शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक कोरोनाग्रस्त निघाल्यास दुकान २८ दिवस बंद ठेवू नये, अशी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 10:18 IST

एखादा दुकानदार कोरोनाग्रस्त निघाल्यास तीन दिवसात दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गांधीबाग होलसेल क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अजय मदान यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

ठळक मुद्देतीन दिवसात दुकान सुरू करावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखादा दुकानदार कोरोनाग्रस्त निघाल्यास त्याचे दुकान २८ दिवस बंद ठेवू नये. औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच दुकानाचा परिसर तीन दिवसात सॅनिटाईज्ड करून दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गांधीबाग होलसेल क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अजय मदान यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. अशा कठोर कारवाईमुळे दुकानदाराना आर्थिक नुकसान सोसावे लागते, याकडे मदान यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

मदान म्हणाले, गांधीबाग परिसरात पाटणी भवन येथील एक दुकान अनेक दिवसांपासून बंद आहे. संपूर्ण इमारत सील केली आहे. त्यामुळे इमारतीतील इतर दुकानदारांचाही व्यवसाय बंद आहे. कोरोनाग्रस्त दुकानदार बरा होऊन घरी परतला आहे. पण त्याचे दुकान बंद आहे. दुकान सुरू करण्यास परवानगी मिळविण्यासाठी मनपाकडे परवानगी मागितली आहे. पण त्याचे दुकान सुरू झालेले नाही. आधीच आॅड-इव्हनने व्यवसाय डबघाईस आला आहे. अशा स्थितीत अनेक दिवस दुकान बंद राहिल्यास व्यावसायिकाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. औद्योगिक क्षेत्रात कामगार कोरोनाग्रस्त मिळाल्यास परिसर तीन दिवसात सॅनिटाईज्ड करून काम सुरू होते. असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. असे असताना दुकानदारांसाठी दुसरा नियम नको. व्यावसायिकाचे दुकानही तीन दिवसात सुरू व्हायला पाहिजे.

मदान म्हणाले, अन्य शहरांमध्ये कुणी व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळून आल्यास त्याचा फ्लॅट काही दिवसांसाठीच सील करण्यात येतो आणि सोसायटीतील रहिवाशांचे जीवनचक्र नियमित सुरू असते. पण नागपुरात याउलट सुरू आहे. संपूर्ण परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात येत असल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कामगारांचा पगार, बँकाच्या कर्जाचे व्याज, विजेचे बिल आणि इतर खर्चामुळे व्यावसायिक अडचणीत आहे. त्यातच मनपाच्या नियमामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. एखादा दुकानदार कोरोनाग्रस्त झाल्यास त्याच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. अशा स्थितीत त्याला समाजातून विरोध होतो. ही बाब बदलण्याची गरज असल्याचे मदान यांनी स्पष्ट केले. गणेशपेठ भागात एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये एक व्यक्ती कोरोनाग्रस्त निघाल्यानंतर मनपाने फ्लॅटपासून ५० मीटर दूर असलेल्या ५५ दुकानांना सील लावले होते. ही दुकाने तब्बल एक महिन्यानंतर सुरू झाली होती, हे विशेष.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस