शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या तळागाळापर्यंत नवीन शैक्षणिक धोरण पोहोचवा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 07:00 IST

Nagpur News देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी आग्रह करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आता याच्या अंमलबजावणीसाठी देखील पुढाकार घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे९५ टक्के दैनिक शाखांना सुरुवात

योगेश पांडे

नागपूर : देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी आग्रह करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आता याच्या अंमलबजावणीसाठी देखील पुढाकार घेण्यात येणार आहे. तेलंगणात सुरू असलेल्या राष्ट्रीय समन्वय बैठकीदरम्यान शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघ परिवारातील संघटनांकडून आढावा घेण्यात आला. शैक्षणिक धोरण देशात तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना देण्यात आली.

दरवर्षी सप्टेंबर व जानेवारी महिन्यात संघाची समन्वय बैठक होत असते. या बैठकीदरम्यान कुठलाही धोरणात्मक निर्णय होत नसतो. केवळ विविध कार्यांचा आढावा व त्यादृष्टीने सूचना देण्यात येतात. यंदाच्या बैठकीला भाजप, अभाविप, शिक्षण मंडळ, विहिंप यांच्यासह ३६ संघटनांचे दोनशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात शैक्षणिक धोरण, सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, परिवार प्रबोधन या मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात भाजपच्या कार्याचा देखील आढावा घेण्यात आला. विशेषत: उत्तर प्रदेश व इतर राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेथील संघटन व नियोजनाबाबत भाजपकडून माहिती घेण्यात आली.

शाखांमधील ६० टक्के स्वयंसेवक विद्यार्थी

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर संघाच्या शाखा बंद करण्यात आल्या होत्या; परंतु दुसऱ्या लाटेनंतर शाखा सुरू झाल्या. ऑक्टोबर २०१९ च्या तुलनेत २०२१ च्या अखेरीस ९३ टक्के ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली व ९५ टक्के दैनिक शाखादेखील सुरू झाल्या. सोबतच देशभरातील ९८ टक्के साप्ताहिक मिलन व ९७ टक्के मासिक शाखादेखील सुरू झाल्या. सद्य:स्थितीत देशात ५५ हजार नियमित शाखा सुरू असून त्यातील ६० टक्के स्वयंसेवक हे विद्यार्थी किंवा तरुण आहेत, अशी माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी दिली.

विस्मृतीत गेलेल्या २५० स्वातंत्र्यसेनानींसाठी जागर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षासाठी संघातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्य युद्धात सहभागी झालेल्या व विस्मृतीत गेलेल्या २५० स्वातंत्र्यसेनानींचा लढा समाजासमोर आणण्यात येणार आहे. शिवाय संस्कार भारतीच्या माध्यमातून ७५ नाट्यकलाकृतींतून स्वातंत्र्याचा इतिहास व संघर्ष नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येईल.

पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी गंभीरच

सर्वोच्च पदाच्या व्यक्तीच्या सुरक्षेत झालेली त्रुटी ही गंभीर बाब आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहेच. त्यातून तथ्य समोर येईल व दोषींवर आवश्यक ती कारवाई सरकारकडून केली जाईल हा विश्वास आहे, असे मत डॉ.मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ