शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

अधिकाऱ्यांच्या दफ्तरशाहीमुळे वाढीव दराने मिळाली डिमांड !

By admin | Updated: June 1, 2015 02:47 IST

नासुप्रकडे भूखंडांच्या नियमितीकरणासाठी अर्ज केला. सुरुवातीला इमारत अभियंत्याने प्रचलित दर २२.३० रुपये प्रती चौरस फुटानुसार डिमांड नोट देण्यास मंजुरी दिली.

नासुप्रचा अजब कारभार : भूखंडाचे नियमितीकरण रखडलेकमलेश वानखेडे नागपूरनासुप्रकडे भूखंडांच्या नियमितीकरणासाठी अर्ज केला. सुरुवातीला इमारत अभियंत्याने प्रचलित दर २२.३० रुपये प्रती चौरस फुटानुसार डिमांड नोट देण्यास मंजुरी दिली. नंतर मात्र, वाढीव दरांचा ठराव झाल्याचे कारण देत वाढीव दराने डिमांड दिली. आता गुंता सोडवावा व जुन्या दराने डिमांड मिळावी या मागणीसाठी उपरे ले-आऊट येथील रहिवासी मारोतराव धांडे नासुप्रच्या चकरा मारत आहेत. मात्र, त्यांना न्याय मिळेनासा झाला आहे. आपल्या या प्रश्नाची आता मुख्यमंत्रीच दखल घेऊन न्याय देतील, अशी त्यांना आशा आहे.मौजा परसोडी खसरा क्रमांक १७/१-२ मधील भूखंड क्रमांक २२ (१२५० चौरस फूट) हा मारोतराव धांडे यांच्या दोन मुलांच्या नावाने आहे. संबंधित भूखंड कोणत्याही आरक्षणात नाही. २००५ पासून ते घर बांधून तेथे वास्तव्यास आहेत. ले-आऊट धारकांनी १ डिसेंबर १९९९ रोजी ताबापत्रही दिले असून २० मे २००४ रोजी रजिस्ट्री झाली आहे. १८ आॅक्टोबर २००७ रोजी धांडे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावाने नासुप्रमध्ये भूखंड नियमितीकरणासाठी अर्ज केला होता. त्यावेळी ले-आऊट धारकांनीही नियमितीकरणासाठी अर्ज केला होता. त्यामुळे नासुप्रने कोणताही एक अर्ज निरस्त करण्यासाठी १०० रुपयांच्या कोर्ट फी स्टॅम्प पेपरवर नाहरकत प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले होते. त्यावेळी धांडे यांनी पूर्व विभागाचे तत्कालिन अभियंता बाबडे यांच्याकडे नाहरकत प्रमाणपत्र सादर केले होते. संबंधित स्टॅम्प पेपर भूखंड क्रमांक २२ च्या फाईलमध्ये लावून ठेवण्यात आला होता. दिरंगाईचा फटका नागरिकांना का ?संबंधित प्रकरणात नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली. धांडे यांनी सादर केलेला स्टॅम्प पेपर १० एप्रिल २०१३ पासून ते जुलै २०१४ पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना कसा दिसला नाही, जानेवारी २०१४ पासून पुढील तब्बल सहा महिने या प्रकरणाची समरी का तयार करण्यात आली नाही, दिरंगाई करण्यामागे नेमका काय हेतू होता, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अधिकाऱ्यांनी वेळेत पाठपुरावा केला नसता तर धांडे यांना भूखंड नियमित करण्यासाठी वाढीव दराच्या ठरावाचे बंधन आले नसते. या एकूणच दिरंगाईची नासुप्र सभापतींची चौकशी करण्याची गरज आहे. नासुप्रकडून न्याय न मिळाल्याने आता धांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित तक्रार अर्ज दाखल केला असून मुख्यमंत्रीच आपल्याला न्याय देतील व दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करतील, अशी त्यांना आशा आहे.