शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

इंदूरच्या धर्तीवर नागपूरचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 01:34 IST

एके काळी अस्वच्छ शहरात गणती होणाऱ्या मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सक्षम अधिकारी, कठोर निर्णय, लोकजागृती आणि राज्य सरकारचे पाठबळ या जोरावर देशातील सर्वात सुंदर शहर होण्याचा मान मिळविला आहे. विकासाच्या बाबतीत इंदूर नागपूर शहराच्याही मागे होते, म्हणूनच इंदूरचे पथक गतकाळात नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले होते. आज या शहराने स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहराला मागे टाकले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे पथक लवकरच इंदूर शहराच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे.

ठळक मुद्देमनपाचे पथक अभ्यास दौऱ्यावर जाणार : पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश

लोकमत इमपॅक्टलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एके काळी अस्वच्छ शहरात गणती होणाऱ्या मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सक्षम अधिकारी, कठोर निर्णय, लोकजागृती आणि राज्य सरकारचे पाठबळ या जोरावर देशातील सर्वात सुंदर शहर होण्याचा मान मिळविला आहे. विकासाच्या बाबतीत इंदूर नागपूर शहराच्याही मागे होते, म्हणूनच इंदूरचे पथक गतकाळात नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले होते. आज या शहराने स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहराला मागे टाकले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे पथक लवकरच इंदूर शहराच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे.इंदूर स्वच्छतेच्या बाबतीत देशात नंबर वन होण्याची केलेली किमया नागपुरात का होत नाही. यासाठी ‘लोकमत’वृत्तपत्र समूहाच्या चमूने थेट इंदूर शहरात जाऊन शहराने केलेल्या किमयेविषयी महापौर,आयुक्त व नागरिकांशी चर्चा केली. या शहराच्या स्वच्छता कार्याविषयीची मालिका प्रकाशित केली जात आहे. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे एक पथक इंदूर दौºयावर पाठविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी शनिवारी दिली.या पथकात स्थायी समितीचे पदाधिकारी व सदस्य, आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्यासह अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. इंदूर शहराच्या धर्तीवर नागपूरही स्वच्छतेच्या बाबतीत नंबर वन व्हावे, यामागील हेतू असल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली.कचरा उचलण्यासाठी १५ दिवसात निविदानागपूर शहरातील क चरा संकलन व वाहतूक करण्याची जबाबदारी मे. कनक रिसोर्सेस प्रा.लि. यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र शहरातील कचरा उचलण्यासंदर्भात असलेल्या नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारी विचारात घेता, कचरा उचलण्याचा कनक रिसोर्सेसचा कंत्राट रद्द करून नवीन कंत्राटदाराला हा कंत्राट दिला जाणार आहे. याबाबतच्या निविदा १५ दिवसात काढण्यात येतील, अशी माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.वाढीव दर देण्याचा प्रस्ताव स्थगितमहापालिका प्रशासनाने २०१६ पासून कचरा उचलण्याचा प्रति टन १३०६.८५ रुपये दर ठरविला होता. नवीन निविदा प्रक्रिया होईपर्र्यंत हा दर कायम राहणार आहे. त्यानुसार होणाऱ्या फरकाची रक्कम देण्याला मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थगित ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर