शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
4
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
5
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
6
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
7
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
8
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
9
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
10
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
11
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
12
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
13
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
14
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
15
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
16
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
17
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
18
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
19
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
20
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन

सामाजिक न्यायासह लोकशाही भूमिकेचा ऱ्हास : सुखदेव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:43 IST

सार्वजनिक क्षेत्र कमी होत आहे. खासगीकरण वाढत आहे. शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरली जात नाही. खासगीत आरक्षण मिळत नाही. अनुसूचित जातीच्या उद्योजकांकडून अल्प खरेदी करण्यात आली. सरकारच्या धोरणांमुळे सामाजिक न्यायासह लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी भूमिकेचा ऱ्हास होणे, ही चिंतेची बाब आहे. लोकशाहीचा सन्मान व्हावा यासाठी उपराजधानीतून विचारमंथनाला १४ मार्चपासून सुरुवात होणार आहे. उपराजधानीतील ४० संघटना या चर्चेत सहभागी होतील, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देगुरुवारी उपराजधानीत विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक क्षेत्र कमी होत आहे. खासगीकरण वाढत आहे. शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरली जात नाही. खासगीत आरक्षण मिळत नाही. अनुसूचित जातीच्या उद्योजकांकडून अल्प खरेदी करण्यात आली. सरकारच्या धोरणांमुळे सामाजिक न्यायासह लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी भूमिकेचा ऱ्हास होणे, ही चिंतेची बाब आहे. लोकशाहीचा सन्मान व्हावा यासाठी उपराजधानीतून विचारमंथनाला १४ मार्चपासून सुरुवात होणार आहे. उपराजधानीतील ४० संघटना या चर्चेत सहभागी होतील, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.नागपुरातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत प्रगतिशील विचारांच्या संघटनांचे ‘फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सोशल जस्टीस, सेक्युलॅरिझम अँड डेमोक्रसी’ तयार केला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वर्षभरापूर्वी ३० पेक्षाही अधिक सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर समान तत्त्वे, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी फेडरेशनची स्थापना केली. वंचित समाजगटांच्या प्रश्नांवरील उपायांसाठी फेडरेशनने सध्याच्या आर्थिक, सामाजिक धोरणांत सुधारणा करण्यासाठी सूचनाही केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. त्रिलोक हजारे, प्रदीप नगरारे, दादाकांत धनविजय, डॉ. विमल थोरात,डॉ. कृष्णा कांबळे, शिवदास वासे, अशोक सरस्वती, प्रा.गौतम कांबळे आदी उपस्थित होते.तीन वर्षांपासून श्ष्यिवृत्ती नाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्थिक कमकुवत घटकांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची सोय केली. मात्र मागील तीन वर्षापासून ती मिळणेच बंद झाले आहे. केंद्र सरकारने अनुसूचित जाती, जनजाती व इतर मागास जातीसाठींची धोरणे बदलली आहेत. अ‍ॅट्रॉसिटीची प्रकरणे वाढली आहेत. खासगीकरण वाढले असून शाळा व उच्च शिक्षणाच्या खासगीकरणामुळे गरिबांच्या शिक्षणातील संधी कमी झाल्या, असे डॉ. थोरात म्हणाले.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर