शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पात पाणी असूनही नागपूर विभागातील टंचाईग्रस्त गावे वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 11:08 IST

नागपूर विभागाच्या पाणीटंचाई आराखड्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ६२३ गावे व ६३ वाड्यांची भर पडली आहे.

ठळक मुद्देविभागात ४०९० गावे टंचाईग्रस्तमागील वर्षाच्या तुलनेत अधिकच्या ६२३ गावांचा समावेश

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर विभागासह राज्यातील प्रकल्पात पुरेसा जलसाठा आहे. गेल्या वर्षीसारखी गंभीर परिस्थिती नाही. पावसाळ्यात चांगला पाऊ स झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीतही वाढ झाली आहे. असे असतानाही नागपूर विभागाच्या पाणीटंचाई आराखड्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ६२३ गावे व ६३ वाड्यांची भर पडली आहे. २०१८-१९ या वर्षाच्या आराखड्यात ३४६७ गावे व ३९ वाड्यांचा समावेश होता. तर २०१९-२० या वर्षाच्या कृती आराखड्यात ४०९० गावे व १०२ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. पण टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढल्याने या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नागपूर विभागातील प्रकल्पात गेल्या वर्षी फेब्रुवारी अखेर जेमतेम १७ टक्के जलसाठा उपलब्ध होता. यंदा ५८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या सहा जिल्ह्यांच्या २०१९-२० या वर्षाच्या पाणीटंचाई निवारण कार्यक्रमात ४०९० गावे व १०२ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.टंचाई निवारणासाठी ७२४९ उपाययोजना प्रस्तावित असून यावर ८२. ८३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत नवीन विंधन विहिरीवर, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळयोजना, टँकरद्वारे अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे तसेच खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, प्रगतिपथावरील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे आदी नऊ उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे.पंचायत समिती स्तरावर नियोजनजिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार करताना पंचायत समिती स्तरावर नियोजन केले जाते. स्थानिक पदाधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने यात योजना प्रस्तावित केल्या जातात.विशेष म्हणजे टंचाई निवारण कार्यक्रमात प्रामुख्याने बोअरवेल व टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याच्या योजनांचा समावेश असतो. टंचाई निवारणाची कामे झालेल्या गावांचाच पुढील वर्षाच्या यादीत समावेश केला जातो. नागपूर जिल्ह्यातील कुही पंचायत समितीने सहा खासगी विहिरी अधिग्रहीत करण्याचे सुचविले आहे. याची जिल्हा परिषदेत चर्चा आहे.

टॅग्स :Waterपाणी