शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

कॅगमधील कारवाईत विलंब झाल्यास खानापूर्तीला वाव : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 22:41 IST

कॅगने ६५ हजार कोटी रुपयांच्या गैरप्रकाराचा ठपका ठेवला आहे. सरकार कुणाचेही असो. अशा प्रकारणात कठोर कारवाई करणेच आवश्यक आहे. कारवाईत विलंब झाला तर खानापूर्ती करून बचाव करण्याला वाव असतो, असे मत माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देतत्काळ कारवाई न झाल्यास जनतेत चुकीचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॅगने ६५ हजार कोटी रुपयांच्या गैरप्रकाराचा ठपका ठेवला आहे. सरकार कुणाचेही असो. अशा प्रकारणात कठोर कारवाई करणेच आवश्यक आहे. कारवाईत विलंब झाला तर खानापूर्ती करून बचाव करण्याला वाव असतो, असे मत माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, कॅगने नगरविकास खात्यातील कामाशी संबंधित कामांमध्ये अनियमितता असल्याचा ठपका ठेवला आहे. ६५ हजार कोटी रुपयांची ही रक्कम आहे. कामांच्या पूर्ततेचे प्रमाणपत्र न देण्यामुळे गैरव्यवहार झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अशा प्रकरणात ऑडिटमध्ये चौकशीची प्रक्रिया आहे. तपास यंत्रणांकडून नोटिसा जातात. खरे तर गैरव्यवहाराला निमंत्रण देण्याची प्रक्रिया आहे. त्यात अवधी मिळाल्यास कागदपत्रे हुक करणे, जमाखर्चाची खोटी बिले सादर करणे, खोटा खर्च सादर करणे याची शक्यता असते. त्यामुळे तत्काळ कारवाई करण्याची गरज असते. असे झाले नाही तर प्रशासन किंवा विभागाची आपल्या यंत्रणेवर पकड नसल्याचा चुकीचा संदेश जनतेत जातो. त्यातूनच भ्रष्टाचार होतो, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.कॅगने ६५ हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण झाल्याची प्रमाणपत्रे दिली नसल्याने आक्षेप घेतला आहे. त्याच कामासाठी खर्च केला की नाही, हे तपासण्याची ती प्रक्रिया असते. रक्कम मोठी असेल तर गैरव्यवहाराची शक्यता असते. कालांतराने यंत्रणेला जनतेला विसर पडतो. कागदांची खानापूर्ती होईलही, माहितीची जुळवाजुळव होईल, अधिकारी यातून बाहेर जातील; मात्र जनतेच्या हिताची कामे यातून खरेच झाली की नाही, हे सांगता येणार नाही.गुजरातमधील दंगली अधिकारातील लोकांकडूनचगुजरातच्या दंगलींना विसरून चालणार नाही. ते दगड मारतील तर विट मारू, ही आठवण यावेळी भाजपाचे मंत्री करीत असतील तर ही एक धमकीच आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, गुजरातमधील दंगे अधिकारात बसणाऱ्या लोकांकडूनच करण्यात आले होते, ही बाब आता लपून राहिलेली नाही. कर्नाटकातही आता दंगली वाढल्या आहेत. तिथे अधिकारात बसलेली मंडळी गुजतारसारखीच विशिष्ट धर्माच्या विरोधात बसलेली मंडळी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMediaमाध्यमे