शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

केंद्र व राज्यात सत्ता असूनही नागपूर विकासाचे अनुदान प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:29 IST

केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. महापालिकेतही भाजपाचीच सत्ता आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहरात विकासाचे प्रकल्प सुरू असल्याने शहराचा चौफेर विकास होत असल्याचा दावा केला जात आहे.

ठळक मुद्देचौफेर विकासावर पाणी फेरण्याचा धोका३२५ कोटींचा प्रस्ताव अडला कुठे ?

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. महापालिकेतही भाजपाचीच सत्ता आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहरात विकासाचे प्रकल्प सुरू असल्याने शहराचा चौफेर विकास होत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या प्रकल्पातील वाटा उचलण्यासाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसा नसल्याने विकासावर पाणी फिरणार आहे. दुसरीकडे, कंत्राटदारांची थकबाकी ३०० कोटींवर गेली आहे. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नाही, जुनी थकबाकी मिळालेली नाही. दिवाळीपूर्वी थकबाकी न मिळाल्यास कंत्राटदार व कर्मचाऱ्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशा बिकट आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविलेला विशेष विकास सहाय्य अनुदानाचा ३२५ कोटींचा प्रस्ताव गेल्या चार महिन्यापासून शासन स्तरावर रखडला आहे.नागपूर शहराचा उपराजधानीच्या दर्जाचा विकास साधण्यासाठी, राज्यातील इतर मेट्रो शहराप्रमाणे सर्वांगीण विकास करण्याकरिता दरवर्षी विशेष सहाय्य अनुदान म्हणून ३२५ कोटींचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करावा. अशा आशयाचा प्रस्ताव ५ जून २०१८ रोजी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता.महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी २० जून २०१८ रोजी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे हा प्रस्ताव पाठविला. गेल्या चार महिन्यापासून पदाधिकारी व प्रशासनाकडून यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र अद्याप हा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित असल्याने महापालिकेची आर्थिक कोंडी सुटलेली नाही. परिणामी विकास कामे जवळपास ठप्प पडलेली आहेत.

३ हजार १२ कोटींचे दायित्वनागपूर शहरात सुरू असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पात समावेश असलेल्या स्मार्ट सिटी , सिमेंट रोड, अमृत योजना, परिवहन सेवा, भांडेवाडी एसटीपी ,वेसट टू एनर्जी, घनकचरा व्यवस्थापन, झोपडपट्टी पुनर्वसन सिव्हरेज प्रकल्प, नागनदी सौंदर्यीकरण अशा विविध प्रकल्पासासाठी महापालिकेला पुढील पाच ते सात वर्षात ३ हजार १२ कोटीचे दायित्व द्यावयाचे आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून विशेष अनुदान न मिळाल्यास महापालिकेला विकास प्रकल्पातील आपला वाटा उचलता येणार नाही. परिणामी शहराच्या चौफेर विकासावर पाणी फिरणार आहे.

मुख्यमंत्र्यांनाही सहा महिन्यापूर्वी दिले पत्र१९९५-९६ साली शासन स्तरावर विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. काही वर्ष अनुदान मिळाले. पण नंतर बंद झाले. आता पुन्हा विशेष सहायता अनुदान मिळावे म्हणून सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी पत्र दिले होते. त्यानंतर समितीने प्रस्ताव मंजूर करून तो राज्य सरकारकडे पाठविला आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारकडे पाठविलेला ३२५ कोटींचा विशेष विकास साहाय्य अनुदानाच्या प्रस्तावाचा प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. लवकररच शासनाकडून मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.- रवींद्र ठाकरे,प्रभारी आयुक्त

जीएसटी अनुदान ९२ कोटी करासध्या महापालिकेला वेतन, पेन्शन, वीज, पाणी, देखभाल व इंधन यासह अन्य बाबींवर महिन्याला ९२ कोटींचा खर्च करावा लागतो. जकात व एलबीटी बंद झाल्याने जीएसटी अनुदानावर महापालिकेला निर्भर राहावे लागते. परंतु अपेक्षित अनुदान मिळत नाही. दरवर्षी खर्च वाढत आहे. पुढील सात वर्षात विकास योजनांवर महापालिकेला मोठा खर्च करावयाचा आहे. शासनाकडून जीएसटी अनुदान म्हणून दर महिन्याला ५१ ते ५२ कोटी मिळतात. यात वाढ करून दर महिन्याला ९२ कोटी अनुदान करण्याची मागणी महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका