शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

शबरीमाला प्रकरणाचा निर्णय संसदेने सुरक्षित करावा : श्रीहरी अणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:01 IST

शबरीमाला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या नोंदी महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही धर्माच्या मूळ तत्त्वज्ञानात आलेल्या गोष्टी मानण्यास हरकत नाही, मात्र ज्या मूळतत्त्वात नसताना केवळ वर्षानुवर्षाच्या रिवाजानुसार चालत आल्या त्या पुढेही तशाच स्वीकारणे योग्य नाही. कारण मूळतत्त्वात अशा प्रथा असल्याचा पुरावा सापडत नाही. त्यामुळे केवळ धार्मिक समुदायाच्या सांगण्यावरून त्या प्रथा मानल्या जाव्या असे बंधन कुणावर घातले जाऊ शकत नाही. न्यायालयाने विशिष्ट धार्मिक मान्यतेविरुद्ध नाही तर लिंगभेदाच्या प्रथेविरुद्ध हा निर्णय दिला आहे व म्हणून तो ऐतिहासिक आहे. त्यामुळे न्यायालयाच्या माध्यमातून आलेल्या या समाजपरिवर्तनाला धार्मिक समुदायाने आडकाठी घालू नये, असे प्रतिपादन राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.

ठळक मुद्देसमाज परिवर्तनाला धार्मिक समुदायाची आडकाठी नको

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शबरीमाला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या नोंदी महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही धर्माच्या मूळ तत्त्वज्ञानात आलेल्या गोष्टी मानण्यास हरकत नाही, मात्र ज्या मूळतत्त्वात नसताना केवळ वर्षानुवर्षाच्या रिवाजानुसार चालत आल्या त्या पुढेही तशाच स्वीकारणे योग्य नाही. कारण मूळतत्त्वात अशा प्रथा असल्याचा पुरावा सापडत नाही. त्यामुळे केवळ धार्मिक समुदायाच्या सांगण्यावरून त्या प्रथा मानल्या जाव्या असे बंधन कुणावर घातले जाऊ शकत नाही. न्यायालयाने विशिष्ट धार्मिक मान्यतेविरुद्ध नाही तर लिंगभेदाच्या प्रथेविरुद्ध हा निर्णय दिला आहे व म्हणून तो ऐतिहासिक आहे. त्यामुळे न्यायालयाच्या माध्यमातून आलेल्या या समाजपरिवर्तनाला धार्मिक समुदायाने आडकाठी घालू नये, असे प्रतिपादन राज्याचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी केले.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या हायकोर्ट बार असोसिएशनच्यावतीने ‘धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि शबरीमालाचा निर्णय’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर प्रामुख्याने उपस्थित होते. अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्याशी संबंधित आर्टिकल्स आणि शबरीमाला प्रकरणातील सुनावणीच्या वेळी न्यायाधीशांच्या नोंदी अधोरेखित केल्या. याशिवाय वेगवेगळ्या प्रकरणांचे निर्णय सांगत त्यांनी हा मुद्दा पटवून दिला. आर्टिकल १४ मध्ये समानतेचा विश्वास आहे तर १५ मध्ये लिंगभेदाचा कायदा आहे. आर्टिकल २५ मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे तर २६ मध्ये धार्मिक व्यवस्थापनाचा विषय आहे. धार्मिक श्रद्धेच्या नावाने महिलांमध्ये वयानुसार भेदभाव करणे योग्य नाही. अनेक मंदिर आहेत जेथे महिलांना प्रवेश मिळतो तर काहींमध्ये विशिष्ट काळात प्रवेश दिला जातो. मात्र या मान्यता विशिष्ट धर्माच्या मूलतत्त्वात समाविष्ट असण्याचे पुरावे आहेत का, हे महत्त्वाचे आहे. एखाद्या तथाकथित धर्मगुरूने सांगितले किंवा अनेक वर्षांच्या रिवाजानुसार चालत आल्या म्हणून त्यानुसार वागणे किंवा इतरांना तसे वागण्यास बाध्य करणे योग्य नाही. केवळ मूलतत्त्व महत्त्वाचे आहे, प्रथा येतील आणि जातील. मात्र श्रद्धेच्या नावाने अशा धार्मिक समुदायांचे म्हणणे ऐकत राहिलो तर संविधान आणि न्यायव्यवस्थेला महत्त्व उरणार नाही आणि खाप पंचायतींसारखे समुदाय आपला अधिकार गाजविण्यास मोकळे होतील, असे मत त्यांनी मांडले.एकाच धर्माची माणसे वेगवेगळ्या विचाराने धर्माचे अनुसरण करतात आणि प्रत्येकाला त्यांच्या श्रद्धेनुसार अनुसरण करण्याचा अधिकार आहे.मात्र केवळ प्रथा पडली म्हणून कुणाच्याही धार्मिक स्वातंत्र्याचा मौलिक अधिकार अमान्य करता येत नाही, या न्यायाधीशांच्या नोंदी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे हे धर्माच्या मूलभूत गोष्टींशी निगडित असल्याचे आढळून येत नाही, त्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश मिळणे हा त्यांचा धार्मिक आणि मौलिक अधिकाराचा भाग आहे, अशी नोंद घेत न्यायालयाने हा निर्णय घेतला असून तो ऐतिहासिक आहे. समाजपरिवर्तनाचे अनेक निर्णय आतापर्यंत न्यायालयाने घेतले आहेत, मात्र दुर्दैवाने राजकीय सत्तेने त्यांची अंमलबजावणी केली नाही. शबरीमालाच्या निर्णयाबाबतही तसेच होताना दिसत आहे. न्यायालयाने समाजपरिवर्तनाची दिशा दाखविली आहे व ती सुरक्षित करण्याचे काम आता संसदेचे आहे, असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. संचालन एचसीबीएचे उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी केले. एचसीबीएचे सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयShrihri Anneश्रीहरी अणे