शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

रेल्वे प्रवासातील ओळखीने केले उद्ध्वस्त

By admin | Updated: December 4, 2015 03:14 IST

रेल्वे प्रवासात झालेल्या एका ओळखीचा गैरफायदा घेत एका विवाहितेला उद्ध्वस्त करणाऱ्या एका ठगबाज तरुणाचा ...

न्यायालय : रूमील शर्माचा जामीन अर्ज फेटाळलानागपूर : रेल्वे प्रवासात झालेल्या एका ओळखीचा गैरफायदा घेत एका विवाहितेला उद्ध्वस्त करणाऱ्या एका ठगबाज तरुणाचा जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. रूमील धरमवीर शर्मा (२८), असे आरोपीचे नाव असून तो वाठोड्याच्या महाकाली अपार्टमेंट येथील रहिवासी आहे. पीडित महिला ही २९ वर्षांची असून सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. २०१४ मध्ये ही महिला मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल येथून नागपूरला जाण्यासाठी रेल्वेत बसली होती. प्रवास सुरू होताच डब्यातच तिची रूमीलसोबत ओळख झाली होती. रूमील हा एखाद्या चित्रपटातील हिरोसारखा दिसत होता. आपल्या बोलण्याने तो कुणालाही भुरळ घालत होता. बेरोजगारांना व्यवसाय आणि नोकरी मिळवून देण्यासाठी आपली संस्था सतत प्रयत्न करीत असते, असे तो सांगत होता. हळूहळू या दोघांमध्ये ओळख होऊन मैत्री झाली. नागपुरात परतल्यानंतर दोघेही एकमेकांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटू लागले होते. अनैतिक संबंध फुलू लागले होते. रूमील हा पीडित महिलेच्या घरी जाऊन जबरदस्तीने तिच्याशी लैंगिक चाळे करायचा. त्याने पाच-सहा वेळा चाळे केले. तिचे अश्लील छायाचित्र काढून अश्लील व्हिडिओ चित्रफितही तयार केली होती. तो तिला सतत ब्लॅकमेलही करू लागला होता. तो तिला पैसेही मागू लागला होता. एकदा तिने स्वत:चे मंगळसूत्र विकण्यासाठी रूमील याला ज्वेलर्सच्या दुकानात नेले होते. परंतु ज्वेलर्सने मंगळसूत्र घेण्यास नकार दिला होता. २४ आॅक्टोबर २०१५ रोजी रूमील हा पीडित महिलेच्या घरी असताना पैशाच्या मोबदल्यात त्याने या महिलेवर बलात्कार केला होता. तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफित समाजात प्रसारित करण्याची तसेच तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देऊन तो या महिलेकडून पैसे उकळत होता आणि शरीर संबंधही प्रस्थापित करीत होता. तिने त्याच दिवशी केलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३७६, ३८८, ५०६ (ब) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपीला तातडीने अटकही करण्यात आली होती. (प्रतिनिधी) आरोपीच्या उलट्या बोंबाआरोपी रूमील याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. संबंधित महिलेने आपणाविरुद्ध कुणाच्या तरी प्रभावाखाली तक्रार नोंदवली. आमच्यामध्ये केवळ मैत्रीचे संबंध होते. या महिलेने आतापर्यंत मोठी रक्कम उसनवारीने घेतलेली आहे. जेव्हा-जेव्हा तिला पैशाची गरज भासत होती, तेव्हा आपण तिला पैसे देत होतो. पैसे थकीत असूनही तिला मदत केली. आपण पैसे परत मागितले असता तिने आपणाविरुद्ध खोटी तक्रार नोंदवली.प्रकरण गंभीरहे प्रकरण गंभीर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास येताच तसेच तपास प्राथमिक स्तरावर असल्याने, जामीन मिळताच आरोपी पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील वर्षा सायखेडकर, तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. जलतारे यांनी काम पाहिले.