शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

दिल्लीच्या निकालाचे नागपुरातही हादरे

By admin | Updated: February 11, 2015 02:18 IST

दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजप- काँग्रेसला दिलेल्या धक्क्याचे हादरे नागपुरातही बसले आहेत. जनता व कार्यकर्त्यांना गृहीत धरता येणार नाही.

नागपूर : दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजप- काँग्रेसला दिलेल्या धक्क्याचे हादरे नागपुरातही बसले आहेत. जनता व कार्यकर्त्यांना गृहीत धरता येणार नाही. पक्षाची ताकद असलेल्या कार्यकर्त्यांना अधिक सन्मान देऊ, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी तर जनतेचे प्रश्न अधिक तीव्रतेने लावून धरू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे म्हणाले, दिल्लीतील पराभव भाजपने स्वीकारला आहे. केंद्रीय नेते या पराभवावर चिंतन करून कारणे शोधतील. पण या निकालापूसन आम्हीही स्थानिक पातळीवर धडा घेण्याची गरज आहे. कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या भरवशावर उभा राहतो. येत्या काळात कार्यकर्त्यांना अधिकाधिक न्याय देण्याची, सन्मान देण्याची भूमिका पक्षाकडून घेतली जाईल. सत्तेत वावरताना नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. एका राज्यात चमत्कार झाला म्हणजे सर्वत्र होईल, असे काही नाही. पण गाफिल राहूनही चालणार नाही. आम्ही वेळीच सावध भूमिका घेऊन कार्यकर्ते व जनतेपर्यंत पोहचून त्यांचा भावना जाणून घेऊ, असेही खोपडे यांनी सांगितले. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्ता बळकावली होती. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. त्याचेच बक्षीस त्यांना मिळाले. काँग्रेसचाही दारुण पराभव झाला. या निकालापासून स्थानिक पातळीवर काँग्रेस धडा घेईल. काँग्रेस पक्ष सामान्य जनतेसाठी लढणारा पक्ष आहे. केजरीवाल यांनीही तेच केले. यापुढे काँग्रेस अधिक तीव्रतेने सामान्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन करेल व जनतेचा विश्वास पुन्हा संपादित करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. बरिएमंच्या नेत्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे म्हणाल्या, दिल्लीतील निवडणुकीत जनतेने आपला दिलेला कौल म्हणजे लोकशाहीचा विजय होय. आपचे नेते अभिनंदनास पात्र आहेत. हवेत असणाऱ्या नेत्यांना हा एक धडा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. बसपाचे प्रदेश सचिव व मिडिया प्रभारी उत्तम शेवडे म्हणाले, १४ महिन्यात मोदींचा करिष्मा उतरला. दिशाभूल करण्याची प्रवृत्ती जनतेच्या लक्षात आली. जनतेने जोरात धक्का दिला. येत्या काळात स्थानिक राजकारणावरही याचे परिणाम दिसून येतील, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)काँग्रेसकडून अभिनंदनाची पत्रकेदिल्लीत ‘आप’ने काँग्रेसचाही सफाया केला असताना नागपुरात मात्र काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रके काढून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेस सेवादलाचे नागपूर मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे यांनी केंद्र सरकारला धक्का दिल्याबद्दल केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे तर, शहर काँग्रेसचे सचिव जॉन थॉमस यांनी मोदी सरकारच्या विरोधात जनादेश दिल्याबद्दल दिल्लीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.