शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
3
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
4
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
5
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
6
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
7
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
8
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
9
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
10
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
11
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
12
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
14
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
15
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
16
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
17
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
18
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
19
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
20
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पात पाणी असूनही नागपूर विभागातील टंचाईग्रस्त गावे वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 11:08 IST

नागपूर विभागाच्या पाणीटंचाई आराखड्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ६२३ गावे व ६३ वाड्यांची भर पडली आहे.

ठळक मुद्देविभागात ४०९० गावे टंचाईग्रस्तमागील वर्षाच्या तुलनेत अधिकच्या ६२३ गावांचा समावेश

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागासह राज्यातील प्रकल्पात पुरेसा जलसाठा आहे. गेल्या वर्षीसारखी गंभीर परिस्थिती नाही. पावसाळ्यात चांगला पाऊ स झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीतही वाढ झाली आहे. असे असतानाही नागपूर विभागाच्या पाणीटंचाई आराखड्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ६२३ गावे व ६३ वाड्यांची भर पडली आहे. २०१८-१९ या वर्षाच्या आराखड्यात ३४६७ गावे व ३९ वाड्यांचा समावेश होता. तर २०१९-२० या वर्षाच्या कृती आराखड्यात ४०९० गावे व १०२ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. पण टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढल्याने या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नागपूर विभागातील प्रकल्पात गेल्या वर्षी फेब्रुवारी अखेर जेमतेम १७ टक्के जलसाठा उपलब्ध होता. यंदा ५८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या सहा जिल्ह्यांच्या २०१९-२० या वर्षाच्या पाणीटंचाई निवारण कार्यक्रमात ४०९० गावे व १०२ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.टंचाई निवारणासाठी ७२४९ उपाययोजना प्रस्तावित असून यावर ८२. ८३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत नवीन विंधन विहिरीवर, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळयोजना, टँकरद्वारे अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, प्रगतिपथावरील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे आदी नऊ उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे.पंचायत समिती स्तरावर नियोजनजिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार करताना पंचायत समिती स्तरावर नियोजन केले जाते. स्थानिक पदाधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने यात योजना प्रस्तावित केल्या जातात.विशेष म्हणजे टंचाई निवारण कार्यक्रमात प्रामुख्याने बोअरवेल व टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनांचा समावेश असतो. टंचाई निवारणाची कामे झालेल्या गावांचाच पुढील वर्षाच्या यादीत समावेश केला जातो. नागपूर जिल्ह्यातील कुही पंचायत समितीने सहा खासगी विहिरी अधिग्रहीत करण्याचे सुचविले आहे. याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे.

टॅग्स :Waterपाणी