शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सरकार आणि राज्यपालांच्या द्वंद्वात फसले विकास मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST

नागपूर : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्थापन झालेेले विकास मंडळ अनेकार्थाने महत्त्वाचे आहेत. या मंडळांचा कार्यकाळ ३० एप्रिललाच ...

नागपूर : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्थापन झालेेले विकास मंडळ अनेकार्थाने महत्त्वाचे आहेत. या मंडळांचा कार्यकाळ ३० एप्रिललाच संपला आहे. मात्र, राज्यपाल आणि राज्य सरकारदरम्यान सुरू असलेल्या द्वंद्वात ही मंडळे अडकली आहेत. मंडळांच्या अध्यक्ष व विशेषज्ञ सदस्यांची नियुक्तीच्या पेचात ही मंडळे फसली आहेत.

राज्यातील एक ज्येष्ठ मंत्री राज्य सरकारकडे मंडळांच्या कार्यकाळाचा विस्तार करण्याची शिफारस करण्यास तयार असले तरी उघड बोलण्यास ते तयार नाहीत. तिन्ही मंडळांचे अध्यक्ष व विशेषज्ञ सदस्य त्यांच्याच मर्जीतले असावेत, अशी त्यांची इच्छा आहे तर राज्यपाल या नियुक्त्यांबाबत स्वत:चा विशेषाधिकार वापरण्यावर अडले आहेत. राज्यपालांच्या विशेषाधिकारानुसार या नियुक्त्या झाल्या तर भाजपा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या लोकांच्या हातात मंडळे जातील, अशी भीती राज्य सरकारला आहे. याच खटापटीत राज्याच्या मंत्रिमंडळाने तीन ते चार वेळा या संदर्भात चर्चा केल्यानंतरही मजबूत असा निर्णय झालेला नाही.

महाराष्ट्रात प्रादेशिक समतोल राखण्यासाठी राष्ट्रपतींच्या आदेशानुसार १९९४ मध्ये तीन विकास मंडळांची स्थापना झाली होती. २०११ मध्ये या मंडळांवरून वैधानिक शब्दाची गच्छंती करण्यात आली. ३० एप्रिल २०२० रोजी या मंडळांचा कार्यकाळ संपलेला आहे. तरीदेखील आठ महिने उलटून गेल्यावरही सरकारने मंडळांच्या कार्यकाळाच्या विस्ताराबाबत शिफारस केलेली नाही. शिफारस मिळताच राज्यपाल केंद्रीय गृह विभागाला सूचना देतील आणि राष्ट्रपतींकडून कार्यकाळाच्या विस्ताराबाबत आदेश जारी होईल.

* अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाला विस्तार

मंडळांचा कार्यकाळ वाढला नसला तरी राज्य सरकारने अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंडळातच कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळ एका आस्थापनेप्रमाणे कार्यरत असून, विशेष निधीतून झालेल्या कार्यांचे अवलोकन सुरू असल्याची माहिती मंडळाचे सदस्य सचिव मनिषा खत्री यांनी दिली.

.....