शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

बांगलादेशात वाढली नागपुरी संत्र्याची मागणी:मिलिंद लदानिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:35 IST

महाराष्ट्रात १ लाख ८७ हजार हेक्टरवर लिंबुवर्गीय फळे असून त्यापासून १५ लाख टन उत्पादन मिळत आहे. यातच बांगलादेशातून नागपुरी संत्र्याला मागणी वाढली असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा संत्रा उत्पादन करण्याचे आवाहन राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ.मिलिंद लदानिया यांनी केले.

ठळक मुद्देसंत्रा प्रक्रिया, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि निर्यात संधी यावर कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात १ लाख ८७ हजार हेक्टरवर लिंबुवर्गीय फळे असून त्यापासून १५ लाख टन उत्पादन मिळत आहे. यातच बांगलादेशातून नागपुरी संत्र्याला मागणी वाढली असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा संत्रा उत्पादन करण्याचे आवाहन राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ.मिलिंद लदानिया यांनी केले.‘संत्रा प्रक्रिया, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि निर्यात संधी’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत राष्ट्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्राचे संचालक डॉ. मिलिंद लदानिया, दिनेश कुमार, डॉ. आय. पी. सिंग, डॉ. अंबादास हुच्चे, डॉ. आर. के. सोनकर, डॉ. परमेश्वर शिरगुरे यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. लदानिया म्हणाले, संत्रा उत्पादनासोबत प्रक्रिया उद्योगाला चांगले दिवस आले आहेत. उत्पादन होणाऱ्या संत्र्यांपैकी ८० टक्के संत्री खाण्यासाठी तर २० टक्के संत्र्यावर प्रक्रिया करण्यात येते. त्यापासून ज्युस, जेली, जॅम, कँडी, फ्रुट बार, आईसक्रीम तयार करण्यात येतात. डॉ. दिनेश कुमार म्हणाले, वर्गीकरण, स्वच्छता, मेणाचा लेप, ग्रेडिंग, पॅकेजिंग केलेल्या संत्र्याला बांगलादेशात मागणी आहे. त्यासाठी संत्र्याच्या ढीगावर बसू नये, त्यामुळे फळाचे नुकसान होते. संत्रा ठेवण्यासाठी क्रेटचा वापर करावा, लाकडाऐवजी कागदात पॅकिंग करावे. लिंबु, संत्रा एकत्र स्टोरेज करू नका. संत्र्याची इतर देशात निर्यात करण्यासाठी लायसन्स काढण्याची गरज असून एक्स्पोर्ट करणाऱ्यांच्या माध्यमातून पाठविता येत असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. आय. पी. सिंग म्हणाले, लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्राने नऊ जाती विकसित केल्या आहेत. देशात १ कोटी ५० लाख रोपट्यांची गरज असून केंद्रात रोगमुक्त रोपटे तयार करण्यात येतात. डॉ. अंबादास हुच्चे म्हणाले, पाणी आणि खत व्यवस्थापन चांगले असल्यास १२०० ते १५०० फळे एका झाडाला मिळतात. जून महिन्यात पोटॅशियम नायट्रेट १५ दिवसाच्या अंतराने तर आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यात कोरमिक्वट क्लोराईट २००० पीपीएमच्या दोन फवारण्या आवश्यक आहेत. डॉ. आर. के. सोनकर यांनी संत्र्यांच्या झाडात टमाटर, वांगे, भेंडी, लवकीचे आंतर पीक कसे घ्यावे यावर मार्गदर्शन केले. डॉ. परमेश्वर शिरगुरे यांनी पाणी आणि खत नियोजन यावर संत्रा उत्पादकांना मार्गदर्शन केले. पाण्याच्या योग्य नियोजनाशिवाय एक्स्पोर्ट क्वालिटीची संत्री तयार होत नसल्याची माहिती त्यांनी दिली.

 

टॅग्स :agricultureशेतीOrange Festivalआॅरेंज फेस्टिव्हल