शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

प्रभाग रचनेचा आराखडा फुटला?

By admin | Updated: September 9, 2016 03:04 IST

राज्यातील महापालिकांच्या आगामी निवडणुका चार सदस्यीय रचनेनुसार होणार आहेत. त्यानुसार नवीन प्रभागरचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

सोईनुसार प्रभाग रचना : पदाधिकाऱ्यांकडून मर्जीतील नगरसेवकांना विचारणा नागपूर : राज्यातील महापालिकांच्या आगामी निवडणुका चार सदस्यीय रचनेनुसार होणार आहेत. त्यानुसार नवीन प्रभागरचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु नवीन आराखडा विभागीय आयुक्तांना सादर करण्यापूर्वीच काही पदाधिकाऱ्यांना याची पूर्वकल्पना होती. त्यामुळे हा आराखडा सादर होण्यापूर्वीच फुटल्याची महापालिकेत गुरुवारी जोरदार चर्चा होती. महानगरपालिकेची निवडणूक सोईची जावी यासाठी काही वजनदार नगरसेवकांनी आपल्या मर्जीनुसार नवीन प्रभागाची रचना करून घेतली. काही नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांनीच विचारणा करून प्रभागात कोणत्या वस्त्यांचा समावेश सोईचा राहील याची माहिती जाणून घेतली. त्यानुसार प्रभागाची रचना करण्यात आली. त्यामुळे नवीन प्रभागरचनेची अनेकांना पूर्वकल्पना असल्याने त्यांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रभाग रचना करताना जुन्या वॉर्डाची रचना, प्रमुख रस्ते, गट यांचा विचार करणे आवश्यक असते. परंतु यात पळवाटा शोधून काही नगरसेवकांच्या सोईची प्रभाग रचना करण्यात आल्याची माहिती काही नगरसेवकांनी दिली.७ सप्टेंबरला प्रभाग रचनेचा आराखडा विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला. त्यामुळे काही नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांना फोनवरून विचारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना प्र्रतिसाद मिळाला नाही. प्रभाग रचनेचा आराखडा गोपनीय असल्याचा भास निर्माण करण्यात आला. वास्तविक काही दिवसापूर्वीच प्रभाग रचनेचा नवीन आराखडा निश्चित करण्यात आला होता. विरोधी पक्षाच्या काही नगरसेवकांच्या प्रभागाचे तुकडे करून विविध प्रभागांना जोडण्यात आले तर काही जुने प्रभाग कायम ठेवून त्याला नवीन भाग जोडण्यात आल्याची माहिती आहे. विशिष्ट वस्त्यांतील मतदारांच्या बळावर अनेक नगरसेवक निवडून येत होेते. नवीन प्रभाग रचनेत अशा वस्त्या वेगवेगळ्या प्रभागांना जोडण्यात आल्याची चर्चा असल्याने नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. यासंदर्भात काहींनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)