शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या निकालाचे नागपुरातही हादरे

By admin | Updated: February 11, 2015 02:18 IST

दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजप- काँग्रेसला दिलेल्या धक्क्याचे हादरे नागपुरातही बसले आहेत. जनता व कार्यकर्त्यांना गृहीत धरता येणार नाही.

नागपूर : दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजप- काँग्रेसला दिलेल्या धक्क्याचे हादरे नागपुरातही बसले आहेत. जनता व कार्यकर्त्यांना गृहीत धरता येणार नाही. पक्षाची ताकद असलेल्या कार्यकर्त्यांना अधिक सन्मान देऊ, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी तर जनतेचे प्रश्न अधिक तीव्रतेने लावून धरू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे म्हणाले, दिल्लीतील पराभव भाजपने स्वीकारला आहे. केंद्रीय नेते या पराभवावर चिंतन करून कारणे शोधतील. पण या निकालापूसन आम्हीही स्थानिक पातळीवर धडा घेण्याची गरज आहे. कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या भरवशावर उभा राहतो. येत्या काळात कार्यकर्त्यांना अधिकाधिक न्याय देण्याची, सन्मान देण्याची भूमिका पक्षाकडून घेतली जाईल. सत्तेत वावरताना नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. एका राज्यात चमत्कार झाला म्हणजे सर्वत्र होईल, असे काही नाही. पण गाफिल राहूनही चालणार नाही. आम्ही वेळीच सावध भूमिका घेऊन कार्यकर्ते व जनतेपर्यंत पोहचून त्यांचा भावना जाणून घेऊ, असेही खोपडे यांनी सांगितले. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्ता बळकावली होती. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. त्याचेच बक्षीस त्यांना मिळाले. काँग्रेसचाही दारुण पराभव झाला. या निकालापासून स्थानिक पातळीवर काँग्रेस धडा घेईल. काँग्रेस पक्ष सामान्य जनतेसाठी लढणारा पक्ष आहे. केजरीवाल यांनीही तेच केले. यापुढे काँग्रेस अधिक तीव्रतेने सामान्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन करेल व जनतेचा विश्वास पुन्हा संपादित करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. बरिएमंच्या नेत्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे म्हणाल्या, दिल्लीतील निवडणुकीत जनतेने आपला दिलेला कौल म्हणजे लोकशाहीचा विजय होय. आपचे नेते अभिनंदनास पात्र आहेत. हवेत असणाऱ्या नेत्यांना हा एक धडा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. बसपाचे प्रदेश सचिव व मिडिया प्रभारी उत्तम शेवडे म्हणाले, १४ महिन्यात मोदींचा करिष्मा उतरला. दिशाभूल करण्याची प्रवृत्ती जनतेच्या लक्षात आली. जनतेने जोरात धक्का दिला. येत्या काळात स्थानिक राजकारणावरही याचे परिणाम दिसून येतील, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)काँग्रेसकडून अभिनंदनाची पत्रकेदिल्लीत ‘आप’ने काँग्रेसचाही सफाया केला असताना नागपुरात मात्र काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रके काढून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेस सेवादलाचे नागपूर मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे यांनी केंद्र सरकारला धक्का दिल्याबद्दल केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे तर, शहर काँग्रेसचे सचिव जॉन थॉमस यांनी मोदी सरकारच्या विरोधात जनादेश दिल्याबद्दल दिल्लीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.