जुन्या आठवणींना उजाळा देत जिवंत करून सांगतात.बाबासाहेबांनी बौद्ध पद्धतीने घडवून आणला विवाहप्रा. एन. एम. कांबळे आणि इंदुमती सदाशिवराव बंदीसोडे यांच्या विवाहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेतला होता. बाबासाहेबांनी विवाह समारंभासाठी स्वत: पाली गाथा लिहून दिल्या. १३ मे १९५६ रोजी हा मंगलसोहळा पार पाडला. बाबासाहेबांनी बौद्ध पद्धतीने घडवून आणलेला भारतातील तो पहिलाच विवाह होता.

टॅग्स :DasaraदसराDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी