शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

४० कोटी खर्च करूनही अनेक रस्त्यांवर अंधार

By admin | Updated: September 13, 2015 02:50 IST

पथदिव्याच्या देखभाल दुरुस्तीला पुढील सहा महिन्यासाठी मुदतवाढ देत यावर ६ कोटी ७८ लाखाचा खर्च करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

कंत्राटदाराला मुदतवाढ : २६ हजार एलईडी केव्हा बसणारनागपूर : पथदिव्याच्या देखभाल दुरुस्तीला पुढील सहा महिन्यासाठी मुदतवाढ देत यावर ६ कोटी ७८ लाखाचा खर्च करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. गेल्या तीन वर्षात पथदिव्यांवर ४० कोटीचा खर्च करूनही शहरातील अनेक रस्त्यावर रात्रीला अंधार असूनही ही मुदतवाढ देण्यात आली आहे. मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विकास कामासाठी पैसे नाही. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. असे असे असतांना रस्त्यावरील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात कंत्राटदाराकडून किती पथदिवे दुरुस्त करण्यात आले याची माहिती मनपाच्या विद्युत विभागाकडे नाही. स्थायी समितीलाही याची माहिती देण्यात आलेली नाही. असे असतानाही प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. शहरात १ लाख २६ हजारांवर पथदिवे आहेत. रात्रीच्या सुमारास यामुळे वाहनचालकांना मदत होते. यातील २६ हजार पथदिवे एलईडी करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र अद्याप ५० टक्केही एलईडी दिवे बसलेले नाही. पथ दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तीन वर्षाचे कंत्राट देण्यात आले होते. ३० सप्टेंबरला याची मुदत संपत असल्याने पुन्हा सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. वायर बदलणे व इतर कामासाठी वेगळा खर्च असल्याचे विभागातील अधिकाऱ्यानी सांगितले. पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.(प्रतिनिधी)अनेक रस्त्यावर अंधारगेल्या तीन वर्षात पथदिव्यावर ४० कोटीचा खर्च करण्यात आला. परंतु झिंगाबाई टाकळी मार्ग, तेलंखेडी मार्ग, मानेवाडा रिंगरोड, लालगोदाम मार्ग, तसेच दक्षिण अंबाझरी मार्गावरील रस्त्यावरील अनेक पथदिवे बंद असल्याची नागरिकांची तक्रार आहे.