शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नैराश्य योग्य उपचाराने बरा होणारा आजार : माधुरी थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 23:30 IST

‘नैराश्य’ हा वेळीच व योग्य उपचारांमुळे बरा होणारा आजार आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांनी केले.

ठळक मुद्देआत्महत्या प्रतिबंधक दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाचा गरजा वाढत आहे यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर अशी व्यक्ती स्वत:साठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरू शकेल किंवा आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकेल. ‘नैराश्य’ हा वेळीच व योग्य उपचारांमुळे बरा होणारा आजार आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांनी केले.प्रादेशिक मनोरुग्णालयात मंगळवारी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. मंचावर डॉ. दीपक अवचट, डॉ. अभिषेक मार्मडे उपस्थित होते.डॉ. थोरात यांनी शासनातर्फे विविध मानसिक आजारावरील उपचार व केलेल्या सुविधांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या कोणत्याही भावनांविषयी तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत बोला. जेणेकरून तुमच्या भावनांना मोकळी वाट मिळेल. आपलं खाणं आणि आपल्या भावना यात एक प्रकारचे नाते असते. म्हणूनच नेहमी चांगले सकस अन्न सेवन करावे. मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत मन मोकळे करा. कार्यालयीन किंवा नेहमीच्या कामातून ‘ब्रेक’ घ्या. मग तो ब्रेक अगदी पाच मिनिटाचा का असेना, घरकामातून पाच मिनिटं शांत बसा. शनिवार-रविवार कुठेतरी फिरायला जाणे हा अतिशय चांगला ब्रेक ठरू शकतो. एखाद्या चांगल्या गोष्टीचा ‘छंद’ जोपासा. त्यात रमण्याचा प्रयत्न करा. त्यामुळेही तणावापासून काहीसे लांब राहता येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यसनांपासून दूर राहा, असेही त्या म्हणाल्या. या प्रसंगी डॉ. अवचट व डॉ. मार्मडे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.संचालन संध्या दुर्गे यांनी केले. आभार डॉ. अमोल चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला १२० रुग्ण उपस्थित होते. हा कार्यक्रम आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. तायडे व उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयSuicideआत्महत्या