शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

नागपुरात रुग्णांप्रति आनंदाचे ‘समर्पण’; दिवाळीनिमित्त दिली कपड्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 10:49 IST

दिवाळीच्या दिवसात रुग्णांना नव्या कोऱ्या कपड्यांची भेट देत त्यांच्या आनंदात अनोखी दिवाळी साजरी करीत आहे.

ठळक मुद्देसमर्पण संस्थेचा अभिनव उपक्रम

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुखणे सोसात असताना नाउमेद होत असलेले मन, तोच तो औषधांचा दर्प, उपचार करण्याची परिस्थिती नसताना संघर्ष करीत असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक. दिवाळीच्या झगमगटापासून दूर असलेल्या या रुग्णांचा चेहऱ्यावरही या सणाचा आनंद दिसावा, यासाठी समर्पण संस्था गेल्या १५ वर्षांपासून विधायक कार्य करीत आहे. दिवाळीच्या दिवसात रुग्णांना नव्या कोऱ्या कपड्यांची भेट देत त्यांच्या आनंदात अनोखी दिवाळी साजरी करीत आहे.अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देणाऱ्या या सणाची खासियत काही औरच. दारासमोरची रांगोळी, आकाशकंदील, फराळ आणि फटाक्यांसह दिवाळीच्या चार दिवसांमध्ये सर्वत्र उत्साह संचारला असतो, मात्र शासकीय रुग्णालयातील चित्र वेगळेच असते. दिवाळीचा प्रारंभ म्हणजे धनत्रोयदशीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) सुमारे ८०० वर रुग्णांना नव्या कपड्यांची भेट दिली जाते.ही परंपरा गेल्या आठ वर्षांपासून जपली जात आहे. सोमवारी साड्या, पातळ, शर्ट, धोतर, लहान मुलांचे ड्रेस अशा कपड्यांची अनोखी भेट स्वीकारताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. ‘समर्पण’ आणि रुग्णांमध्ये एक हळूवार भावनिक नाते जुळले होते.हनुमानप्रसाद राठी, ओमप्रकाश खंडेलवाल, अनिल किनाडीवाला, वाळकेजी यांच्यासह आणखी काहीजण ‘समर्पण’मध्ये आहेत. यातील प्रत्येक जण आपल्या व्यवसायत मिळालेल्या नफ्यातील काही भाग या स्तुत्य उपक्रमावर खर्च करतात. सोमवारी या कपड्यांचे वाटप करताना स्वत: मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश गावंडे, नगरसेविका काडगाये, डॉ. बागडे यांच्यासह मेडिकलचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

रुग्णांना रोज दिला जातो फलाहार‘समर्पण’चा दिवस मेडिकलमध्ये सकाळी ७ वाजतापासून सुरू होतो. तब्बल ४० वॉर्डातील रुग्णांना फळांची न्याहरी देतात. ही सेवा देत असताना बाहेरगावातील रुग्णांच्या नातेवाईकांना दुपारच्या जेवणाच्या कूपन्सही वितरित करतात. रोज साधारण ३५० जणांची भूक भागवितात. राजाबाक्षातील ‘समर्पण’ वास्तूत वर्षाचे ३६५ दिवस हे अन्नछत्र सुरू असते.

टॅग्स :Diwaliदिवाळी