शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘डिझाईन इट इन स्मार्ट वे’; रितू मल्होत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 10:38 IST

अवघ्या २४ वर्षांच्या रितू मल्होत्रा हिची यशोगाथा महिला दिनाच्या निमित्ताने हजारो विद्यार्थिनी व तरुणींना प्रेरणा देणारी आहे.

ठळक मुद्देरतन टाटांनी थोपटली रितू मल्होत्राची पाठ

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: वडिलांचे छत्र डोक्यावर नसतानादेखील ती खचली नाही. मोठ्या भावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तिने शिकण्यावर लक्ष केंद्रित केले. इतर अभियंत्यांसारखा तिलादेखील सहजपणे चांगल्या ‘पॅकेज’चा ‘जॉब’ लागला असता. मात्र ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’चा सुवर्णमध्य साधून स्वत:ला सिद्ध करण्याचा तिने संकल्प केला आणि झपाट्याने कामाला लागली.आज तिची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली असून देशातील अग्रणी उद्योगपती रतन टाटा यांनी खुद्द तिची पाठ थोपटली आहे. अवघ्या २४ वर्षांच्या रितू मल्होत्रा हिची यशोगाथा महिला दिनाच्या निमित्ताने हजारो विद्यार्थिनी व तरुणींना प्रेरणा देणारी आहे.मोठ्या भावाच्या कामामध्ये मदत करत असताना तिने चक्क संकेतस्थळ ‘डिझाईन’ करण्यास सुरुवात केली. याशिवाय संगणकाशी संबंधित कामांचे ‘फ्रीलान्सिंग’ करून तिने शिक्षणाचा खर्च उचलला. या कार्यात तिला मोठा भाऊ प्रतीक मल्होत्रा व प्रतीक हरडे यांचे पाठबळ होतेच. तिने ‘डिजिटल अ‍ॅक्वारिअम’ची निर्मिती केली. यात मानवी हस्तक्षेपाशिवाय सुमारे ३० दिवसांपर्यंत माशांना अन्न देणे, पाणी शुद्ध करणे, स्वच्छता करणे ही कामे केली जाऊ शकतात. या शोधाचे ‘पेटंट’ मिळावे यासाठी तिने अर्ज केला आहे. या शोधानंतर तिने ‘डिजिटल प्लँटर’ हा नवा शोध लावला. घरात एखादे झाड लावल्यानंतर वर्षभरदेखील त्याला पाणी, खत, प्रकाश उपलब्ध करू शकणारी प्रणाली यात वापरण्यात आली आहे. या कुंडीला बसविण्यात आलेल्या यंत्रामुळे तेथील झाडाला रोज पाणी किंवा खत देण्याचे काम हे यंत्र स्वत:च करणार आहे. यात अगदी ‘ब्ल्यू टूथ’, गाणे ऐकण्याची सोयदेखील आहे. याची माहिती केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ या संकेतस्थळावर जाहीर होताच अनेक ‘सेलिब्रिटी’ व नामवंतांनी याचा वापर सुरू केला. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कंपन्या व संशोधकांनीही तिच्या कार्याचे कौतुक केले आहे. आपला देश ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स’मध्ये ६८ व्या स्थानावर आहे. देशाची प्रगती घडवायची असेल तर संशोधनावर जास्त भर दिला पाहिजे. विशेषत: तरुणी तर याबाबतीत विशेष कार्य करू शकतात, अशी भावना तिने व्यक्त केली.रितू, प्रतीक मल्होत्रा व प्रतीक हरडे यांनी ‘स्मार्ट कूलर’ची निर्मिती केली आहे. अवघ्या दोन लिटर पाण्यामध्ये दिवसभर चालू शकणाऱ्या या ‘स्मार्ट’ व ‘इकोफ्रेंडली कूलर’ची चर्चा रतन टाटा यांच्यापर्यंत पोहोचली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये तिला सहभागी होण्यासाठी निमंत्रण आले होते. यावेळी रतन टाटा यांनी रितूला स्वत:हून आवाज देऊन बोलावून घेतले व तिच्या संशोधनाबाबत जाणून घेतले. महिलांची शक्ती खऱ्या अर्थाने दिसून येत असून तू अशीच मेहनत कर असा सल्ला त्यांनी तिला दिला. तसेच या शोधाबाबतचा प्रस्तावदेखील त्यांनी मागवून घेतला.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस