शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

‘आपली बस’ सुरू करण्याची मागणी : नागरिकांची होतेय गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 20:49 IST

शहरातील जवळपास सर्वच बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बाजारासोबतच रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत आहे. अशा स्थितीत नागरिकांना आपली बसची गरज भासत असून आपली बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरातील जवळपास सर्वच बाजार सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना बाजारासोबतच रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी जाण्यासाठी गैरसोय होत आहे. अशा स्थितीत नागरिकांना आपली बसची गरज भासत असून आपली बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर शहरातील आपली बसची चाके थांबली. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवांशिवाय इतर कार्यालये, बाजार बंद झाल्यामुळे नागरिकांचे बाहेर निघणे थांबले होते. परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू सर्व बाजार आणि कार्यालये सुरू होत आहेत. नागरिकही आपल्या कामासाठी घराबाहेर पडत आहेत. परंतु त्यांना आपल्या घरून बाजारात किंवा कार्यालयात जाण्यासाठी स्टार बस उपलब्ध नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना घरून बाजारात जावयाचे असल्यास ते दुचाकीवर जाऊ शकत नाहीत. अशा स्थितीत त्यांना आपली बसची गरज भासत आहे. परंतु आपली बसच्या फेऱ्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आपली बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे....तर बस होतील खराबजवळपास पाच महिन्यापासून आपली बस एकाच ठिकाणी उभ्या आहेत. एकाच ठिकाणी बसेस उभ्या असल्यामुळे त्या खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत बसेसची वाहतूक सुरू झाल्यास त्यांची देखभाल करता येणे शक्य होणार आहे. महापालिकेलाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत आपली बसची वाहतूक सुरू झाल्यास महापालिकेचे उत्पन्न सुरू होईल.अद्याप काहीच आदेश नाहीतआपली बसच्या वाहतुकीबाबत महापालिकेच्या परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यांना विचारणा केली असता, आपली बस सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात राज्य शासनाचा काहीच आदेश आला नसल्याची माहिती त्यांनी दिली.वाडीवरून दररोज येत होतो सीताबर्डीलावाडी येथील रहिवासी रमेश मेश्राम यांनी सांगितले की, ते सीताबर्डी येथील एका कापडाच्या दुकानात काम करतात. ते दररोज आपली बसने ये-जा करीत होते. लॉकडाऊनमध्ये दुकान बंद असल्यामुळे त्यांना त्रास झाला नाही. परंतु आता दुकान सुरू झाल्यामुळे त्यांना वाडीवरून सीताबर्डीला येणे कठीण होत आहे.गोरेवाडा ते सीताबर्डीचा प्रवासही कठीणगोरेवाडा येथील रहिवासी आकाश निकोसे यांनी सांगितले की, ते सीताबर्डीतील मोदी नंबर ३ मधील मोबाईलच्या दुकानात काम करतात. लॉकडाऊनपूर्वी ते आपली बसने ये-जा करीत होते. परंतु आपली बस बंद असल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. ऑटोरिक्षाही बंद असल्यामुळे त्वरित आपली बस सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक