शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

मजुरीला विलंब - २७ लाखांचा फटका

By admin | Updated: July 16, 2014 01:14 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर (मनरेगा)काम करणाऱ्या मजुरांना वेळेत मजुरी देता न आल्याने शासनाच्या तिजोरीवर सरासरी २७ लाखांचा अतिरिक्त भार पडला.

मनरेगा: वेळेत मजुरी देण्याचे बंधननागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर (मनरेगा)काम करणाऱ्या मजुरांना वेळेत मजुरी देता न आल्याने शासनाच्या तिजोरीवर सरासरी २७ लाखांचा अतिरिक्त भार पडला.मनरेगाचे आयुक्त एम. संकरनारायणन यांनी ही माहिती दिली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांना विलंबाने मजुरी मिळत होती. त्यामुळे मजूर या कामावर जाण्यास टाळत होते. ही बाब टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अनेक बदल करण्यात आले. तसेच मजुरी देण्यास विलंब झाल्यास मजुरीवर व्याज देण्याची तरतूद असणारा नियम शासनाने केला. या उपरही गत वर्षात (२०१३-१४) मजुरांना मजुरी देताना विलंब झाल्याने राज्यात सरासरी २७ लाख ५४ हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागले. विशिष्ट काळापर्यंत विलंब झाल्यास त्याची जबाबदारी ही शासनाची असते. पण त्यानंतर प्रत्येक पातळीवर याबाबत जबाबदारी ठरवून देण्यात आली असून त्या त्या टप्प्यावर जो अधिकारी किंवा कर्मचारी दोषी असेल त्याच्याकडून विलंबाची रक्कम वसूल केली जाते, असे संकरनारायणन यांनी स्पष्ट केले.मनरेगाच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी तीन पातळीवर त्याचे अंकेक्षण करण्यात येते. त्यात समाजिक अंकेक्षणाचाही समावेश असतो. २०१२-१३ या वर्षात करण्यात आलेल्या अंकेक्षणातून राज्यभरातील एकूण कामांपैकी ७० ते ८० टक्के कामे समाधानकारक असल्याचे दिसून आले. कामात पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी ‘ई-मस्टर’, ‘ई-निधी व्यवस्थापन’ आणि ‘गुणवत्ता निरीक्षकांच्या मार्फत कामांची तपासणी’ आदी उपक्रम राबविण्यात आल्याने गैरव्यवहाराला आळा बसला.राज्यात २०१३-१४ या आर्थिक वर्षात ५१७.१४ लाख मनुष्यदिन कामाची निर्मिती झाली असून त्यावर १२७८९३.६६ लाख रुपये खर्च करण्यात आले. २०१४-१५ या आर्थिक वर्षात आतापर्यंत २१६.५३ लाख मनुष्यदिन कामाची निर्मिती करण्यात आली असून त्यावर ४४४८२ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. मागील आठवड्यात राज्यात २७२६८ कामांवर २८२०४२ मजूर उपस्थित होते. कामाची मागणी केल्यास काम देण्याची तयारी आहे, असे संकरनारायणन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)