शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

विद्यापीठातील अनियमिततेसाठी कुलगुरू चाैधरींवर कारवाईची मागणी

By निशांत वानखेडे | Updated: July 5, 2023 21:42 IST

मनमोहन वाजपेयी यांनीही कुलगुरूंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यापीठातील काही विकास कामे निविदा न करता केली असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न होत असल्याचा अहवाल अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांनी दिला आहे. त्यामुळे आता कुलगुरू डॉ. चौधरींवर कठोर कारवाई करा, अशी तक्रार आमदार प्रवीण दटके व भाजप पदाधिकारी यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना केली आहे. दुसरीकडे अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन वाजपेयी यांनीही कुलगुरूंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर समितीने डॉ. चौधरी यांना दोषी ठरवले होते. परीक्षेच्या कामासाठी एमकेसीएलची निवड करण्यावरही आक्षेप घेण्यात आला आहे. या कंपनीला २०२२ मध्ये ब्लॅक लिस्टेड करण्यात आले असताना कुलगुरुंनी निविदा प्रक्रिया एमकेसीएलला सहाय्यभूत करून परीक्षेची जबाबदारी दिल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले. तसेच विनानिविदा बांधकांचे कंत्राट देण्यात आल्याचे निष्कर्ष समितीने सादर केलेल्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. मात्र यानंतरही शासनाने कुलगुरूंवर कुठलीही कारवाई केलेली नाही.

विद्यापीठाच्यावतीने विविध विकास कामे करण्यात आली. हे करताना कंत्राट न काढता एकाच व्यक्तिला कामे देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. आता यावरही समितीने अहवालामध्ये ठपका ठेवण्यात आला आहे. एकाच कंत्राटदारास दुसऱ्या इमारतीमधील काम विनानिविदा देण्यात आलेले आहेत. सदर वित्तीय अनियमिततेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अधिकची चौकशी होऊन संबंधीताविरुद्ध जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता यांनी आपला अहवाल सादर केला असून यानुसार सदरहू कामे निविदा कार्यवाही न करता केली असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न होत असल्याचा शेरा दिला आहे. त्यामुळे अशा कुलगुरूंवर विद्यापीठाने कठोर कारवाई करावी अशी मागणी दटके यांनी पत्रात केली आहे. या पत्रावर माजी महापाैर संदीप जाेशींसह भाजपा पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे नेमण्यात आलेल्या समितीने व त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांनी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूंनी निविदा न काढता लाखो रुपयाचे कंत्राट दिले हे स्पष्ट झाले. विद्यापीठाच्या अनेक कामात अनियमितता झाल्याचे दिसत असून यामुळे विद्यापीठाची बदनामी झाली आहे. यासाठी कुलगुरूंवर कारवाई करण्यात यावी व अनेक प्रकरणात विद्यापीठाचे आर्थिक नुकसान झाले ते कुलगुरूंकडून वसूल करावे.

-ॲड. मनमोहन वाजपेयी, अधिसभा सदस्य.