शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

‘आपली बस’ सुरू करण्याची मागणी : नागरिकांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 20:49 IST

शहरातील जवळपास सर्वच बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बाजारासोबतच रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत आहे. अशा स्थितीत नागरिकांना आपली बसची गरज भासत असून आपली बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरातील जवळपास सर्वच बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बाजारासोबतच रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत आहे. अशा स्थितीत नागरिकांना आपली बसची गरज भासत असून आपली बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर शहरातील आपली बसची चाके थांबली. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवांशिवाय इतर कार्यालये, बाजार बंद झाल्यामुळे नागरिकांचे बाहेर निघणे थांबले होते. परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू सर्व बाजार आणि कार्यालये सुरू होत आहेत. नागरिकही आपल्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत. परंतु त्यांना आपल्या घरून बाजारात किंवा कार्यालयात जाण्यासाठी स्टार बस उपलब्ध नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना घरून बाजारात जावयाचे असल्यास ते दुचाकीवर जाऊ शकत नाहीत. अशा स्थितीत त्यांना आपली बसची गरज भासत आहे. परंतु आपली बसच्या फेऱ्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आपली बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे....तर बस होतील खराबजवळपास पाच महिन्यापासून आपली बस एकाच ठिकाणी उभ्या आहेत. एकाच ठिकाणी बसेस उभ्या असल्यामुळे त्या खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत बसेसची वाहतूक सुरू झाल्यास त्यांची देखभाल करता येणे शक्य होणार आहे. महापालिकेलाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत आपली बसची वाहतूक सुरू झाल्यास महापालिकेचे उत्पन्न सुरू होईल.अद्याप काहीच आदेश नाहीतआपली बसच्या वाहतुकीबाबत महापालिकेच्या परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यांना विचारणा केली असता, आपली बस सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात राज्य शासनाचा काहीच आदेश आला नसल्याची माहिती त्यांनी दिली.वाडीवरून दररोज येत होतो सीताबर्डीलावाडी येथील रहिवासी रमेश मेश्राम यांनी सांगितले की, ते सीताबर्डी येथील एका कापडाच्या दुकानात काम करतात. ते दररोज आपली बसने ये-जा करीत होते. लॉकडाऊनमध्ये दुकान बंद असल्यामुळे त्यांना त्रास झाला नाही. परंतु आता दुकान सुरू झाल्यामुळे त्यांना वाडीवरून सीताबर्डीला येणे कठीण होत आहे.गोरेवाडा ते सीताबर्डीचा प्रवासही कठीणगोरेवाडा येथील रहिवासी आकाश निकोसे यांनी सांगितले की, ते सीताबर्डीतील मोदी नंबर ३ मधील मोबाईलच्या दुकानात काम करतात. लॉकडाऊनपूर्वी ते आपली बसने ये-जा करीत होते. परंतु आपली बस बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. ऑटोरिक्षाही बंद असल्यामुळे त्वरित आपली बस सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक