शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा विकास आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 10:39 IST

समाज कल्याणाकरिता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा विकास होणे आवश्यक आहे असे मत इन्फोसेप्ट टेक्नॉलॉजी कंपनीचे टेक्निकल अ‍ॅडव्हायझर अभियंता स्वप्निल देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देइन्फोसेप्ट टेक्नॉलॉजी कंपनीचे टेक्निकल अ‍ॅडव्हायझर अभियंता स्वप्निल देशमुख यांचे मत  ‘वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डे’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाज कल्याणाकरिता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा विकास होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात ही प्रणाली अधिक विकसित करण्यासाठी सखोल संशोधन व्हायला हवे, असे मत इन्फोसेप्ट टेक्नॉलॉजी कंपनीचे टेक्निकल अ‍ॅडव्हायझर अभियंता स्वप्निल देशमुख यांनी व्यक्त केले.दि इन्स्टिट्युशन आॅफ इंजिनियर्स नागपूर केंद्र व इन्स्टिट्युशन आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ‘वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अ‍ॅन्ड इन्फर्मेशन सोसायटी डे’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी देशमुख यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वांच्या कल्याणाकरिता सकारात्मक उपयोग’ विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आयोजक संघटनांचे पदाधिकारी मिलिंद पाठक, अजय सावटकर, सुरेश रांगणकर व एम. डी. दाते व्यासपीठावर उपस्थित होते.‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे रोजगार हिरावला जाईल अशी भीती व्यक्त केली जाते, परंतु त्यात तथ्य नाही. मनुष्यबळाला अडचणींवर मात करण्यासाठी व समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणे हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा उद्देश आहे. गेमिंग इंडस्ट्रिजमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा सर्वाधिक उपयोग केला जात होता. त्यातून या उद्योगक्षेत्राला झालेला फायदा लक्षात घेता इतरांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. वर्तमान काळात बहुतांश ठिकाणी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर होत आहे, असे देशमुख यांनी सांगितले.सुरक्षा, अंतराळ संशोधन, कृषी, आरोग्य विज्ञान, हवामान इत्यादी क्षेत्रात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ समाज कल्याणाचे कार्य करीत आहे. बॉम्ब शोधून काढणारे व ते निकामी करणारे रोबोटस् ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चाच भाग आहे.‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे येणाऱ्या काळात हवामान कसे राहील, याची माहिती मिळते. देशमुख यांनी यासह विविध बाबींकडे यावेळी लक्ष वेधले.

काय आहे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) म्हणतात. ही कृत्रिम वस्तू साधारणत: संगणकच असते. ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये यंत्र शिक्षण, त्यांचे बुद्धिमान वर्तन व परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो. या शाखेतील संशोधन मुख्यत: स्वयंचलित कार्य (जसे नियोजन, संयोजन, निदान, उत्तरे शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज व चेहरा ओळखण्याची क्षमता) करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशी निगडित आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ प्रणाली अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, कॉम्प्युटर गेम्स, संगणक प्रणाली इत्यादीमध्ये वापरली जाते.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सscienceविज्ञान