शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांबाबतच नेहमी उदासीनता

By admin | Updated: December 14, 2014 00:43 IST

सरकार कुणाचेही असो, आजवर शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याच सरकारने ठोस काम केलेले नाही. औद्योगिक विकासासाठी उद्योगपतींना सर्व सुखसोयी तातडीने उपलब्ध करून दिल्या जातात.

परिसंवाद : राम नेवले यांचे प्रतिपादन नागपूर : सरकार कुणाचेही असो, आजवर शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याच सरकारने ठोस काम केलेले नाही. औद्योगिक विकासासाठी उद्योगपतींना सर्व सुखसोयी तातडीने उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु शेतकऱ्यांबाबत मात्र उदासिनता दाखविली जाते. उत्पादन खर्चाएवढा भावही शेतकऱ्यांना मिळत नाही, मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली तरी शासन तो मिळू देत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही, तर काय करणार. शेतकऱ्यांच्या आत्महत्या खरंच थांबवायच्या असतील तर थातूरमातूर कारवाई करून होणार नाही, त्यासाठी मार्शल प्लॅन लागू करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम नेवले यांनी केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने चिटणीस पार्क येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान आयोजित दुसऱ्या सत्रातील ‘विदर्भातील शेती, शेतमालाचे भाव, सिंचनाचा अनुशेष परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ या विषयावर आयोजित परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. डॉ. मानवेंद्र काचोळे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, शेतीच्या भरवशावरच जगातील सर्व प्रगत राष्ट्रांनी आपापल्या देशाला विकसित केले आहे. परंतु आपल्या देशात औद्योगिक विकास साधण्यासाठी शेतीकडे दुर्लक्ष होत गेले. त्याचे परिणाम आज दिसून येत आहेत. धर्मराज रेवतकर यांनी विदर्भातील सिंचनाच्या अनुशेषावर प्रकाश टाकला. संध्या एदलाबादकर यांनी विदर्भ पॅकेज शेतकऱ्यांसाठी कसे फोल ठरेल, हे समजावून सांगितले.तर नितीन रोंघे आणि अविनाश काळे यांनी स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास अशक्य असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)आज समारोप विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा उद्या दुपारी ३ वाजता समारोप करण्यात येईल. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारोपीय कार्यक्रमात वामनराव चटप व राम नेवले प्रमुख वक्ते राहतील. तत्पूर्वी ‘औद्योगिकीकरण, प्रदूषण, भारनियमन, व्यापारी समस्या’ या विषयावर सकाळी १० ते १२ या वेळात परिसंवाद, अध्यक्षस्थानी डॉ. श्रीनिवास खांदेवाले, सुधीर पालीवाल, परमजित आहुजा, विजय निवल, मृणालिनी फडणवीस, संजय कोल्हे, किशोर पोतनवार प्रमुख वक्त ेराहतील. ‘आदिवासी, वनविकास, भटक्या विमुक्तांच्या समस्या, कुपोषण, बांबू कामगारांचे प्रश्न व संपुष्टात आलेली बारा बलुतेदारी’ विषयावर दुपारी १२ वा. परिसंवाद होईल. धनंजय धार्मिक, अ‍ॅड. नंदा पराते, पारोमिता गोस्वामी, डॉ. वासुदेव फडके सहभागी होतील.