शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार आणि राज्यपालांच्या द्वंद्वात फसले विकास मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST

नागपूर : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्थापन झालेेले विकास मंडळ अनेकार्थाने महत्त्वाचे आहेत. या मंडळांचा कार्यकाळ ३० एप्रिललाच ...

नागपूर : विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी स्थापन झालेेले विकास मंडळ अनेकार्थाने महत्त्वाचे आहेत. या मंडळांचा कार्यकाळ ३० एप्रिललाच संपला आहे. मात्र, राज्यपाल आणि राज्य सरकारदरम्यान सुरू असलेल्या द्वंद्वात ही मंडळे अडकली आहेत. मंडळांच्या अध्यक्ष व विशेषज्ञ सदस्यांची नियुक्तीच्या पेचात ही मंडळे फसली आहेत.

राज्यातील एक ज्येष्ठ मंत्री राज्य सरकारकडे मंडळांच्या कार्यकाळाचा विस्तार करण्याची शिफारस करण्यास तयार असले तरी उघड बोलण्यास ते तयार नाहीत. तिन्ही मंडळांचे अध्यक्ष व विशेषज्ञ सदस्य त्यांच्याच मर्जीतले असावेत, अशी त्यांची इच्छा आहे तर राज्यपाल या नियुक्त्यांबाबत स्वत:चा विशेषाधिकार वापरण्यावर अडले आहेत. राज्यपालांच्या विशेषाधिकारानुसार या नियुक्त्या झाल्या तर भाजपा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या लोकांच्या हातात मंडळे जातील, अशी भीती राज्य सरकारला आहे. याच खटापटीत राज्याच्या मंत्रिमंडळाने तीन ते चार वेळा या संदर्भात चर्चा केल्यानंतरही मजबूत असा निर्णय झालेला नाही.

महाराष्ट्रात प्रादेशिक समतोल राखण्यासाठी राष्ट्रपतींच्या आदेशानुसार १९९४ मध्ये तीन विकास मंडळांची स्थापना झाली होती. २०११ मध्ये या मंडळांवरून वैधानिक शब्दाची गच्छंती करण्यात आली. ३० एप्रिल २०२० रोजी या मंडळांचा कार्यकाळ संपलेला आहे. तरीदेखील आठ महिने उलटून गेल्यावरही सरकारने मंडळांच्या कार्यकाळाच्या विस्ताराबाबत शिफारस केलेली नाही. शिफारस मिळताच राज्यपाल केंद्रीय गृह विभागाला सूचना देतील आणि राष्ट्रपतींकडून कार्यकाळाच्या विस्ताराबाबत आदेश जारी होईल.

* अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाला विस्तार

मंडळांचा कार्यकाळ वाढला नसला तरी राज्य सरकारने अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंडळातच कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळ एका आस्थापनेप्रमाणे कार्यरत असून, विशेष निधीतून झालेल्या कार्यांचे अवलोकन सुरू असल्याची माहिती मंडळाचे सदस्य सचिव मनिषा खत्री यांनी दिली.

.....