शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

सामाजिक न्यायासह लोकशाही भूमिकेचा ऱ्हास : सुखदेव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:43 IST

सार्वजनिक क्षेत्र कमी होत आहे. खासगीकरण वाढत आहे. शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरली जात नाही. खासगीत आरक्षण मिळत नाही. अनुसूचित जातीच्या उद्योजकांकडून अल्प खरेदी करण्यात आली. सरकारच्या धोरणांमुळे सामाजिक न्यायासह लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी भूमिकेचा ऱ्हास होणे, ही चिंतेची बाब आहे. लोकशाहीचा सन्मान व्हावा यासाठी उपराजधानीतून विचारमंथनाला १४ मार्चपासून सुरुवात होणार आहे. उपराजधानीतील ४० संघटना या चर्चेत सहभागी होतील, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देगुरुवारी उपराजधानीत विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक क्षेत्र कमी होत आहे. खासगीकरण वाढत आहे. शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरली जात नाही. खासगीत आरक्षण मिळत नाही. अनुसूचित जातीच्या उद्योजकांकडून अल्प खरेदी करण्यात आली. सरकारच्या धोरणांमुळे सामाजिक न्यायासह लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी भूमिकेचा ऱ्हास होणे, ही चिंतेची बाब आहे. लोकशाहीचा सन्मान व्हावा यासाठी उपराजधानीतून विचारमंथनाला १४ मार्चपासून सुरुवात होणार आहे. उपराजधानीतील ४० संघटना या चर्चेत सहभागी होतील, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.नागपुरातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत प्रगतिशील विचारांच्या संघटनांचे ‘फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन फॉर सोशल जस्टीस, सेक्युलॅरिझम अँड डेमोक्रसी’ तयार केला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वर्षभरापूर्वी ३० पेक्षाही अधिक सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर समान तत्त्वे, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी फेडरेशनची स्थापना केली. वंचित समाजगटांच्या प्रश्नांवरील उपायांसाठी फेडरेशनने सध्याच्या आर्थिक, सामाजिक धोरणांत सुधारणा करण्यासाठी सूचनाही केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. त्रिलोक हजारे, प्रदीप नगरारे, दादाकांत धनविजय, डॉ. विमल थोरात,डॉ. कृष्णा कांबळे, शिवदास वासे, अशोक सरस्वती, प्रा.गौतम कांबळे आदी उपस्थित होते.तीन वर्षांपासून श्ष्यिवृत्ती नाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्थिक कमकुवत घटकांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची सोय केली. मात्र मागील तीन वर्षापासून ती मिळणेच बंद झाले आहे. केंद्र सरकारने अनुसूचित जाती, जनजाती व इतर मागास जातीसाठींची धोरणे बदलली आहेत. अ‍ॅट्रॉसिटीची प्रकरणे वाढली आहेत. खासगीकरण वाढले असून शाळा व उच्च शिक्षणाच्या खासगीकरणामुळे गरिबांच्या शिक्षणातील संधी कमी झाल्या, असे डॉ. थोरात म्हणाले.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर