शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

प्रवासी नको नको म्हणत असूनही चालकाने बस पुलावरून नेली आणि घडले अघटित..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 17:31 IST

Nagpur News तब्बल २४ वर्षे विनाअपघात सेवा करूनही एका बेसावध क्षणी चालकाचा आत्मविश्वास नडला. पुलावरून वाहत असलेल्या पाण्यात वाहन घातले. अखेर अनर्थ घडला.

ठळक मुद्दे२४ वर्षांच्या सेवेत पहिलीच चूक ठरली गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तब्बल २४ वर्षे विनाअपघात सेवा करूनही एका बेसावध क्षणी चालकाचा आत्मविश्वास नडला. पुलावरून वाहत असलेल्या पाण्यात वाहन घातले. अखेर अनर्थ घडला. महामंडळाची बस प्रवाशांसह पुरात वाहून गेली. काठावरच्या गावकऱ्यांनाही केवळ धावाधाव करण्यापलीकडे काहीच करता आले नाही. नागपुरातील घाट रोड आगर-क्र. १ ची ही बस आहे. (Despite the passengers saying no, the driver took the bus off the bridge and the accident happened.)

नांदेडहून नागपूरकडे प्रवासी घेऊन निघालेल्या बसच्या या अपघातामुळे वातावरणच सुन्न झाले आहे. एसटी महामंडळाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक सतीश रंगप्पा सूरेवार (५३, बॅच क्र. १०७६१) आणि वाहक भीमराव लक्ष्मण नागरीकर (५६, बॅच क्र. २८३९५) हे सोमवारी सकाळी ६ वाजता प्रवासी घेऊन नागपूरवरून नांदेडला एम.एच. १४, बी.टी. ५०१८ क्रमांकाच्या बसने निघाले होते. दुपारी १ बस वाजता पोहोचली. विश्रांतीनंतर मंगळवारी सकाळी ५.१८ वाजता हे दोघेही परतीच्या फेरीसाठी नांदेडवरून निघाले. तिकीट मशीनला जोडलेल्या जीपीएस प्रणालीनुसार या बसमध्ये आठ प्रवासी होते, अशी नोंद आहे. त्यातील ४ हदगाव आणि ४ प्रवासी दिग्रसला उतरणारे होते. हदगावमध्ये प्रवासी चार उतरविल्यावर उमरखेडवरून ही बस ७.३० वाजता दिग्रसमार्गे नागपूरकडे निघाली. हे घटनास्थळ उमरखेडपासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर आहे. उमरखेड-पुसद मार्गावरील दहागाव पुलावर पुराचे पाणी होते. हा सरावाचा मार्ग असल्याने आणि आदल्या दिवशी फारशे पाणी नसल्याने चालकाने पुलावरून बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाहामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने ही वाहून गेली.

चालकाला मार्गावर १५ वर्षांचा अनुभव

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चालक सतीश सुरेवार यांना एसटी महामंडळामध्ये २४ वर्षांचा अनुभव असून १९९७ मध्ये ते महामंडळात रुजू झाले होते. पुढील दोन वर्षांनी ते निवृत्त होणार होते. या काळात त्यांच्या हाताने एकही अपघात घडल्याची नोंद नाही. नागपूर- नांदेड या मार्गावरील सेवेचा त्यांना मागील १५ वर्षांपासून अनुभव होता. रात्रंदिवस असलेल्या या सरावाच्या मार्गवरच नको ते साहस जिवावर बेतले. वाहक भीमराव लक्ष्मण नागरीकर यांचीही महामंडळातील सेवा उत्तम होती.

सोमलवाडा, दिघोरीत शोककळा

या अपघातामधील चालक आणि वाहक नागपुरातीलच आहेत. चालक सतीश रंगप्पा सुरेवार हे सोमलवाडा येथे राहतात. त्यांना एक मुली, पत्नी असा परिवार आहे. तर, वाहक भीमराव लक्ष्मण नागरीकर हे दिघोरीला राहतात. त्यांना दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. सकाळी टीव्हीवरून ही बातमी सर्वत्र झळकताच या कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला. अपघातग्रस्त बस नांदेडहून नागपूरला येत होती हे कळल्यावर पुढच्या दुर्घटनेची कल्पना आल्याने एकच हलकल्लाेळ उडाला.

...

टॅग्स :Accidentअपघात