शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलच्या वापरात घट - ध्वनी प्रदूषणही झाले कमी

By admin | Updated: September 11, 2014 01:08 IST

मध्य रेल्वेचा नागपूर विभाग विद्युतीकरणाचे २५ वर्षे पूर्ण करून रजत जयंती वर्ष साजरे करीत आहे. यामुळे विभागातील डिझेलचा वापर कमी होऊन ध्वनी प्रदूषण आणि कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे.

विद्युतीकरणाचे २५ वर्षे पूर्ण : नागपूर विभाग साजरे करतेय रजत जयंती वर्षनागपूर : मध्य रेल्वेचा नागपूर विभाग विद्युतीकरणाचे २५ वर्षे पूर्ण करून रजत जयंती वर्ष साजरे करीत आहे. यामुळे विभागातील डिझेलचा वापर कमी होऊन ध्वनी प्रदूषण आणि कार्यक्षमतेतही वाढ झाली आहे.विभागात १९८३ मध्ये विद्युतीकरणाला सुरुवात झाली. विभागात पहाडी भागात हेलिकॉप्टरच्या साह्याने विद्युत खांब बसविण्यात आले. विद्युतीकरणाचे कठीण काम पूर्ण करताना विभागात नागपूर-वर्धा-बल्लारशा भागात ११ सप्टेंबर १९८९ ला रेल्वेगाडी क्रमांक २६१५ जीटी एक्स्प्रेस ही पहिली विद्युतीकरण झालेली गाडी धावली. सप्टेंबर १९८९ मध्ये नागपूर-वर्धा-बल्लारशा या ४४० किलोमीटरच्या खंडात विद्युत ट्रॅक्शन सुरू झाल्यानंतर वर्धा-बडनेरा २३१ किलोमीटरच्या खंडात १९९१ मध्ये नागपूर ते इटारसी ही ५७३ किलोमीटरच्या खंडात विद्युत ट्रॅक्शन १९९१ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर या खंडाचे दुहेरीकरण, ब्रॉंच लाईन, साईडिंगमध्ये विद्युतीकरण झाले. सप्टेंबर २०१४ पर्यंत १७४१ रेल्वे किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण होऊन तेथे विद्युत इंजिन धावत आहेत. विद्युतीकरणाच्या कामासाठी १४ ट्रॅक्शन सब स्टेशन कार्यरत आहेत. विद्युतीकरणाचे नेटवर्क नागपुरातील सुपरवायझरी कंट्रोल अँड डाटा अ‍ॅक्विझिशन तंत्रज्ञानाने करण्यात येते. विद्युत इंजिनच्या देखभालीसाठी २२ सप्टेंबर १९९० रोजी अजनीत विद्युत लोकोशेडची स्थापना करण्यात आली. या विद्युत लोकोशेडमधून पहिले इंजिन २२ आॅक्टोबर १९९० ला सुरू झाले. अजनी विद्युत लोकोशेडमध्ये १९८९ मध्ये ५ विद्युत लोको होते. आता ही संख्या २०१४ मध्ये २०० झाली आहे. अजनीच्या विद्युत लोकोशेडमध्ये डब्लुएजी ५ (३८५०), डब्लुएजी ७ (५००० एचपी), डब्लुएएम ४ (३६४० एचपी), डब्लुएपी १ (३७६०), डब्लुएपी ४ (५००० एचपी), एसी/डीसी डब्लुएसीएम ३ (५०००/४७०० एचपी) या इंजिनचा समावेश आहे. यासोबतच ३ फेज विद्युत इंजिनमध्ये डब्लुएपी ५ (५४४० एचपी), डब्लुएपी ७ (६३५० एचपी), डब्लुएजी ९ (६००० एचपी) या विद्युत इंजिनची देखभालही करण्यात येते. विभागात विद्युतीकरणानंतर रेल्वेची वजन क्षमता १७ ते २४ डब्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. याशिवाय रेल्वेगाड्यांचा वेग वाढवून वेळेची बचतही होत आहे. विद्युतीकरणामुळे मालगाड्यांची क्षमताही २३०० टन ते ५३०० टनपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामुळे ५१ टक्के डिझेलची बचत झाली असून विभागाला डिझेलच्या तुलनेत अतिशय कमी म्हणजे ४२० कोटींचे वीज बिल भरावे लागले आहे. (प्रतिनिधी)