शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

निमगडे हत्याकांडाचा अंतिम अहवाल दाखल करण्यास परवानगी नाकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2022 21:29 IST

Nagpur News आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड प्रकरणामध्ये सध्याच्या परिस्थितीत विशेष सत्र न्यायालयात अंतिम अहवाल दाखल करता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी स्पष्ट केले.

ठळक मुद्देआणखी सखोल तपास करण्याचे निर्देशहायकोर्टाचा सीबीआयला दणका

नागपूर : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड प्रकरणामध्ये सध्याच्या परिस्थितीत विशेष सत्र न्यायालयात अंतिम अहवाल दाखल करता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी स्पष्ट केले, तसेच या प्रकरणाचा आणखी सखोल व सर्वसमावेशक तपास करण्याचे निर्देश केंद्रीय गुन्हे अन्वेषणला (सीबीआय) दिले.

उच्च न्यायालयाला सीबीआयने अंतिम अहवाल दाखल करण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने तपास अधिकारी जितेंद्र कचारे यांचे म्हणणे व ताजा तपास अहवाल पडताळल्यानंतर प्रकरणाचा तपास असमाधानकारक असल्याचे निरीक्षण नोंदवून ही परवानगी देण्यास नकार दिला. आतापर्यंतच्या तपासामध्ये काही महत्त्वाचे पुरावे आढळून आले आहेत. त्यामुळे सीबीआयला बरेच काही करता आले असते. परंतु, त्यांना संबंधित पुराव्यांवरून मुख्य लक्ष्यापर्यंत पोहोचता आले नाही, असे ताशेरे न्यायालयाने ओढले. याशिवाय न्यायालयाने आताही वेळ गेली नाही, असे मत व्यक्त करून प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सीबीआयला पुन्हा आठ आठवड्यांचा वेळ वाढवून दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व महेंद्र चांदवाणी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

मुलाची याचिका प्रलंबित

या प्रकरणाचा तपास वेगात पूर्ण होऊन आरोपींना कडक शिक्षा व्हावी याकरिता एकनाथ निमगडे यांचा मुलगा अनुपम निमगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही घटना ६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ८ च्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील लाल इमली चौकात घडली होती. मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना निमगडे यांची बंदुकीच्या ५ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वर्धा मार्गावरील साडेपाच एकर जमिनीच्या वादातून निमगडे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. या जमिनीचा वाद दिवाणी न्यायालयात सुरू आहे.

अंतिम अहवाल म्हणजे आरोपपत्र 

उच्च न्यायालयातील फौजदारी कायदेतज्ज्ञ ॲड. अनिल ढवस यांनी फौजदारी प्रकरणांमध्ये तपासाच्या अंतिम अहवालाला सामान्य भाषेत आरोपपत्र म्हणतात, अशी माहिती 'लोकमत'शी बोलताना दिली. फौजदारी प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींविरुद्ध सक्षम न्यायालयात अंतिम अहवाल दाखल केला जातो. फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये अंतिम अहवाल याच शब्दाचा उपयोग करण्यात आला आहे. तपास बंद करण्यासाठी समरी अहवाल दाखल करण्यात येतो, असेही ॲड. ढवस यांनी सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय