शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्यायासह लोकशाही भूमिकेचा ऱ्हास : सुखदेव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:43 IST

सार्वजनिक क्षेत्र कमी होत आहे. खासगीकरण वाढत आहे. शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरली जात नाही. खासगीत आरक्षण मिळत नाही. अनुसूचित जातीच्या उद्योजकांकडून अल्प खरेदी करण्यात आली. सरकारच्या धोरणांमुळे सामाजिक न्यायासह लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी भूमिकेचा ऱ्हास होणे, ही चिंतेची बाब आहे. लोकशाहीचा सन्मान व्हावा यासाठी उपराजधानीतून विचारमंथनाला १४ मार्चपासून सुरुवात होणार आहे. उपराजधानीतील ४० संघटना या चर्चेत सहभागी होतील, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देगुरुवारी उपराजधानीत विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक क्षेत्र कमी होत आहे. खासगीकरण वाढत आहे. शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरली जात नाही. खासगीत आरक्षण मिळत नाही. अनुसूचित जातीच्या उद्योजकांकडून अल्प खरेदी करण्यात आली. सरकारच्या धोरणांमुळे सामाजिक न्यायासह लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी भूमिकेचा ऱ्हास होणे, ही चिंतेची बाब आहे. लोकशाहीचा सन्मान व्हावा यासाठी उपराजधानीतून विचारमंथनाला १४ मार्चपासून सुरुवात होणार आहे. उपराजधानीतील ४० संघटना या चर्चेत सहभागी होतील, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.नागपुरातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत प्रगतिशील विचारांच्या संघटनांचे ‘फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सोशल जस्टीस, सेक्युलॅरिझम अँड डेमोक्रसी’ तयार केला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वर्षभरापूर्वी ३० पेक्षाही अधिक सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर समान तत्त्वे, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी फेडरेशनची स्थापना केली. वंचित समाजगटांच्या प्रश्नांवरील उपायांसाठी फेडरेशनने सध्याच्या आर्थिक, सामाजिक धोरणांत सुधारणा करण्यासाठी सूचनाही केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. त्रिलोक हजारे, प्रदीप नगरारे, दादाकांत धनविजय, डॉ. विमल थोरात,डॉ. कृष्णा कांबळे, शिवदास वासे, अशोक सरस्वती, प्रा.गौतम कांबळे आदी उपस्थित होते.तीन वर्षांपासून श्ष्यिवृत्ती नाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्थिक कमकुवत घटकांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची सोय केली. मात्र मागील तीन वर्षापासून ती मिळणेच बंद झाले आहे. केंद्र सरकारने अनुसूचित जाती, जनजाती व इतर मागास जातीसाठींची धोरणे बदलली आहेत. अ‍ॅट्रॉसिटीची प्रकरणे वाढली आहेत. खासगीकरण वाढले असून शाळा व उच्च शिक्षणाच्या खासगीकरणामुळे गरिबांच्या शिक्षणातील संधी कमी झाल्या, असे डॉ. थोरात म्हणाले.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर