शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

समाजातील गरजूंपर्यंत अन्न पोहचवा : सरकार्यवाहांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 20:18 IST

‘कोरोना’मुळे नागपूरसह देशातील मोठी शहरे ‘लॉकडाऊन’ झाली आहेत. यामुळे अनेक ठिकाणी काम बंद असून याचा फटका कष्टकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. अशा गरजूंच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समोर यावे व त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचावे, असे आवाहन सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले आहे.

ठळक मुद्दे‘कोरोना’विरोधातील लढ्यात संघाचा सेवाभाव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे नागपूरसह देशातील मोठी शहरे ‘लॉकडाऊन’ झाली आहेत. यामुळे अनेक ठिकाणी काम बंद असून याचा फटका कष्टकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. अशा गरजूंच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समोर यावे व त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचावे, असे आवाहन सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले आहे.‘टिष्ट्वटर’च्या माध्यमातून त्यांनी सोमवारी सकाळी हे आवाहन केले. समाजात स्वच्छता, आरोग्य जागृतीबाबत स्वयंसेवकांनी लहान लहान गटांमध्ये संवाद साधावा, तसेच गरजूंपर्यंत भोजन पोहचविण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षेनुरूप सहकार्य करावे शिवाय शासनाच्या सर्व निर्णयांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन भय्याजी जोशी यांनी केले आहे.संघाच्या नियोजनाला सुरुवातयासंदर्भात विदर्भ प्रांतातील एका पदाधिकाऱ्याशी संपर्क केला असता गरजूंपर्यंत मदत पोहचविण्यासाठी स्वयंसेवकांचे नियोजन सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील गरजूंपर्यंत भागनिहाय मदत पोहचविली जाणार आहे. शासनाच्या नियमांचे पालन करत मोजकेच स्वयंसेवक प्रत्यक्ष जाऊन मदत पोहचवतील, असे त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून आरोग्याबाबत जागृतीदेखील नियमितपणे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रेल्वेस्थानकावर अडकलेल्यांना मदत 

रामेश्वरम यात्रेला निघालेले उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील ज्येष्ठ नागरिक रेल्वेस्थानकावरच अडकले. त्यांना रेल्वेत जागा मिळाली नाही. अनेक तासांपासून ते लोक अन्नाविनाच होते. भूक व तहानेने व्याकूळ झालेल्या या वृद्धांनी स्थानकाबाहेर अनेकांना मदतीचा आर्जव केला. दुपारी संघाच्या स्वयंसेवकांना याची माहिती मिळताच त्यांच्यापर्यंत अन्नपाण्यासह आवश्यक साहित्य पोहचविण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समिती नागपूरचे अभिषेक मिश्रा व रितेश पांडे यांनी त्यांच्या चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली. याशिवाय नवीन मिश्रा, अनुप पाटील, रितेश पिल्लेवार यांसारख्या युवकांनी ट्रॅव्हल्स एजन्सीशी बोलून ३ गाड्यांची व्यवस्था करत त्यांना मिर्झापूरकडे रवाना केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ