शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; भाजपची सरकारला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2022 21:06 IST

Nagpur News राज्य सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी नागपूर जिल्हा भाजपाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना ५० हजाराची मदत करा

नागपूर : जिल्ह्यात गत आठ दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम बुडाल्यात जमा आहे. त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी नागपूर जिल्हा भाजपाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंगळवारी याबाबतचे निवेदन ना. फडणवीस यांना सादर केले आहे. याप्रसंगी भाजपचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय पूर आणि मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात ज्यांची घरे पडली. पुरात जे नागरिक वाहून गेले, त्यांच्या कुटुंबांना सरकारने मदत करावी. पूरस्थितीमुळे जिल्ह्यात रस्ते आणि पुलाचे नुकसान झाले आहे. तिथे तातडीने दुरुस्ती करण्याचे प्रशासनाला आदेश देण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

टॅग्स :floodपूर